सातारा : आपल्या देशात प्रत्येकाला स्वातंत्र्य दिले आहे, त्यामुळे या स्वातंत्र्याचा अर्थ फक्त आपलीच बाजू रेटून नेणे योग्य नाही. आपल्या देशातील विविध जातीधर्म, संस्कृती यांची विविधता लक्षात घेता केवळ एखाद्या विशिष्ट चाकोरीतूनच जाण्याचा आग्रह धरल्यामुळे देशात नक्कीच अराजकता माजेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी केले.
सातारा येथील ज्येष्ठ विचारवंत व संशोधक डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर यांच्या वयाची ८0 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांचा येथील समर्थसदनमध्ये सातारकर नागरिकांच्यावतीने कतृर्त्वगौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. मराठी विश्वकोष निर्मिती मंडळाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार दिलीप करंबेळकर यांच्या हस्ते व प्रा.डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांना सन्मानपत्र व शाल देवून गौरवण्यात आले. यावेळी विचारमंचावर ज्येष्ठ साहित्यिक अरुण गोडबोले, रवींद्र झुटिंग, विजय मांडके उपस्थित होते.
डॉ. साळुंखे पुढे म्हणाले की, डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर यांनी आयुष्यभर संवादाला महत्त्व दिले आहे. विज्ञानाच्या क्षेत्रात अतिशय उंचीवर असतानाही त्यांनी समाजशास्त्र, पत्रकारीता, इतिहास, धर्म, समाजरचना अशा विविध क्षेत्रात मौलिक असे काम केले आहे. दाभोलकरांना योग्य वाटत नाही त्याविरोधात ते बोलतात अन् लिहितात. त्यांची विवेकानंदाच्या विषयी वैज्ञानिक दृष्टीकोनातून केलेली मांडणी अतिशय वेगळी आहे. त्यांना प्रवाहित राहणे आवडते.
डॉ. दत्तप्रसाद दाभोलकरांमध्ये नव्या शोधांची जिज्ञासा आहे. त्यातून ते शोध घेतात आणि मांडतातही. संशोधक म्हणून काम करताना ते आनंदयात्रीही होते. त्यांनी आपले विचार सहजतेने, परंतु निर्भीडपणे मांडलेले आहेत असे मत दिलीप करंबेळकर यांनी व्यक्त केले.
यावेळी डॉ. दाभोलकरांचा जीवनपट उलघडून दाखविणारी त्यांची प्रकट मुलाखत अरुण गोडबोले यांनी घेतली. मुलाखतीच्या दरम्यान डॉ. दाभोलकरांनी आपल्या भारतामध्ये अनेक शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आहेत. प्रयोगशाळा आहेत. मात्र, भारतातील शास्त्रज्ञ व तंत्रज्ञानानी काहीही केलेले नाही. नोबेल पारितोषिकांच्या चर्चेतही आपल्या देशातील शास्त्रज्ञांची नावे नाहीत. अणुभट्टया आपल्या देशात का निर्माण होत नाहीत, याचा आपण विचारही करत नाही. माझ्या लहानपणी मला जे शिक्षण मिळाले, ते माझ्या आईकडून मिळाले. हु...तू... तूु... (कबड्डी) पास|ून मी खेळास सुरुवात केली अन् विविध क्षेत्रात माझ्या पध्दतीने काम करत राहिलो.
प्रास्ताविक व स्वागत अरुण गोडबोले यांनी केले. आभार रवींद्र झुटिंग यांनी मानले. सूत्रसंचालन विजय मांडके यांनी केले.
या कार्यक्रमास ज्येष्ठ अर्थतज्ञ पी. एन. जोशी, माजी सनदी अधिकारी डी. एन. वैद्य, विश्वास दांडेकर, प्राचार्य पुरुषोत्तम शेठ, शिरीष चिटणीस, संभाजीराव पाटणे, प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे, पार्थ पोळके, सुधीर धुमाळ, प्राध्यापिका संध्या चौगुले, प्रा. अविनाश लेवे, गुरुप्रसाद सारडा, प्रकाश गवळी, एस. पी. क्षीरसागर, रमेश इंजे, किशोर बेडकिहाळ, दिनकर झिंब्रे, डॉ. श्याम बडवे, युवराज पवार, डॉ. उदय देशपांडे, डॉ. शैला दाभोलकर, डॉ. प्रसन्ना दाभोलकर, डॉ. हमीद दाभोलकर, डॉ. चित्रा दाभोलकर आदी बहुसंख्येने उपस्थित होते.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |