06:58pm | Jun 22, 2018 |
सातारा : राष्ट्रीय महामार्गासाठी आपल्या जमिनी देणार्या भूमिपूत्र व त्यांच्या नातेवाईकांनी उपजिविकेसाठी प्रवासी वाहतूक करणार्या काळ्या-पिवळ्या वाहनांचे परवाने घेतले. गेली अनेक वर्षे आनेवाडी टोलवसुली व्यवस्थापनाने सहकार्य केले. परंतू आता 1 जुलैपासून या वाहनांचा टोल वसूल केला जाईल, असे सांगण्यात आल्यामुळे आज सुमारे 300 स्थानिक काळ्या-पिवळ्या वाहनचालकांनी भाजपचे नेते व जि.प. सदस्य तसेच वाहतूक संघटनेचे अध्यक्ष दीपक पवार यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री विजय शिवतारे यांची भेट घेतली. त्यावेळी स्थानिकांच्या काळ्या-पिवळ्या वाहनांना आनेवाडी टोलनाक्यावर टोलमाफी मिळावी, यासाठी जिल्हाधिकार्यांना पालकमंत्र्यांनी सूचना केल्या आहेत. पालकमंत्र्यांनी पुढाकार घेतल्यामुळे वाहनधारकांच्या चेहर्यावरील चिंतेचे भाव कमी झालेले आहेत.
गेली अनेक वर्षे महामार्गावर सातारा-वाई, सातारा-भुईंज अशी प्रवासी वाहतूक करणारे स्थानिक भूमिपूत्र आहेत. पूर्वी डिझेला प्रती लिटर सात रुपये दर होता, आणि पाच रुपये भुईंज व आठ रुपये वाई असे प्रवाशांकडून भाड्यापोटी पैसे घेतले जात होते. सध्या डिझेलचा प्रति लिटर दर 71 रुपये आहे. त्यामुळे पैशाची सांगड घालताना आर्थिक चणचण भासते. आता टोल दिला तर दिवसभर दोन फेर्या करुन कमाईतील साठ टक्के रक्कम टोलसाठी वेगळे काढावे लागणार आहेत. किकली, देगाव, भुईंज, पाचवड, उडतारे, विरमाडे, आनेवाडी, रायगांव, आसले, मोरघर, महिगांव, कवठे, ढगेवाडी, लिंब, नागेवाडी परिसरातील द्विपदवीधर, सुशिक्षित बेरोजगार व माजी सैनिक बँकेचे कर्ज काढून वाहन घेवून व्यवसाय करीत आहेत. मांढरदेव येथील दुर्घटना व एसटी महामंडळाने केलेल्या संपामध्ये या काळ्या-पिवळ्या प्रवासी वाहनधारकांनी मानवता भावनेतून मदत केली आहे. त्यामुळे त्यांना टोलमाफी मिळावी, अशी विनंती राजेंद्र कांबळे, विकास चोरगे, माजी सैनिक मेजर मुलाणी, जवाहर शिंदे, राजू लोखंडे व अन्य वाहनचालकांनी केली आहे. सध्या टोल वसुली व्यवस्थापन बदलल्यामुळे तुम्हाला टोलमाफी हवी असेल तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे पत्र आणा, असे टोलवसुली ठेकेदाराने सांगितले आहे. याबाबत संतप्त झालेल्या स्थानिकांनी टोल वसुलीचा ठेका घेताना संबंधित ठेकेदाराने कोणाचे पत्र अथवा शिफारस आणली आहे, हे जाहीर करावे असे सूचित केले.
आज पालकमंत्री यांनी स्थानिक काळ्या-पिवळ्या वाहनधारकांच्या समस्या जाणून घेवून त्यांचे निवेदन स्विकारले व त्यावर आपला शेरा मारुन ते निवेदन जिल्हाधिकार्यांकडे पाठविले. सध्या आनेवाडी टोल वसुली व्यवस्थापन अशोक सावंत व विकास शिंदे पाहत आहेत. त्यांनी स्थानिकांच्या त्यागामुळेच आनेवाडी येथे टोलनाका स्थापन झाला आहे. अन्यथा हा टोलनाका त्याठिकाणी आलाच नसता, याची जाणीव ठेवावी, अशी विनंती अजित जगताप यांनी केली आहे.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |