06:44pm | Mar 27, 2020 |
- अजित जगताप
सातारा : सध्या देशात कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात काळजी घेतली जात आहे. जनतेच्या आरोग्य रक्षणासाठी सरकारी, निमसरकारी सेवेतील कायम व कंत्राटी कर्मचार्यांचा उचित सन्मान व्हावा, हा संसर्ग पूर्णत: नष्ट झाल्यानंतर त्या सर्वांना ज्यादा वेतन द्यावे, अशी मागणी माजी आमदार तथा माथाडी कामगार नेते शशिकांत शिंदे यांनी केली आहे.
कोरोना विषाणू संसर्ग फैलाव रोखण्यासाठी देशातील नागरिकांनी घरी थांबावे यासाठी एकवीस दिवसांची संचारबंदी लागू केली आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून यासाठी रस्त्यावर अहोरात्र खडा पहारा देणारे पोलीस दल, विविध रुग्णालयात रुग्णसेवा करणारे डॉक्टर, नर्स व इतर कर्मचारी, यावर नियंत्रण ठेवणारे अधिकारी, प्रसारमाध्यमातील प्रतिनिधी, जिवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारी सर्व यंत्रणा आणि महत्त्वाचे म्हणजे यामध्ये सफाईचे काम करणारे सफाई कर्मचारी, अंगणवाडी सेविका, महसूल-ग्रामविकास खात्याचे कर्मचारी यांचे विशेष आभार मानायला हवेत. जनतेच्या आरोग्य रक्षणासाठी कोरोना विषाणूचे सावट असतानाही आज हे सर्वजण घराच्या बाहेर पडून जनतेच्या आरोग्याचे रक्षण करीत आहेत. देशाच्या सिमेवर जवान लढतात, त्याचपद्धतीने देशाच्या अंतर्गत हे आधुनिक जवान कोरोना विषाणूविरोधात लढत आहेत. या सर्वांचा उचित सन्मान म्हणून त्यांना जादा वेतन देण्यात यावे. सध्या कायम, त्याचबरोबर कंत्राटी कर्मचार्यांचाही त्यामध्ये समावेश व्हावा, अशीही मागणी शशिकांत शिंदे यांनी केली आहे.
संपूर्ण देशामध्ये खाजगी व सरकारी असे 2 लाख 10 हजार 971 डॉक्टर्स आहेत. 7 हजार 565 सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून सामाजिक काम होत आहे. या सर्वांच्या रक्षणाची जबाबदारी असलेले पोलीस दल सध्या 24 तास रस्त्यावर उतरले आहेत. महाराष्ट्राचा विचार केला तर 1 कोटी 95 लाख पोलीस कर्मचारी व अधिकारी आहेत. यामध्ये 277 पोलीस अधीक्षक, 652 पोलीस उपअधीक्षक, 3 हजार 530 पोलीस निरीक्षक, 4 हजार 530 सहाय्यक पोलीस निरीक्षक व 7 हजार 601 पोलीस उपनिरीक्षक आणि 1 लाख 84 हजार 745 पोलीस बांधव परिश्रम घेत आहेत. संचारबंदीच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी घराबाहेर असलेल्या पोलिसांनाही जिवनावश्यक वस्तू मिळाल्या नाहीत. किंबहुना काहींना पिण्यासाठी पाणीही वेळेवर मिळत नाही. तरीही आपले कर्तव्य बजावण्यासाठी ते रक्ताचे पाणी करीत आहेत. त्याचबरोबर सफाई कामगार, आशा, नर्सेस, वाहनचालक व कंत्राटी पद्धतीने काम करणारे कर्मचारी आणि विविध जिवनावश्यक वस्तूंच्या पुरवठा व वाहतुकीसाठी कार्यरत असणारे कर्मचारी हे खर्या अर्थाने कोरोना विषाणू विरोधात लढणारे सैनिक ठरले आहेत. त्यांचा गौरव म्हणून त्यांचा उचित सन्मान हा त्यांचा अधिकार आहे. केंद्र सरकारने यासाठी वेगळे पॅकेज केले आहे. त्या व्यतिरिक्त कंत्राटी कामगारांनाही त्यामध्ये समावेश व्हावा, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना वेळेत भाजीपाला, फळे व इतर खाद्यपदार्थ उपलब्ध करण्यासाठी माथाडी कामगार आपल्या परिवारापासून लांब राहून ज्यादा कष्ट करीत आहेत. त्याचाही विचार शासनाला करावाच लागणार आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |