कराड : सेवा हमी कायदा हा तर राज्यात लागू होणारच त्याबाबत आत्तापर्यंत एकही कारवाई झाली नाही. मी त्याबाबतची पहिली कारवाई केली आहे. वास्तविक माझ्याकडे जेवढी खाती आहेत त्यामध्ये मजबुतीने हा कायदा पाहण्याचा 100% आम्ही प्रयत्न करणार आहोत. इतर खात्यामध्ये ही इतर खात्याच्या मंत्र्यांनी ते करावे त्यांनी केले नाही तर लोकांनी आमच्याकडे फक्त एक तक्रार आणावी मग त्याचे जे काही करायचे आहे ते आरपार केले जाईल. त्याला ज्या पद्धतीने सामोरे जायचा आहे त्या पद्धतीने गेल्याशिवाय राहणार नाही असा इशारा ना. बच्चू कडू यांनी दिला.
ते कराड दौर्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ना. बच्चू कडू यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी विविध शेतकरी संघटनेकडून ना. बच्चू कडू यांना निवेदने देण्यात आली.
ना. बच्चू कडू पुढे म्हणाले, आम्ही सर्व अधिकारी कर्मचार्यांना सांगत आहोत की तुम्ही चांगले अधिकारी व कर्मचारी आहात, मात्र जे बोटावर मोजण्याइतपत आहेत ज्यांनी हे वाटोळे केले आहे त्यांना मात्र आम्ही सोडणार नाही. मग त्यासाठी काहीही झाले तरी बेहत्तर, माझे शेतकर्यांना असे सांगणे आहे की तुम्ही फक्त अर्ज करा त्याची ओशी स्वतःकडे ठेवा. तुमची सर्व कागदपत्रे व्यवस्थीत असतील तर त्या कागदपत्राबाबत कोठेही तक्रार नाही असे असूनही जर एखाद्या अधिकारी कर्मचार्याने संबंधित शेतकर्याचा फेरफार घेतला नाही किंवा त्याचे काम झाले नाही तर संबंधितावर निलंबनाची कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही.
विनाअनुदानित शाळांत बाबत बोलताना ना. बच्चू कडू म्हणाले, 20 टक्के अनुदान पाठीमागील सरकारने कबूल केले होते. परंतु त्याची तरतूद केलेली नव्हती. येणार्या बजेटमध्ये त्याची तरतूद केली जाईल. नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करण्याबाबत छेडले असता हा खरंतर मंत्रिमंडळाचा निर्णय आहे. आमचे सरकार चार-पाच पक्षांचे सरकार आहे. सरकार स्थापन करण्यात एक महिना गेला त्यामुळे नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करायचा किंवा काय याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. याबाबत जी काही भूमिका घ्यायची असेल ती मंत्रिमंडळ बैठकीत घेतली जाईल. या देशांमध्ये सगळ्यात जास्त शेतकरी मजूर, अपंग, माजी सैनिक या या लोकांचा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे. त्याच्यावरती पहिले काम करणे महत्त्वाचे आहे. असेही नामदार बच्चू कडू यांनी सांगितले.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |