01:53am | Jan 06, 2020 |
कराड : राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी राज्यात कृषी, औद्योगिक क्रांती घडवली. तसेच सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्याची भूमिका घेतली. त्याला चालना देण्याचे काम धनंजयराव गाडगीळ, वसंतदादा पाटील व शरद पवार यांनी केले. आज राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये सहकार व पणन खात्याची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली असून ती निश्चितच यशस्वीरीत्या पार पाडेन, असा विश्वास राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला.
महाविकास आघाडी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपदी शपथ घेतल्यानंतर नामदार बाळासाहेब पाटील कराडला आले असता त्यांनी दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन केले. याप्रसंगी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, लोकशाही आघाडीचे अध्यक्ष सुभाषराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य मानसिंगराव पाटील, सनबीम इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष सारंग पाटील, कराड तालुका अध्यक्ष देवराज पाटील, पंचायत समिती सभापती प्रणव ताटे, माजी उपसभापती सुहास बोराडे, यशराज पाटील, नगरसेवक सौरभ पाटील, वैभव हिंगमीरे आदींची उपस्थिती होती.
मंत्री पाटील म्हणाले, कराड हा दिवंगत यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांची पाठराखण करणारा तालुका आहे. त्यांच्या विचारांना थाराच कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात कार्य करत आलो आहे त्यामुळेच शरद पवार साहेबांनी माझ्या खांद्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे. ते सर्वांच्या सहकार्या सहकार्यातून यशस्वीरित्या पार पाडेन.
कर्जमाफीच्या मुद्यावर बोलताना ते म्हणाले, राज्यात विविध सेवा सोसायटीच्या माध्यमातून कर्ज वाटप केले जाते. सरकारने दोन लाखांत पर्यंतची कर्जमाफी जाहीर केली असून त्याचे काम सुरू आहे. परंतु, जे नियमित कर्ज भरतात त्यांच्यासाठी काय करता येईल, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी गठित करण्यात आली आहे. या कमिटीमार्फत यासंदर्भात योग्य तो निर्णय घेण्यात येईल, अशी माहितीही यांनी यावेळी दिली.
दरम्यान, कराडात शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस महाविकास आघाडीचे सहकार व पणन मंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांचे कराडमध्ये रविवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांसह कराडकर यांच्या वतीने जल्लोषी स्वागत करण्यात आले. यावेळी शहरातून त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. दरम्यान, त्यांनी कोल्हापूर नाका येथे महात्मा गांधी, शाहू चौकातील शाहू महाराज, दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर या ठिकाणी त्यांची कंदी पेढ्याने तुला करण्यात आली. त्यानंतर दुपारी 4 वाजता त्यांची भव्य स्वागत मिरवणुक काढण्यात आली. मिरवणुकीत सहभागी कार्यकर्त्यांसह त्यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले.
ही मिरवणूक दत्त चौकातून मुख्य बाजारपेठेतून आझाद चौक, चावडी चौक मार्गे प्रितीसंगमावरील स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीस्थळी तेथून पी. डी. निवस्थानापर्यंत काढण्यात आली. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी सर्वांचे आभार मानले. तत्पूर्वी, मिरवणुकीत शहरातील व्यापारी वर्गासह नागरिक व राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनी ठिकाणी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. तसेच काही ठिकाणी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |