06:19pm | Apr 16, 2018 |
फलटण : केंद्रातील मोदी सरकार भारतीय राज्य घटना बदलणार असल्याचा अपप्रचार विरोधक करीत असले तरी त्यामध्ये काहीच तथ्य नसल्याचा निर्वाळा देत भारतीय संविधान हेच सर्वश्रेष्ठ असल्याने हा देश मनुस्मृतीवर नव्हे तर भारतीय संविधानावर म्हणजेच भिमस्मृतीवर चालेल असे स्पष्ट प्रतिपादन भाजपाचे राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी केले.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त केंद्र शासनाने व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत सोनगांव, ता. फलटण येथे विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
भारतीय संविधान बदलले जाणार आहे असे सांगून दलित आदिवासी समाजात व सवर्ण समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न विरोधक करीत आहेत हा प्रकार चूकीचा आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जर भारतीय संविधान लिहिले नसते तर चहा विकणारे नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान झाले नसते मोदी भारतीय संविधानाला राष्ट्रग्रंथ मानतात त्यांच्या सरकार कडून संविधानाचा व डॉ आंबेडकर यांचा नेहमीच सन्मान करण्यात आला असल्याचे खा. साबळे यांनी स्पष्ट केले.
देशात राजकीय, धार्मिक, सामाजिक, आर्थिक प्रश्न निर्माण झाल्यास अथवा संसदेत चर्चा करून निर्णय घेण्यासाठी या देशातील कायदे पंडीतांसह इतरांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा संदर्भ व मत तपासून निर्णय घ्यावा लागतो यावरुन डॉ. आंंबेडकर किती विद्ववान होते हे वेगळे सांगण्याची गरज नसल्याचे स्पष्ट प्रतिपादन खा. साबळे यांनी केले
या देशात गरीबी हटविण्याची घोषणा केली गेली मात्र गरीब गरीबच राहिले, तथापी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहचविण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त देशातील दलित आदिवासी समाजाच्या व विकासापासून वंचित असलेल्या गावांचा विकास करण्याची योजना आखली असल्याचे खा. अमर साबळे यांनी निदर्शनास आणून दिले. संपूर्ण देशातील अनुसूचित जातीच्या व जमातींच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जास्त असलेली गावे देशातील खासदारांनी ग्रामस्वराज अभियानांतर्गत दत्तक घ्यावीत, तसेच त्या गावातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवावा, असे आदेश देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. त्यांचा आदेश शिरसावंद्य मानून सोनगाव या गावामध्ये विकासाची गंगा पोहोचविण्याचे काम मी करणार आहे. सोनगावच्या विकासासाठी कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नाही, असे प्रतिपादन खा. अमर साबळे यांनी केले. दरम्यान, खा. साबळे यांचे फलटण शहरात आगमन झाल्यानंतर त्यांनी येथील नगरपरिषदेसमोर असणार्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून त्यांना वंदन केले. यावेळी भाजपा पदाधिकार्यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.
सोनगाव, ता. फलटण येथे कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर समता सामाजिक प्रतिष्ठान सरडे ता. फलटण यांनी आयोजित केलेल्या अभिवादन कार्यक्रमात ते उपस्थित होते. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, युवा नेते सह्याद्री कदम, तालुकाध्यक्ष सुशांत निंबाळकर, बजरंग गावडे, सरपंच रामदास शेंडगे, संग्राम निकाळजे, सोनगावचे सरपंच बुरुंगले, उपसरपंच भंडारे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सरडे ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच रामदास शेंडगे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी दत्ता भोसले, तंटामुक्ती समिती अध्यक्ष लक्ष्मण बेलदार, मारूती बेलदार, राजकुमार शेंडग, जगन्नाथ एजगर, क्रांतिसिंह नाना पाटिल हायस्कूलचे मुख्याध्यापक भरत गरगडे, आप्पा वाघमोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |