01:29am | Aug 26, 2018 |
कोरेगाव : भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी देशात 91 टक्के लोक निरक्षर होते. त्यामुळे जात, धर्म यामध्ये देशातील जनता अडकलेली होती. म्हणजेच ती पारतंत्र्यातच होती. मनुस्मृतीच्या विळख्यात अडकली होती. मनुस्मृती भारतीय जनतेच्या रक्तातच मिसळली असल्याने ती टाळण सोपं नाही. यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून जाती-धर्माची बंधने तोडली पाहिजेत आणि जातीधर्माच्या पलिकडे जावून सर्वांना भारतीय बनले पाहिजे, याशिवाय आम्हाला खर्या स्वातंत्र्याचा आनंद घेता येणार नाही, असे मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांनी व्यक्त केले.
कोरेगाव येथील स्व. शंकरराव जगताप यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉ. कुमार सप्तर्षी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोरेगाव एज्युकेशन सोसायटीच्या विद्यमान अध्यक्षा सुनीता जगताप, उपाध्यक्ष भीमराव पाटील, सचिव गजानन बगाडे, सहसचिव जगन्नाथ कोरडे, कार्यालयीन सचिव चंद्रकांत वीरकर, खजिनदार दत्तात्रय महाजन उपस्थित होते.
डॉ. सप्तर्षी म्हणाले, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मोठ मोठ मोर्चे निघतात. आजमितीस मराठा समाजात 37 जाती आहेत. त्यांच्यामध्ये उच्च निचता सुरू आहे. त्यांच्यामध्ये रोटीबेटी व्यावहार होत नाहीत. ब्राम्हण समाजात 22 जाती आहेत. तीच परिस्थिती धनगर, माळी, बौद्धांसहीत सर्वच जातीमध्ये सारखी आहे. त्यांच्यातही उच्चनीचता सुरू असते. जातीची बंधने आपल्याला गुलामित ढकलतात आणि धर्माची बंधने आपल्याला समाजात, माणसामाणसात द्वेष करणे शिकवतात. त्यामुळे जातीधर्माची बंधने झुगारून, शिक्षणाच्या माध्यामातून खर्या स्वातंत्र्याचा आणि भारतीय असल्याचा मुक्तीचा आनंद घ्या, असे आवाहन त्यांनी केले.
भारतावर वर्षानुवर्षे मनुस्मृतीचा, मनुवादाचा पगडा तीन टक्के असलेल्या ब्राम्हण समाजाने ठेवला आहे. देव मनुवाद्यांनी ताब्यात घेतले आहेत आणि देवाची भिती दाखवून त्यांनी वर्षानुवर्षे जातीय व्यवस्था आणि धर्म व्यवस्था वर्षानुवर्षे चालवली आहे. ब्राम्हणांनी स्वत:कडे देव, पावित्र्य यांचा अधिकार घेतला. क्षत्रियाकडे समाजाला घाबरवण्याचा अधिकार दिला. वैश्याला समाजाला उजळ माथ्याने लुटण्याची जबाबदारी दिली आणि क्षुद्राला केवळ जगण्यापुरता आणि मरेपर्यंत इतरांची सेवा करण्याची कायमस्वरूपी जबाबदारी दिली. आणि शिक्षणापासून परावृत्त करण्याचा कायमस्वरूपी उपाययोजना केली. हीच परिस्थिती आजही सुरू आहे. गोरक्षण, नोटबंदी याच्या माध्यामातून देशाची आणि राज्याची सत्ता राबवणारे तळागाळातील गोरगरीब जनतेचे छोटे छोटे उद्योगधंदे, उद्धवस्त करीत आहेत. जीएसटी कर लादून छोटे व्यावसायिकांचे उद्योग बंद पाडून मोठ मोठ्या परदेशी कंपन्यांसाठी विद्यमान शासन पायघड्या घालत आहे. मेकइन इंडिया या गोंडस नावाखाली रस्ते, पूल, बंदरे, मॉल बांधून मोठ्या उद्योगपतींना विशेषत: परदेशी उद्योगपतींना अधिक मोठे करण्याचे आणि गरीब माणूस, कष्टकरी, व्यावसायिक उद्धवस्त करायचे काम विद्यमान मनुवादी शासनाकडून सुरू आहे, असे उद्गार डॉ. सप्तर्षी यांनी काढले.
ज्या ज्या समाजाने, देशाने स्त्रीचा आदर केला, शिक्षणाची कास धरली, अंधश्रद्धा जुन्या रूढी-चालीरिती, जातीधर्म याविरूद्ध उठाव केला त्या त्या समाजाची, त्या त्या देशाची प्रगती झाली. स्व. शंकरराव जगताप हे समकालीन माझे मार्गदर्शक होते. आम्ही दोघांनी शिक्षणाची कास धरली. आज सलग 47 वर्षे राजकारणात राहून महाराष्ट्राची महत्वाची पदे सांभाळून समाजकारण, कोरेगाव तालुका परिसराचा सर्वांगीण विकास करत असताना कोरेगावच्या भागात शिक्षणाच्या सोयीसुविधा उपलब्ध करून शिक्षण संस्थेच्या माध्यमातून पुढील पिढी घडवण्याचे काम त्यांच्या पश्चातही कोरेगाव एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून त्यांच्या कन्या सुनीता जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याचे पाहून मनाला समाधान वाटत आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |