05:50pm | Sep 21, 2018 |
सातारा : जिंती, ता. फलटण येथील पोलीस पाटील व एका शिक्षकाने गावातीलच एका युवकाला नरबळीच्या उद्देशाने स्वत:च्या शेतात नेऊन जिवंत पुरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, युवकाने घटनास्थळावरुन पळ काढल्यामुळे त्याचा जीव वाचला असल्याची तक्रार संबंधित पीडित तरुणाने पोलीस अधीक्षक सातारा यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, तात्याबा रामचंद्र पवार रा. जिंती, ता. फलटण हा युवक मोलमजुरी करुन कुटूंबाचा उदरनिर्वाह करीत असतो. दि. 18 सप्टेंबर 2018 रोजी जिंती, ता. फलटण येथील पोलीस पाटील नामदेव कृष्णराव रणवरे व त्याचा शिक्षक असलेला साथीदार रविंद्र दिगंबर भोसले यांनी तात्याबा यास रामचंद्र रणवरे यांच्या शेतात खांब रोवायचे आहेत, असे सांगून त्यास घेवून गेले. मात्र, शेतामध्ये अगोदरच चार-पाच फूट खोल खड्डा खोदून ठेवला होता. तसेच लिंबू, नारळ व पुजेचे साहित्यही त्याठिकाणी ठेवण्यात आले होते. त्यावेळी मी त्यांना कुठे खोदायचे आहे, असे विचारले. मात्र त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच आमची काही लोकं येणार आहेत, त्यानंतरच आपण काम सुरु करु, असे मला रणवरे व भोसले यांच्याकडून सांगण्यात आले. मोबाईलवरुन रणवरे व भोसले हे सातत्याने संशयास्पद बोलत होते. त्यामुळे मला त्यांचा संशय आल्याने मला भीती वाटू लागली. खड्ड्याशेजारीच छोटी पार, टिकाव, खोरे अगोदरच ठेवण्यात आले होते. एकूणच मला हा सर्व प्रकार नरबळीचा वाटल्यामुळे मी घटनास्थळावरुन पळ काढला. रणवरे, भोसले यांनी माझा पाठलाग केला. मात्र मी उसातून जिव वाचवित पळत राहिलो. त्यानंतर जिंती गावालगत असणार्या उसाच्या शेतात दुपारी तीन वाजल्यापासून रात्री साडेआठपर्यंत लपून बसलो होतो. अंधार पडताच मी घरी आलो. घरच्यांना माझ्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला.
त्यानंतर घरच्यांसोबत मी साखरवाडी दूरक्षेत्रात याबाबत तक्रार देण्यासाठी गेलो असता कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी मला दुसर्या दिवशी सकाळी 11 वाजता येण्यास सांगितले. त्यानंतर मी जिंती गावच्या सरपंचांकडे गेलो आणि त्यांना घडलेली सर्व हकिकत सांगितली. त्यानंतर सरपंचांनी पोलीस पाटलांना फोन लावला असता त्यांचा फोन लागला नाही. त्यानंतर त्यांनी रविंद्र भोसले यांना फोन करुन बोलावून घेतले. त्यानंतर भोसले यांनी सरपंचांसमोरच मला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करुन माझ्या अंगावर धावून आले. मी याबाबत साखरवाडी दूरक्षेत्र तसेच फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातही तक्रार देण्यास गेलो असता तेथील कर्मचारी माझ्यासमोरच या प्रकरणातील संशयित जिंतीचा पोलीस पाटील नामदेव रणवरे यांच्याबरोबर फोनवरुन बोलत होते. यानंतर मी माझी तक्रार घेण्याची विनंती केली. परंतू त्यांनी माझी तक्रार घेतली नाही, असेही तात्याबा पवार यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे.
दरम्यान, एवढी गंभीर घटना घडूनही साखरवाडी दूरक्षेत्रातील पोलीस कर्मचार्यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्यामुळे फलटण तालुक्यात खळबळ उडाली आहे. जिंतीचे पोलीस पाटील नामदेव रणवरे हे माजी विशेष पोलीस महानिरीक्षकांचे नातेवाईक असल्यामुळेच हे प्रकरण दाबले जात आहे, असा आरोप संबंधित पीडित युवकाने केलेला आहे. याबाबत पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी लक्ष घालून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी या पीडित युवकाने केली आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |