04:47pm | Jun 28, 2019 |
उस्मानाबाद : कृष्णा आणि कोयना या नद्यांमधील पाणी दुष्काळी भागासाठी वळवता येणार नसल्याची माहिती राज्य सरकारनं दिली आहे. त्यामुळे कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना आता बासनात गुंडाळावी लागणार आहे. तसेच पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, उस्मानाबाद आणि बीड या सहा जिल्ह्यांना कृष्णा आणि कोयनेतून पाणी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आमदार अतुल भातखळकर यांनी विधिमंडळात तारांकित प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना महाजन यांनी ही माहिती दिली.
भाजप सरकारच्या या निर्णयामुळे आता इतर पक्षातून भाजपत आलेले खासदार, आमदार आता संभ्रमात पडले आहेत. कारण विजयसिंह मोहिते पाटील यांसारखे नेते ‘कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्प’मुळे भाजपत सामील झाले होते. त्यामुळे आता त्यांची दुष्काळी भागातील जनतेसाठी पुढील भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कृष्णेतले अतिरिक्त पाणी माण आणि भीमा खोऱ्यात वळवून राज्यातल्या सहा जिल्ह्यांमध्ये सिंचनासाठी वळवेले जाणार होते. पण कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्प कृष्णा पाणीतंटा लवादाने केलेल्या मनाईमुळे राबविता येणार नसल्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी गुरुवारी सांगितले.
कृष्णा पाणी तंटा लवादाने एका उपखोऱ्यातून दुसऱ्या उपखोऱ्यात पाणी वळवण्यास मनाई केली आहे. त्यामुळे कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्प राबविता येत नसल्याचे मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. भीमा आणि माण नदी खोऱ्यात पाण्याची कमतरता असते. कृष्णा आणि कोयना या नद्यांच्या खोऱ्यात आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी असते. हे अतिरिक्त पाणी कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात वाहून जाते. ते पाणी भीमा नदीच्या खोऱ्यात आणण्यासाठी हा प्रकल्प प्रस्तावित आहे. मात्र, या प्रकल्पाची अंमलबजावणी करता येणार नसल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले.
कृष्णा आणि कोयनेतील अतिरिक्त पाणी दुष्काळी भागात वळवण्यासाठी कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्पाला फेब्रुवारी 2004 मध्ये प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. या योजनेमुळे पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, उस्मानाबाद आणि बीड या जिल्ह्यांतील पाच लाख 50 हजार 290 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे.
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |
देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी भाजप वचनबद्ध |
जिल्ह्यात cVIGIL (सी व्हिजील) वर 27, तर वोटर हेल्पलाईनवर 74 तक्रारी प्राप्त |
दिव्यांग व्यक्तिंसाठी मतदान केद्रांवर आवश्यक सोयी : याशनी नागराजन |