सातारा : आर्टिकल 15 हा चित्रपट दि. 28 जून रोजी भारतासह संपूर्ण जगभरात प्रसिद्ध झाला. एकूणच आर्टिकल 15 च्या अनुषंगाने वाद-प्रतिवाद निर्माण झाले. शिळ्या कढीला नवा ऊत आला. प्रदर्शनाच्या अगोदरच म्हणजे 25 जून ला महाराष्ट्र करणी सेनेचे अध्यक्ष अजयसिंह सेंगर यांनी हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होवू देणार नाही, असा इशारा दिला होता. मात्र, तरीही हा चित्रपट देशभरात काहीठिकाणी, तर जगभरात सर्वच ठिकाणी प्रदर्शित झाला.
भारतात बलात्काराच्या घटना, ज्यावेळी भारत हा देश म्हणून संकल्पनाच अस्तित्वात नव्हती तेव्हापासून घडत आहेत. मात्र चातुवर्णिय व्यवस्था अस्तित्वात आल्यानंतर विशिष्ट समुहाला ‘टार्गेट’ करुन अन्याय, अत्याचार व बलात्काराच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली, हा इतिहास आहे. धर्मसत्ता आणि राजसत्ता हातात हात घालून राज्य करीत असतील तर न्याय कोणाकडे मागायचा? झाकली मुठ सव्वा लाखाची, म्हणत या भूमिने अनेक अत्याचार, अन्याय पचवले. ब्रिटीशांनी भारतात अधुनिकतेचा पाया रचला, हे मान्यच करावे लागेल. खर्या अर्थाने चातुवर्ण व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचे काम हे ब्रिटीशांनीच केले. भारत स्वतंत्र झाल्यानंतर जगातील महान अशी राज्यघटना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला दिली. कोणत्याही राजाने अथवा नागरिकाने व्यक्तिची जात, धर्म, लिंग, रंग आणि जन्माचे ठिकाण पाहून त्यांच्यामध्ये भेदभाव करु नये, असा उल्लेख भारताच्या राज्यघटनेच्या परिच्छेद 15 अर्थात (आर्टिकल 15) मध्ये आहे. चातुवर्णिय व्यवस्था मोडित काढून चातुवर्णिय व्यवस्थेला शह देण्यासाठी आर्टिकल 15 चा डॉ. आंबेडकरांनी राज्यघटनेमध्ये समावेश केला. भारताची राज्यघटना व लोकशाही जगातील इतर देशांच्या तुलनेत इंचभर तरी प्रगल्भ आहे, हे जगभरातील विचारवंत जाहीरपणे मान्य करतात. परंतू प्रगल्भतेच्या नावाखाली कायदा व सुव्यवस्थेची अंमलबजावणी करणारे व लोकप्रतिनिधी कधीकधी आपला पिंड सोडत नाहीत. त्यामुळे रोजच कुठे न् कुठे तरी देशाच्या कानाकोपर्यात चातुवर्णिय व्यवस्थेला पूरक ठरणार्या घटना घडत असतात.
आर्टिकल 15 हा चित्रपट प्रदर्शित होण्याअगोदरच करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच महाराष्ट्राच्या अध्यक्षांनी हा चित्रपट महाराष्ट्रासह देशभरात प्रदर्शित होवू देणार नाही, असा सूर आळवला होता. पी.के., पद्मावत, मनकर्णिका, जोधा-अकबर व आर्टिकल 15 सारख्या चित्रपटांमध्ये हिंदू धर्म, देवता, संत, ब्राह्मण यांची सातत्याने निंदानालस्ती व विडंबन केले जाते. इतर मात्र याकडे जन्म हिंदू या धर्महानीकडे मनोरंजन म्हणून पाहतात. हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यानेच हिंदूद्वेष्टे चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते, वृत्तवाहिन्या यांच्याकडून सातत्याने धर्महानी करण्यात येते, असा आरोपही करणी सेनेकडून करण्यात आलेला होता. याबाबतचे वृत्तही सनातन प्रभात मध्ये प्रसिद्ध झाले होते. वास्तविक आर्टिकल 15 हा चित्रपट उत्तर प्रदेशात घडलेल्या सत्य घटनेवर आधारित आहे. आर्टिकल 15 हा चित्रपट उत्तर प्रदेशातील बदायुँ येथील बलात्कार प्रकरणावरुन प्रेरित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी भारतातील जातीव्यवस्थेचे खरे वास्तव समोर आणण्यासाठीच या चित्रपटाची निर्मिती केली आहे. यापूर्वीही या विषयावर अनेक चित्रपट येवून गेलेले आहेत. उच्चवर्णियांकडून सातत्याने कनिष्ठ जातीतील लोकांवर अन्याय, अत्याचाराच्या घटना भारतासह महाराष्ट्रात यापूर्वी घडलेल्या आहेत. परंतू वास्तवच मांडणे फार मोठा गुन्हा आहे. एका विशिष्ट संघटनांकडून अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी झाल्याचे गेल्या काही वर्षांमधील घटनांवरुन स्पष्टपणे जाणवत आहे. पाश्चात्य देशांमध्ये कोणत्या विषयांवर चित्रपट करायला हवा, याचे पूर्ण स्वातंत्र्य त्या निर्माता- दिग्दर्शकाला असते. यामध्ये कोणत्याही संघटना अथवा त्या देशातील सरकार ढवळाढवळ करीत नाही. भारतासारखी किचकट अशी सेन्सॉर बोर्ड सारखी संकल्पना तिकडे मान्य नाही. कोणी काय बघावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. म्हणूनच पाश्चात्य देशांमध्ये पॉर्न फिल्म इंडस्ट्रीतीलही मानाचे पुरस्कार दिले जातात. असो, आपल्याकडे विविध संघटना व सेन्सॉर बोर्डासारख्या स्वायत्त संस्थांच्या हस्तक्षेपांमुळे आपले चित्रपट ऑस्करच्या स्पर्धेत टिकत नाहीत, आणि टिकले तरी त्याला कोणतेही मानाचे पुरस्कार मिळत नाहीत. आर्टिकल 15 च्या प्रदर्शनावरुनही अनेक वाद-विवाद निर्माण झालेत. काही संघटना चित्रपट प्रदर्शित होवू नये, यासाठी प्रयत्न करताहेत. तर दुसर्या बाजूला चित्रपट प्रदर्शित व्हावा, यासाठी प्रयत्न करीत आहेत. परंतू ‘इन्साफ की भीक मत मांगो, बहुत मॉंग चुके...’ फक्त तीन रुपयांसाठी या देशात दोन बहिणींचा सामुहिक बलात्कार करुन त्यांची हत्त्या केली जाते. आपली जात सर्वश्रेष्ठ समजणारी मानसिकता या देशात किती खोलवर रुजलेली आहे, याच मानसिकतेवर या चित्रपटात भाष्य केलेले आहे.
चंबळ मधील दरोडेखोर, माजी खासदार फूलनदेवीच्या जीवनावरही शेखर गुप्तांचा ‘बेंडिट क्वीन’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यावेळी तत्कालीन धर्माच्या ठेकेदारांनी या चित्रपटाला विरोध केला होता. मात्र, ‘बेंडिट क्वीन’ जगभरात तुफान चालला. यानिमित्ताने चंबळच्या रक्तरंजित खोर्याची नवीन ओळख जगाला झाली. सृजनशील चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर यांनाही या चित्रपटाने वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. भारतातही दर्जेदार चित्रपटांची निर्मिती होत असते. परंतू धर्माचे ठेकेदार आणि सेन्सॉरच्या कात्रीतून अशा चित्रपटांना जावे लागते. कलात्मकता आणि सृजनशीलतेला कात्री लावल्यामुळे या चित्रपटांमधील गाभाच निघून जातो. आर्टिकल 15 हा जुन्या कढीला नवा ऊत असला तरी हा चित्रपट तुमचे रक्त गोठवेल. आपला देश कोणत्या दिशेने मार्गक्रमण करतोय, याबाबत आपल्याला निश्चितच विचार करायला लावेल. अनुभव सिन्हा, गौरव सोलंकी या द्वयीने या चित्रपटाची कथा लिहिली आहे, तर अंशुमन खुराना या प्रतिभावान अभिनेत्याने या चित्रपटामध्ये लीड रोल साकारलेला आहे. एकूणच नेमका आशयाला हात घालून हा चित्रपट निर्माण करण्यात आला आहे. गल्लाभरु चित्रपटांएवढा आर्टिकल 15 ने निश्चितच व्यवसाय केला नाही, मात्र इंटरनेट मुव्ही डेटा बेस (IMDB) या जागतिक चित्रपट मानांकन वेबसाईने मात्र या चित्रपटाला 8.4 एवढे गुणांकन दिलेले आहे. तथाकथित धर्माच्या व जातीच्या ठेकेदारांना मात्र या जागतिक मानांकनामुळे मात्र सणसणीत चपराक बसलेली आहे. यावर्षातील भारतीय भाषेतील इतर चित्रपट IMDB ने आर्टिकल-15 ला दिलेल्या मानांकनाच्या जवळपासही नाहीत. सामाजिक आशय असलेले चित्रपट सध्या बॉलिवूडमध्ये मोठ्या प्रमाणावर निर्माण होत आहेत. मात्र आर्टिकल 15 ने देशात सुरु असलेल्या सद्यस्थितीवर भाष्य करुन जागतिक समुदायाला हादरवून सोडले आहे.
- संग्राम निकाळजे
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |