पंढरपूर हे अवघ्या मराठी माणसांच जिव्हाळ्याच श्रद्धास्थान, धर्म, जात, पंत याच्या पुढे जावून ज्या भागवत संप्रदायांनी भागवत संप्रदायाचा समतेचा पाया रचिला आणि वारकरी परंपरा सुरु केली. संत नामदेव, संत ज्ञानेश्वरांनी पांडुरंगाला केंद्रस्थानी ठेवून हा भक्ती संप्रदाय त्यांच्या अनमोल साहित्य रचनेतून उभा केला. संत तुकाराम महाराजांनी सामान्यांना समजेल, रुचेल, पचेल अशा अभंग रचना रचून महाराष्ट्रात मोठी प्रबोधनाची चळवळ आपल्या किर्तनातून उभी केली. अशा महान परंपरेचे प्रतीक म्हणजे हा पालखी सोहळा आहे. त्याचा हा आढावा…!!
संत तुकाराम महाराजानंतर 1685 पर्यंत पारंपारिक वारीचे स्वरुप बदलले आणि तुकाराम महाराजांचे चिरंजीव नारायणबाबा यांनी संत तुकारामांच्या आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका घेवून पालखी सोहळा सुरु केला. 1830 पर्यंत दोन महान संतांच्या पादुका सोबत घेवून जाणारा पालखी सोहळा एकत्र होत होता. हैबतबाबांनी ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 1832 मध्ये वेगळा सुरु केला. एकाच मार्गावर प्रचंड गर्दी होवू नये आणि दोन पालखी सोहळे वेगवेगळे झाले. संत तुकाराम महाराजांची पालखी हडपसर पासुन पुढे लोणी काळभोर मार्गे यवत, इंदापूर करत वाखरीला पोहचते. तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी हडपसर वरुन सासवड, जेजुरी, लोणंद, फलटण बरड मार्गे वाखरीला पोहचते. पंढरीसी जा रे आलेनो संसारा,दिवाचा सोयरा पांडूरंग असा हा पांडुरंगाच्या भेटीसाठी अतूर असलेला पालखी सोहळा फक्त महाराष्ट्रापुरताच नव्हे तर उभ्या देशाच्या श्रद्धेचा आणि कौतुकाचा विषय झाला आहे. या पालखी सोहळ्याला शासनाकडून सर्वोतोपरी मदत केली जाते. यासाठी प्रशासन पालखीच्या पूर्वी दोन महिने पूर्व तयारीला लागते. पालकमंत्री, विभागाचे आयुक्त, त्या त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी याचा आढावा घेतात. सातारा जिल्ह्यात निरा नदी ओलांडून पालखी आत येते. जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी प्रशासनातील सर्व प्रमुख मोठ्या उत्साहात या पालखीचे स्वागत करतात. याही वर्षी दिनांक 13 जुलै रोजी पालखी चार दिवसांच्या मुक्कामासाठी साताऱ्यात येत आहे, त्या निमित्ताने प्रशासनाने या मार्गावर जय्यत तयारी केली आहे.
पालखी सोहळ्या दरम्यान वारकऱ्यांची मोठी गर्दी होणार आहे. गर्दीमुळे मोबाईलच्या रेंजवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने यासाठी महत्वाच्या 12 अधिकाऱ्यांना वॉकीटॉकी देण्यात येणार आहे.
‘संवादवारी’ अभिनव उपक्रम
या वर्षी पासून महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने ‘संवाद वारी’ हा अभिनव उपक्रम सुरु केला आहे. या संवाद वारीत शासनाच्या विविध योजना, उपक्रमाच्या संदेशाचे प्रसारण करण्यात येणार आहे. ‘संवाद वारी’द्वारे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मार्गावर पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणी प्रदर्शन, पथनाट्य,कलापथक यांचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. शासनाच्या शेती आणि ग्राम विकासाशी निगडीत विविध योजना, उपक्रमांची माहिती या‘संवाद वारी’तून दिली जाणार आहे. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, अखंड वीजपुरवठा,गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, मुख्यमंत्री सहाय्यता निधी, बाजार समित्यामध्ये सुधारणा, डिजिटल सात-बारा,उन्नत शेती - समृद्ध शेतकरी, महात्मा फुले जन आरोग्य योजना अशा विविध योजनांच्या माहितीचा यात समावेश आहे.
पंढरपूर येथे आयोजित केल्या जाणाऱ्या पाच दिवसांकरिताच्या भव्य प्रदर्शनात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘संवाद वारी’ चे दालन असणार आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर या ‘संवाद वारी’चे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा प्रारंभ पुण्यातून झाला आहे.
कार्यक्रमाचे ठिकाण व तारीख :
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग -
लोणंद-दि. १२ व १३,
फलटण- दि. १४, १५, १६,
पालखी मार्गावर विशेष चित्ररथ देखील सहभागी होणार आहे. या संवाद वारीतील प्रदर्शन, पथनाट्य,कलापथक याचा अधिकाधिक लोकांनी लाभ घ्यावा.
पालखी ज्या ठिकाणी मुक्कामी थांबते त्या ठिकाणी पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणत येतात. या ठिकाणी गोंधळ अथवा चेंगराचेंगणी होणार नाही यासाठी खबरदारी घेण्यात येणार आहे. पालखी सोहळ्या दरम्यान आरोग्य विभागाने 25 रुग्णवाहिका व 49 आरोग्य अधिकाऱ्यांचे पथक तैनात करण्यात येणार आहे, त्यांच्याकडे मुबलक असा औषधसाठा उपलब्ध असणार आहे. वारकऱ्यांना पिण्यासाठी पुरविण्यात येणाऱ्या पाण्याचे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिवसातून दोन वेळा नमुने तपासले जाणार आहेत. राज्यात प्लास्टीक बंदी असल्यामुळे वारकऱ्यांना कापडी किंवा कागदी पिशव्या कशा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |