02:40am | Jan 22, 2019 |
कराड : गावच्या नेतृत्वामुळे व त्याच्याकडे असलेल्या विकासाच्या दूरदृष्टीमुळे गावचा विकास होतो. मलकापूरचा विकास महाराष्ट्रात सर्वात जास्त गतीने झाला आहे. त्यामुळेच मलकापूरची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून या विकासाचा मी साक्षीदार आहे. मलकापूर नगरपरिषद करत असताना काही नतद्रष्ट मंडळी आडवी आली. परंतु, मनोहर शिंदे यांनी उच्च न्यायालयात जाऊन मलकापूरला नगरपरिषदेचा दर्जा मिळवून दिला. मलकापूर नगरपरिषद करण्यासाठी विरोधकांनी एक तरी पत्र दिले आहे का? असा प्रश्न उपस्थित करत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी विरोधकांच्या प्रचार सभेतील भाषणे ऐकून विनोद वाटतो, हसू येते. अशा शब्दात विरोधकांची खिल्ली उडवली.
मलकपूर नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी आ. जयकुमार गोरे, मनोहर शिंदे, अजित पाटील-चिखलीकर, राष्ट्रवादीचे राजाभाऊ पाटील-उंडाळकर, काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार नीलम येडगे, धनाजी काटकर, शिवराज मोरे, इंद्रजीत चव्हाण, जयवंत जगताप, झाकीर पठाण, नामदेव पाटील, अधिकराव शिंदे, काँग्रेसचे पक्ष निरीक्षक संजय बालगुडे, मझहर कागदी, पैलवान नाना पाटील राजेंद्र यादव, यांच्यासह कॉंग्रेस पक्षाचे सर्व प्रभागातील उमेदवार उपस्थित होते.
आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मलकापूर लगत अनेक मोठी गावे आहेत. परंतु, त्यापेक्षा कितीतरी पटीने मलकापूरचा विकास गतीने झाला आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे लोकांना सोयी सुविधा अपुर्या पडू लागल्याने नगरपरिषद व्हावी म्हणून मुख्यमंत्र्यांना तीन वेळा भेटलो. वाढीव निधी मिळावा म्हणून मलकापूर नगरपरिषद होणे गरजेचे होते. परंतु, या कामातही विरोधकांनी खोडा घालण्याचे काम केले. 24 बाय 7 नळ पाणी पुरवठा योजनेमुळे मलकापूरचा सर्वत्र गवगवा होत असून या योजनेचे सर्व श्रेय भास्करराव शिंदे यांना दिले पाहिजे. शहरात अनेक उपक्रम राबवले ते सर्व उपक्रम शासनाच्या व जनतेच्या माध्यमातून राबवले आहेत. शेतकर्यांना लुबाडून किंवा डोनेशनचे पैसे घेऊन येथे कोणताही उपक्रम राबवला जात नाही, असा टोलाही त्यांनी नाव न घेता अतुल भोसले यांना लगावला.
राज्यात जेवढ्या नगरपंचायती आहेत त्यापैकी एका तरी शहरांमध्ये भुयारी गटार योजना किंवा घनकचरा व्यवस्थापन, मुलींच्या शिक्षणासाठी मोफत बससेवा, प्रियदर्शनी योजना अशा नाविन्यपूर्ण योजना आहेत का? असा प्रश्न उपस्थित करतात आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी मलकापूरने मात्र विविध उपक्रम राबवून लोकांना चांगल्या सोयी-सुविधा पुरवल्या आहेत. या योजना राबवत असताना मनोहर शिंदे यांना त्यांच्या सर्वच सहकार्यांनी हातात हात घालून साथ दिली आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदाचा सर्व नगरसेवक एका विचाराचे असल्यानंतर काय होते हे आपण मलकापूर मध्ये झालेल्या विकासकामांवरून समजू शकतो. परंतु, जर नगराध्यक्ष एका विचारांचा आणि बहुमत दुसर्या विचाराचे असेल तर काय होते. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे आपल्याला कराडकडे पाहता येईल.
आम्ही सत्तेवर असताना मलकापूरसह संपूर्ण तालुक्याला भरभरून निधी दिला. परंतु तुम्ही सत्तेत असताना काय केले ते सांगा? असे आव्हान देत तुम्ही आमच्या पेक्षा जास्त निधी आणणे गरजेचे होते. नुसती मंत्र्यांच्या भोवती लुडबूड करून स्वतःचे व स्वतःच्या संस्थांचे हित बघितले. मलकपूर नगरपरिषद निवडणुकीत विकास कामांवर बोलता येत नसल्याने ते इतर गोष्टींवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. मलकापूर कॉंग्रेसची पुन्हा येणार आहेच. पण राज्य व केंद्रातही कॉंग्रेसच सत्तेवर येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आमदार जयकुमार गोरे म्हणाले पाच वर्षांपूर्वी जी मंडळी बाबांबरोबर त्यांच्या गाडीतून फिरत असताना बाबांशिवाय पर्याय नाही, असे सांगत होती तीच मंडळी आता त्यांच्यासमोर उभी आहे. पैसा सगळ्यांकडेच असतो. त्या पैशाच्या जोरावर काय करावे, याला काही मर्यादा असतात. पृथ्वीराजबाबा हा आमचा, मलकापूरकरांचा, काँग्रेस पक्षाचा स्वाभिमान आहे. या स्वाभिमानाला हात घालणार्यांना सोडणार नाही. बाबांवर बोलताना भान ठेवून बोला, असा इशाराही त्यांनी विरोधकांना दिला.
मनोहर शिंदे म्हणाले, काँग्रेसच्या एकजुटीची सुरुवात मलकापूरमधून होत आहे याचा आनंद आहे. देशाच्या कानाकोपर्यात मलकापूरचे नाव गेले आहे. येथील जनता विकास कामांनाबरोबर, बाबांच्याविधायक विचाराबरोबर, कॉंग्रेसच्या विचारधारे बरोबर आहे. मलकापूरची नगरपंचायत झाली हाच शहराच्या विकासाचा टर्निंग पॉईंट ठरला. ज्यांनी चोवीस बाय सात योजनेला विरोध केला तीच मंडळी आता मीटरच्या नावाने ओरडत आहेत. परंतु योजना सुरु होताना झोपडपट्टीमधील लोकांबरोबरच अनेकांना मोफत मीटर दिली आहेत ही योजना अखंडपणे दहा वर्षे झाली सुरू आहे. परंतु विकासाच्या आड येणारी प्रवृत्ती मलकापूर निवडणुकीच्या निमित्ताने विरोध करत आहेत. नगरपरिषद होऊ नये म्हणून उपोषण करणारी मंडळी कोण होती? ती आता कुठे आहेत? याचा जाब मतदारांनी त्यांना विचारला पाहिजे. मलकापूरबाबत विकासाच्या गप्पा मारणार्यांनी अगोदर आपला गाव सुधारावा आणि मग येथे येऊन गप्पा माराव्यात, असा टोलाही त्यांनी अतुल भोसले यांना लगावला. कृष्णा हॉस्पिटल हे मलकापुरात असून माझ्या गावातील ती एक शाळा आहे. गावच्या शाळेत माझी मुलगी शिकली आहे. ती रेठर्याला किंवा इतर ठिकाणी शिक्षणासाठी गेली नाही. कारखान्याला घातलेल्या उसाच्या पैशातून ट्रस्ट व ही शाळा उभी राहिली आहे. मलकापूरच्या विकास आराखड्याबाबत बोलताना मनोहर शिंदे म्हणाले, केवळ 51 आरक्षण मंजूर केली आहेत. 120 कोटी रुपये निधी आणल्याचे सांगत असताना मलकपुरसाठी किती निधी दिला, हे त्यांनी एक वेळ जाहीर करावे, असे आव्हानही शिंदे यांनी विरोधकांना दिले. रेठर्याला मीटर फुकट दिले म्हणणार्यांनी अगोदर तेथे मीटर आलेत का, याची माहिती घ्यावी आणि मग बोलावे, सल्लाही त्यांनी दिला.
आनंदराव सुतार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मजहरभाई कागदी, अजित पाटील-चिखलीकर, जयवंत जगताप, राजाभाऊ उंडाळकर, अधिकराव शिंदे, हनीफ मुल्ला, राजेंद्र यादव, संभाजी येडगे, गुणवंत भोसले, धनाजी काटकर यांची भाषणे झाली.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |