सातारा : निवडणूक आली की काही लोक गुडघ्याला बांशिंग बांधून बहुरुप्यासारखे सैरावैरा धावत सुटतात. सातार्याच्या राजकारणात लिंब गटातील जनतेची मते निर्णायक असतात. माझ्या विजयातही लिंब गटाचा सिंहाचा वाटा आहे. काही बहुरुपी मात्र आमदारकीचे स्वप्न उराशी बाळगून फिरु लागले आहे. गत निवडणूकीत उगवलेले हे भुछत्र गेले तीन- चार वर्ष गायब झाले आता ते पुन्हा उगवले आहे. अशा बहुरुप्यांना जनता कधीही भुलणार नाही, अशा शब्दात आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कोणाचेही नाव ने घेता जोरदार टोलेबाजी केली.
लिंब ता. सातारा येथे आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या कृष्णा नदीवरील कोल्हापूर पध्दतीच्या बंधार्याचे भुमीपूजन, बोहरील आळी येथे अंतर्गत डांबरीकरण, भैरवनाथ आळी परिसरात पेव्हर ब्लॉक बसवणे, बौध्दवस्ती येथे अंतर्गत गटर, काँक्रीटीकरण, पाणी टाकी व पाईपलाईन करणे आदी विकासकामांचे भुमीपूजन व उदघाटनप्रसंगी आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती सौ. वनिता गोरे, माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, माजी सभापती सतीश चव्हाण, विद्यमान सदस्य प्रतीक कदम, सौ. कमल जाधव, पंचायत समितीचे उपसभापती जितेंद्र सावंत, सदस्य सौ. सरिता इंदलकर, राहुल शिंदे, दयानंद उघडे, सौ. छाया कुंभार, अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव सावंत, गणपतराव शिंदे, धनंजय शेडगे, राजेंद्र शेडगे, सरपंच सौ. विद्या सावंत यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. लिंब हे महाराजांचे गाव. त्यांनी गावात स्वार्थासाठी ग्रामसभा घेण्यापेक्षा विकासकामे आणायला हवी होती. भाजपचे सरकार हे पुर्णपणे शेतकरी विरोधी असून केवळ राजकारणापोटी सहकारी बँका अडचणीत आणण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे.
या सरकराने सातार्यासह पुणे, नगर यासह अन्य जिल्हा बँकांच्या नोकर भरती प्रक‘ीयेवर अटकाव आणला आहे. तसेर साखरेचे दर तीन हजारापेक्षा कमी केल्याने साखर उद्योगही अडचणीत आणला आहे. साखर कारखान्याबाबत हे सरकार योग्य निर्णय घेत नाही. वास्तविक डिसेंबरमध्ये निर्णय घेणे आवश्यक असताना आज अखेर सरकारने निर्णय घेतला नसल्याने साखर कारखाने अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकर्याला योग्य भाव देताना अडचणी येत आहेत, असे आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले. सातार्याच्या राजकारणात लिंब गटाला अनन्यसाधारण महत्व आहे. लिबंचे वर्चस्व नेहमीच कायम आहे. याची प्रचिती सर्वांना आलीच आहे. लिंब गटातील कोट्यवधी रुपयांची कामे मार्गी लावली आहेत. आजही अनेक कामांचे भूमीपूजन झाले.
या सर्व कामांचे श्रेय खर्या अर्थाने जितेंद्र सावंत यांचे आहे. कॅप्टन अण्णांमुळेच अजिंक्यतारा कारखाना अडचणीतून बाहेर आला आहे, असेही आ. शिवेंद्रसिंहराजे यावेळी म्हणाले. दातृत्वापेक्षा कर्तृत्व महत्वाचे आहे. हीच भुमीका माझी नेहमी राहिली आहे आणि पुढेही राहणार आहे. मी तुमच्यामुळेच लोकप्रतिनिधी म्हणून उभा आहे. भविष्यात आगामी निवडणूकीसाठी अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. मात्र निवडणूकीनंतर हे बाशिंगबहाद्दल पुन्हा पाच वर्षांनंतरच दिसतील. राजकारणापेक्षा मी नेहमीच समाजकारणाला आणि विकासाला महत्व दिले आहे. यापुढेही या तत्वाला बांधील राहणार असल्याचे स्पष्ट करतानाच माझ्या कार्यकर्त्यांच्या वाटेला जाल तर, जशास तसे उत्तर मिळेल असा इशाराही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी दिला.
आ. शिवेंद्रसिंहराजेंमुळेच लिंब गटासह संपुर्ण तालुक्यात खर्या अर्थाने विकासकामे झाली आहेत. लिंब गावच्या विकासासाठी 90 टक्के समाजकारण आणि 10 टक्के राजकारण करणार असून आपल्या भागात विकासासाठी राजकारण करणार पण, दमबाजीचे आणि खोटेपणाचे राजकारण करणार नाही. सामाजिक ऐक्याबरोबरच यापुढेही आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मार्गदर्शनाखाली लिंब गटाच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे जितेंद्र सावंत यावेळी म्हणाले. कृष्णा नदीवरील बंधारा लिंबसाठी वरदान ठरणार आहे. लोकशाहीत कायद्याचे राज्य आहे. लिंबमधील जनतेवर कोणी अन्याय केल्यास अन्यायाच्याविरोधात जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचेही सावंत यावेळी म्हणाले. सर्जेराव सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. अॅड. अनिल सोनमळे यांनी प्रास्ताविक केले. प्रदीप पाटील यांनी आभार मानले. कार्यक‘मास लिंब व परिसरातील गावातील सरपंच, सदस्य, ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |