सातारा : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार गेली पाच दशके राज्य आणि केंद्रीय राजकारणात सक्रीय आहेत. सत्तेत असो, वा नसो पवारांची कामे कधीही अडत नाहीत. एखाद्या शहराचा विकास कसा करावा हे फक्त बारामतीत जावून आल्यानंतर लोकांना समजते. एकच ध्यास, फक्त बारामतीचा विकास, हे एकच गणित सोडविण्यासाठी पवार कुटूंब अविरतपणे झटलेले आहे. परंतू असे असतानाही बारामती व फलटण या महत्त्वाच्या शहरांना जोडणारा रस्ता गेली पाच वर्षे खड्ड्यात गेला आहे. त्यामुळे फलटण व बारामती परिसरात राहणार्या लोकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालेले आहे.
१९९९ साली शरद पवारांनी राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाशी फारकत घेतल्यानंतर स्वबळाचा नारा देत संपूर्ण सातारा जिल्ह्याला राष्ट्रवादीच्या पाठिमागे उभे राहण्याचे आवाहन केले होते. फलटण तालुक्यातील तत्कालीन सुभाषराव शिंदे, तत्कालीन आमदार मिस्टर रामराजे नाईक-निंबाळकर या फलटणमधील पुढार्यांनी शरद पवार यांच्या पाठिशी उभे राहून त्यांना ताकद देण्याचे काम केले होते. त्यावेळी शरद पवारांनी बारामतीप्रमाणे फलटणचाही विकास करु अशी ग्वाही दिली होती. परंतू पुढच्या काळामध्ये बारामतीचा विकास झाला. परंतू फलटणचा विकास मात्र सवतीच्या मुलाप्रमाणेच खुंटला गेला. फलटणचे पुढारीही आपल्या झोळीत पवारसाहेब काय टाकतात, या आशेवरच राहिले. त्यामुळे फलटणचाही विकास होण्यापेक्षा भकास होण्याकडेच अनेकांनी प्रयत्न केले. 2009 साली शरद पवार यांनी फलटणमध्ये एका कार्यक्रमा प्रसंगी झालेल्या सभेमध्ये बारामती-फलटण-शिरवळ असा चारपदरी रस्ता करण्याची घोषणा केली होती. जेणेकरुन फलटण-बारामती-शिरवळ परिसरामध्ये असणार्या औद्योगिक वसाहती वाढण्याकरिता चालना मिळावी, असा त्यामागचा उदात्त हेतू होता. घोषणा झाल्यानंतर काही दिवसांनंतर भूसंपादनाचे काम सुरु झाले. दक्षिणेतल्या आय. व्ही. रेड्डी यांच्या आयव्हीआरसीएल या कंपनीला या रस्त्याचा ठेका देण्यात आला. पहिल्या टप्प्यामध्ये शिरवळ ते लोणंद व लोणंद ते फलटण असे काम सुरु झाले. फलटण व खंडाळ्यामध्ये राष्ट्रवादीची सत्ता असतानाही काही नेत्यांनी संगनमत करुन शेतकर्यांना पुढे घालून भूसंपादन करण्यास अडचणी निर्माण केल्या. त्यामुळे अनेक दिवस या रस्त्याचे काम रखडलेले होते.
आयव्हीआरसीएल या कंपनीने भूसंपादन वेळेत करुन द्या म्हणून जिल्हा प्रशासनापासून मंत्रालयापर्यंत पत्रव्यवहार केले होते. परंतू जिल्हा प्रशासनाने व स्थानिक पुढार्यांनी त्याला फारसे महत्त्व दिले नाही. त्यामुळे आयव्हीआरसीएल कंपनी तोट्यात गेली होती. 2012-13 साली आयव्हीआरसीएल कंपनीने नुकसानीपोटी 140 कोटी वाढीव निधी देण्यात यावा, अशी मागणी राज्य शासनाकडे केली होती. परंतू तत्कालीन कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकारने या मागणीलाही केराची टोपली दाखविल्यामुळे हे काम 2013 साली अखेर बंद पडले. फलटण ते लोणंद या मार्गावरील रस्त्याचे काम जवळपास 80 टक्के पूर्ण झाले आहे, तर लोणंद ते शिरवळ या टप्प्यामध्ये अनेक ठिकाणी जमिनींचे भूसंपादन झाले नसल्यामुळे याठिकाणी रस्त्याचे काम जैसे थे पडले आहे. बारामती-फलटण या तिसर्या टप्प्यातील काम 2013 साली सुरु होणार होते. मात्र तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेवूनसुद्धा हे काम अखेर अर्धवटच राहिले आहे. काहीठिकाणी रस्त्यावर खड्डे असतात. परंतू बारामती-फलटण रस्ताच खड्ड्यात गेल्यामुळे येथील प्रवासीवर्ग ये-जा करताना येथील स्थानिक पुढार्यांना व जिल्हा प्रशासनाला शिव्यांची लाखोली वाहतच प्रवास करीत असतात. बारामती ते सांगवी, सांगवी ते सोमंथळी व सोमंथळी ते फलटण या मार्गावर भूसंपादन पूर्ण झाले आहे. मात्र राज्य शासनाला या कामासाठी नवीन ठेकेदारच मिळत नसल्यामुळे मोठी गोची होवून बसली आहे.
हा रस्ता बांधा वापरा व हस्तांतरित करा या बीओटी तत्वावर राज्य शासनाने हा ठेका आयव्हीआरसीएल कंपनीला दिला होता. मात्र राष्ट्रवादीच्या एका शक्तीशाली पुढार्याने आयव्हीआरसीएल कंपनीकडून सुमारे 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम घेतल्याची त्यावेळी चर्चा होती. त्यामुळेच आयव्हीआरसीएल कंपनी खर्या अर्थाने डबघाईला आली होती. त्यात भूसंपादन वेळेत झाले नाही, शासनाला कर्जापोटी आयव्हीआरसीएल कंपनीने 140 कोटींची मागणी केली. मात्र कॉंग्रेस- राष्ट्रवादी सरकारने एक छदामही या कंपनीला दिला नाही. त्यामुळे 2013 साली सत्तांतर होण्याअगोदरच आयव्हीआरसीएल कंपनीने आपला गाशा गुंडाळला. त्यामुळेच आज फलटण-बारामती रस्ता खड्ड्यात गेला आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी 15 डिसेंबर 2017 अखेर महाराष्ट्र खड्डेमुक्त करण्याचा संकल्प केला होता. या प्रयत्नामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग काहीअंशी यशस्वीही ठरला होता. मात्र राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यात अनेक ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांसमवेत सेल्फी काढून आपल्या बुडाखालचा अंधार झाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सत्तेत असतानाही बारामती-फलटण या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणारा रस्ताही त्या काळात त्यांना करता आला नाही, याबाबत मात्र राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याकडून अवाक्षरही काढले जात नाही. त्यामुळे स्वत:चे ठेवायचे झाकून आणि दुसर्याचे बघायचे वाकून या पॉलिसीमुळे राष्ट्रवादीच्या विकासाचे मॉड्युल खुद्द बारामती व फलटण या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातच फेल गेल्याचे दिसून येत आहे.
सातारा-लोणंद रस्त्याची दुर्दशा :
फलटण-बारामती रस्त्याप्रमाणेच सातारा ते लोणंद व वाठार स्टेशन-फलटण या रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुर्दशा झालेली आहे. विदर्भ, मराठवाडा, आंध्र प्रदेश, तेलंगणा येथून येणारे मोठ-मोठे ट्रक व कंटेनर टोल वाचविण्यासाठी या पर्यायी मार्गाचा वापर करीत असतात. त्यामुळे याठिकाणी वाहतुकीची रोजच मोठ्या प्रमाणावर कोंडी होत असते. त्यामुळे दररोज छोटे-मोठे अपघात होतच असतात. अनेकांना याठिकाणी प्राणास मुकावे लागले आहे, तर काहींना अपघातामुळे कायमस्वरुपी जायबंदी व्हावे लागले आहे. कोकण विभागाला दख्खनशी जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता आहे. सातार्यातून औरंगाबाद, अहमदनगर, विदर्भ, तेलंगाणा, ओडिसा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू कडे मालवाहतूक करणारे अनेक मोठमोठे ट्रक व कंटेनर ची संख्या या मार्गावर वाढलेली आहे. आरळे येथील ब्रिटीशकालीन पूल कधीही कोसळू शकतो. त्यामुळे याठिकाणी उपाययोजना व या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात यावे, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
-संग्राम निकाळजे
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |