सातारा : स्वातंत्र्यपूर्व काळापासून स्वातंत्र्योत्तर काळात मरेपर्यंत जातीअंत, सामाजिक न्याय, तळातील, उपेक्षित समाजाला न्याय मिळावा यासाठी धडपडणारे व्यक्तिमत्व म्हणजे भाई वैद्य. सध्याच्या काळात भाई वैद्य उणीव अधिकच भासेल. त्यांचे विचार आणि कार्य यापुढेही नेटाने पुढे सुरु ठेवणे हीच हीच खऱ्या अर्थाने त्यांना आदरांजली ठरेल. असे प्रतिपादन जेष्ठ विचारवंत प्रा.डॉ. आ. ह. साळुंखे यांनी सातारा येथे बोलताना केले.
परिवर्तनवादी संघटना समन्वय समितीच्या वतीने सातारकर नागरिकांच्या वतीने जेष्ठ समाजवादी विचारवंत स्मृतिशेष भाई वैद्य याना आदरांजली वाहण्यासाठी सातारा येथील पाठक भवन मध्ये जेष्ठ विचारवंत प्रा.डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा आयोजित केली होती. त्यावेळी प्रा.डॉ. आ. ह. साळुंखे बोलत होते. विचारमंचावर जेष्ठ विचारवंत डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार विजय मांडके उपस्थित होते.
माझा व भाईंचा परिचय २५ वर्षाहून अधिक काळाचा होता. कोणत्याही गोष्टीचा अभ्यास करून बोलणे हि त्यांची खासियत होती. माझ्या पुस्तकातील संदर्भ देतानाही ते नेहमीच वरवर न बोलता पानांचा संदर्भ देऊन ते बोलत असत. अभ्यासपूर्ण मांडणी करणे हा त्यांच्या वैशिट्यातील अविभाज्य भाग होता असेही प्रा.डॉ. आ.ह.साळुंखे म्हणाले.
साथी एस एम जोशी, साथी ना. ग. गोरे यांच्या नेतृत्वाखाली भाई वैद्य यांच्यातील कार्यकर्ता घडला. धर्मनिरपेक्ष विचाराचे भाई सतत हिंदू - मुस्लीम यांच्या ऐक्यासाठी निस्पृहपणे कार्यरत राहिले. जाती अंताच्या कार्यात ते झटत राहिले. असे सांगून राष्ट्र सेवा दलाच्या शाखेतील भाईंचे सहकारी प्राचार्य पुरुषोत्तम शेठ यांनी भाईंच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.
स्मगलरकडून लाच स्वीकारण्यास सांगून त्या स्मगलरांच्या मुसक्या आवळण्यात भाई वैद्य कसे यशस्वी झाले याची आठवण व घटना त्यावेळचे कस्टमचे सब इन्स्पेक्टर विजय देशपांडे यांनी सांगितली. तर राष्ट्रसेवा दलाचे माजी जिल्हा अध्यक्ष कॉ. किरण माने यांनी साताऱ्यातील एका स्वातंत्र्य सैनिकांच्यावर अन्याय झालेला समजताच रात्रीच कशी अन्यायाला वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून दिला हे सांगितले .
यावेळी जेष्ठ विचारवंत डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार विजय मांडके, राष्ट्र सेवा दलाचे उपेंद्र पिसे, माकपचे कॉ वसंतराव नलावडे, सातारा शहर काँग्रेसचे अध्यक्ष रवींद्र झुटिंग, अंगणवाडी संघटनेचे शौकत पठाण, यांनीही आदरांजली वाहिली .
यावेळी कॉ अंजलीताई महाबळेश्वरकर, अरुण गोडबोले, माजी नगराध्यक्ष डॉ. अच्युत गोडबोले, मानसोपचारतज्ञ् डॉ. प्रसन्न दाभोलकर, गणपतराव साळुंखे, भगवान अवघडे, उदय चव्हाण, कॉ.अस्लम तडसरकर, शिवाजी राऊत, कॉ शंकर पाटील, कॉ शिवाजी पवार, मिनाज सैयद, जयंत उथळे, प्रा. युवराज जाधव, प्रा. अमृत साळुंखे, महेश गुरव, लखन जगताप , अमित कांबळे डॉ. राजेंद्र माने, दिलीप ससाणे, संजय म्हस्के, अनिल मोहिते, यांचेसह अनेकजण यावेळी उपस्थित होते.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |