कराड : ‘‘कविता म्हणजे सभोवतीच्या समाज वास्तवावर दिलेली कवीची प्रतिक्रिया असते. प्रतिभा आणि कल्पना यांच्या सहाय्याने कवी आपल्या कवितेत मानवी जीवनाचे सार मांडत असतो. समाज परिवर्तनाची कवितेत मोठी ताकद असून कवी मानवता जिवंत राहण्यासाठी काव्यात्मक आविष्कार करत असतो. खर्या अर्थाने कविता मानवाचा जीवनधर्म सांगत असते.’’ असे प्रतिपादन कवी प्रा. संतोष बोंगाळे यांनी केले.
ते महिला महाविद्यालय, कराडच्या वसंतगड येथील राष्ट्रिय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून ‘काव्यगंध’ विषयावर मार्गदर्शन व काव्यसादरीकरण करताना बोलत होते. अध्यक्षस्थानी कार्यक्रम अधिकारी डॉ.अखिलेश शिंदे होते.
मार्गदर्शन करताना पुढे प्रा. बोंगाळे म्हणाले की, आजच्या आधुनिकीकरणामुळे मानवी जीवनात स्पर्धा सुरू झाल्याने समाजात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आपण ध्येयावर लक्ष केंद्रित करून यश संपादन करावे. सोशलमीडियाचा योग्य वापर करावा. आपली माती, आपले आई वडील यांची सेवा करण्यातच मानवी जीवनाचा खरा आनंदोत्सव आहे. शिबिरात मिळालेली सुसंस्कारांची शिदोरी जीवनाला आकार देऊन आनंदी करते. याबरोबर त्यांनी ‘थेंब थेंब पाणी’, ‘दुष्काळ’, ‘जीवन एक संघर्ष’, ‘आई’, ‘जीवनाचे रंग’, ‘भाकरी आणायची कोठून’, ‘आता नको मज काही’ अशा कवितांचे बहारदार गायन करून उपस्थितांची मने जिंकली.
अध्यक्षस्थानावरून डॉ.अखिलेश शिंदे म्हणाले की, ’कविता ऐकण्यासाठी दर्दी रसिक मन असावे लागते. कविता हे समाज परिवर्तनाचे एक माध्यम असून साहित्य हे समाजाचा आरसा असते. आपण सर्वांनी जीवनमूल्ये जोपासली पाहिजेत. आपणाला सकारात्मक विचाराने आपली स्वप्ने पूर्ण करता येतात.’
मनोगत व्यक्त करताना मराठी विषयाचे प्रा.विलास सुर्वे म्हणाले की, ‘कविता ही उत्कट भावनेचा उत्स्फूर्त उद्गार असून मानवाची प्रगल्भता वाढविण्याचे काम करते. धावपळीच्या जगात वावरताना साहित्य मानवाला उत्साह, प्रेरणा देते. आमचे महिला महाविद्यालय असले तरी समाजिक कार्यात अग्रेसर असून सामाजिक बांधिलकी जोपासना करणारे आहे. विध्यार्थी जीवनात सुसंस्कार पेरण्याचे काम शिबीरात होते.’
यावेळी कार्यक्रमास प्रा. देसाई, प्रा.वाघमारे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु.पल्लवी अंगरखे यांनी केले. तर कु. अंकिता जमाले यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विध्यार्थीनी कु.प्रतिक्षा हिरे यांनी केले तर प्रा.डॉ.विलास सुर्वे यांनी आभार व्यक्त केले.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |