बेंगळुरू : विक्रम लँडरचा संपर्क २.१ कि.मी.वर तुटला, अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष डॉ. के. सीवन यांनी दिली. चांद्रयान-२ साठी संपूर्ण जगाचं लक्ष भारताकडे लागले होते. अखेरचा 'पंधरा मिनिटांचा थरार' म्हणवला गेलेला घटनाक्रम लीलया पार पाडण्यासाठी सज्ज झालेल्या 'विक्रम'चे चंद्रावतरण पाहण्यासाठी अवघा देश जागा होता.
रात्री एक वाजून ४५ मिनिटांनी विक्रम लँडरने चंद्रावर उतरण्यास सुरुवात केली. इस्रोच्या शास्त्रज्ञांसह संपूर्ण देशातील जनता ऐतिहासिक क्षण अनुभवण्यासाठी सज्ज झाले होते. चंद्राच्या पृष्ठभागापासून यानाचं अंतर जसजस कमी होत होतं. तसं सर्वांची धाकधूक वाढली होती. संपूर्ण देशावासीयांचा उत्साह शिगेला गेला होता. इस्रो सेंटरमधील शास्त्रज्ञ विक्रम लँडरच्या मार्गक्रमणावर बारकाईने लक्ष ठेऊन होते. एक वाजून ५३ मिनिटांनी विक्रम लँडर चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणार होते. मात्र, चांद्रयान अवघे २.१ कि.मी.वर असताना विक्रम लँडरशी असलेला संपर्क तुटला आणि शास्त्रज्ञांबरोबरच संपूर्ण देशाचा श्वास रोखला गेला. यावेळी उपस्थित असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञांना धीर दिला.
जीवनात चढ-उतार येत असतात. संपूर्ण देश तुमच्या पाठीशी उभा आहे. तुम्ही विज्ञानाची आणि पर्यायाने देशाची सेवा केली आहे. त्याचा आम्हाला अभिमान आहे. गेल्या तीन वर्षांपासून या मोहिमेसाठी खडतर मेहनत घेतली आहे. आतापर्यंत तुम्ही यशस्वी कामगिरी केली आहे. धीर सोडू नका. संपर्क तुटला म्हणून खचून जाऊ नका. तुम्ही केलेले काम छोटे नाही. इस्त्रो प्रमुखांनी पुन्हा संपर्क होऊ शकतो, असे सांगितले आहे. तुमच्या मेहनतीनेच पुन्हा एकदा देशाची मान उंचावेल. पुढील कामगिरीसाठी तुम्हाला शुभेच्छा, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञांचे मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर पंतप्रधान मोदींनी के. सीवन यांची पाठ थोपटत त्यांनाही धीर दिला.
निश्चित संकेत प्राप्त होईपर्यंत ठोस निष्कर्ष काढता येणार नाही. विक्रम लँडरकडे २.१ कि.मी. पर्यंतचा डेटा उपलब्ध आहे. त्याचा अभ्यास केला जाईल. संपर्क पुन्हा प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती 'इस्रो'कडून देण्यात आली.
दरम्यान, पृथ्वीपासून तीन लाख ८४ हजार किलोमीटर दूर चांद्रभूमीवरील धुरळा उडवत 'विक्रम लँडर' चंद्रावर कसा उतरतो आणि आजवर कोणताही देश न पोचलेल्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ भागात भारतीय तिरंगा कधी फडकतो याची उत्सुकता आणि चर्चा शुक्रवारी दिवसभर होती. अखेरचा 'पंधरा मिनिटांचा थरार' म्हणवला गेलेला घटनाक्रम लीलया पार पाडण्यासाठी सज्ज झालेल्या 'विक्रम'चे चंद्रावतरण पाहण्यासाठी अवघा देश जागा होता. रात्री १२ वाजल्यापासून चांद्रयान-२ बद्दलची उत्सुकता वाढली होती. ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी पंतप्रधान मोदी इस्रो सेंटरमध्ये दाखल झाले.
'चांद्रयान-२'चा चंद्राच्या दिशेने प्रवास २२ जुलैला सुरू झाला असून, आतापर्यंतचे सर्व टप्पे व्यवस्थित पार पडले आहेत. या मोहिमेतील अचूकतेद्वारे भारताने अवकाश तंत्रज्ञानातील आपल्या क्षमतेचे दर्शन साऱ्या जगाला घडविले आहे. सन २०१६ मध्ये रशियाने लँडर देण्यात असमर्थता दर्शवल्यावर तीन वर्षांच्या विक्रमी काळात 'इस्रो'ने स्वदेशी आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर लँडर आणि रोव्हर विकसित केले. 'चांद्रयान-२'च्या रूपाने इस्रोने भारतीय भूमीवरून आतापर्यंतचे सर्वाधिक वजनाचे यशस्वी प्रक्षेपण केले आणि कोणताही अनुभव नसताना पूर्णपणे स्वयंचलित पद्धतीने लँडर आणि रोव्हरला चांद्रभूमीवर उतरवण्यासाठी प्रयत्न केले.
चंद्रापासून ३५ किमी अंतरावर असलेले 'विक्रम लँडर' १५ मिनिटांत चंद्रस्पर्श करील. या प्रक्रियेला 'इस्रो'चे अध्यक्ष डॉ. के. सिवन यांनी '१५ मिनिटांचा थरार' असे संबोधले. 'नवजात बाळ अचानक कुणी तुमच्या हाती सोपवावे, अशीच ही स्थिती आहे. हे बाळ इकडे-तिकडे दुडदुडेल. पण तुम्हाला त्याला सांभाळायचे आहे. 'लँडर' आमच्यासाठीही असेच बाळ आहे,' असे के. सिवन म्हणाले.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |