जळगाव : विभिन्न विचारसरणी असलेले तीन पक्ष एकत्र येऊन स्थापन झालेले महाविकास आघाडीचे सरकार फार काळ टिकणार नाही, अशी टीका भाजपकडून सुरू आहे. यावर मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरात जोरदार प्रत्युत्तर दिले. 'आमचं सरकार मजबूत आहे. आम्ही एकत्र आहोत. तुमच्यात हिंमत असेल तर आमचं सरकार पाडून दाखवा', अशा शब्दांत त्यांनी भाजपला खुले आव्हान यावेळी दिले.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तारूढ झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरात प्रथमच शिवसेना, राष्ट्रवादी तसेच काँग्रेसचा एकत्रित जाहीर शेतकरी मेळावा पार पडला. या मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. ठाकरेंसोबत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील उपस्थित होते.
मेळाव्यात भाषण करताना उद्धव ठाकरेंनी भाजपचा खरपूस समाचार घेतला. ते पुढे म्हणाले, राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या विकासाचा हेतु डोळ्यासमोर ठेऊन आम्ही एकत्र आलो आहोत. सरकारच्या कामकाजाला सुरुवात झाल्यावर विरोधीपक्ष असलेल्या भाजपकडून सतत टीका-टिप्पणी केली जात आहे. विभिन्न विचारसरणी असलेले तीन पक्ष एकत्र येऊन स्थापन झालेले महाविकास आघाडीचे सरकार किती दिवस चालेल. आम्ही लवकरच सत्तेत येऊ, असे भाजप नेते सांगत सुटले आहेत. मात्र, आम्ही एकत्र आहोत आणि आमचे सरकार मजबूत सरकार आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
एप्रिलनंतर 'ऑपरेशन लोटस' नावाची मोहीम भाजप हाती घेणार आहे. मात्र, त्याचा काही उपयोग होणार नाही. महाराष्ट्रातल्या जनतेने तुम्हाला बाजूला लोटले ना. आता पुन्हा जनता तुम्हाला परत दूर लोटल्याशिवाय राहणार नाही. महाविकास आघाडीचे सरकार ५ वर्षे पूर्ण करेल. हिंमत असेल तर उद्या कशाला आज नाही तर आत्ताच सरकार पाडून दाखवा, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी भाजपावर टिकास्त्र सोडले. महाविकास आघाडीचे सरकार हे सर्वसामान्य तसेच गोरगरीब जनतेचे सरकार आहे. आमचे सरकार आल्यानंतर संपूर्ण राज्यातील जनतेच्या मनात आनंद आहे. हे सरकार शेतकरी, सर्वसामान्य लोकांची आस्थेवाईकपणे चौकशी करणारे, त्यांचा कैवार असलेले सरकार आहे, असेही ठाकरे यावेळी म्हणाले.
उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात भाजप नेते एकनाथ खडसेंना देखील चिमटे काढले. मुक्ताईनगरातील जनतेने विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराला पराभूत करून मुक्ताईनगरला खऱ्या अर्थाने मुक्त केले आहे, असे सांगत ठाकरेंनी खडसेंवर अप्रत्यक्षपणे त्यांच्याच मतदारसंघात टीका केली.
गेली ३० वर्षे युतीच्या माध्यमातून ज्या भाजपसोबत आम्ही राहिलो, त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला नाही. आम्ही काही त्यांचे गुलाम नव्हतो. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्यावर विश्वास दाखवला. सत्ता स्थापनेपूर्वी एका राजकीय बैठकीत आमच्या विचारांमध्ये एकमत झाले, असे सांगत उद्धव ठाकरेंनी भाजपच्या कार्यपद्धतीवर टीका केली.
महाराष्ट्र राज्याला देशातील क्रमांक एकचे राज्य बनवण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार कटिबद्ध आहे. केंद्रानेही राज्याला यासाठी भरीव निधी देऊन मदत करण्याची गरज आहे. यापुढील काळात केवळ शेतीवर अवलंबून न राहता उद्योग-व्यवसायांकडे वळण्याची गरज आहे. जळगाव जिल्ह्यात कृषीसह औद्योगिक क्षेत्राचा विकास व्हावा म्हणून शासनाने लक्ष देण्याची गरज आहे. महिला सबलीकरणासाठी बचतगटांना अल्पदरात कर्ज उपलब्ध करून दिले पाहिजे, असेही यावेळी शरद पवार म्हणाले. या मेळाव्याला कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील, कृषिमंत्री दादा भुसे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, मेळाव्याचे संयोजक आमदार चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |