बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सातारा जिल्ह्यात असलेल्या खंबाटकी बोगद्याजवळील ‘एस कॉर्नर’ची दहशत गेली अठरा वर्षे प्रवाशांच्या मनावर आहे. आजवर शंभरावर निष्पाप जिवांचे बळी घेतलेल्या व शेकडोंना कायमचे जायबंदी केलेल्या या मानवनिर्मित मृत्युसापळ्याविषयी...
वीस वर्षापूर्वी पुणे - बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ हा दुपदरी होता. पण दिवसेंदिवस वाढत चाललेली लोकसंख्या व त्या बरोबरीने वाढणारी वाहने यामुळे रस्ते वाहतुक अधिक जोखमीची होत गेली. वाहनसंख्येच्या प्रमाणात रस्त्यांचा विकास न झाल्याने अपघातांचे प्रमाण वाढले. वाहतुक कोंडीची समस्या उग्र स्वरुप धारण करत गेली. यातून रस्त्यांच्या विकासाची आवश्यकता प्रकर्षाने भासू लागली.
पुणे ते सातारादरम्यान सातारा जिल्ह्यात असलेल्या खंबाटकी घाटातून पूर्वी दुहेरी वाहतुक सुरू होती. त्यामुळे अधून मधून गंभीर अपघातांची मालिका सुरू असायची. काही अपघातात कमीअधिक प्रमाणात जीवितहानी होत होती. काहीवेळा वाहतुक कोंडीमुळे घाट जाम होण्याच्या घटना घडत असत. दिवस दिवस ही कोंडी फुटत नसे. त्यात प्रवाशांची प्रचंड कुचंबणा होत असे. यावर उपाय म्हणून वीस वर्षापूर्वी तत्कालीन युती शासनाच्या काळात खंबाटकीतून सातारा बाजुकडून पुण्याकडे वाहनांसाठी नवीन बोगद्याला मंजुरी मिळाली. युध्दपातळीवर बोगद्याचे व मार्गाचे काम पूर्ण करण्यात येऊन बोगदा व मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात आला. सन २००१ मध्ये या मार्गावरून वाहतुक सुरू झाली. त्यामुळे घाटावरील ताण कमी होण्यास मदत झाली. वाहतुक कोंडीची समस्या कमी झाली. वाहतुकीला वेग आला.
११६ अपघात; १०० बळी
पण अतिवेगाचे नवे संकट घोंगाऊ लागले. पुण्याकडे जाताना बोगदा ओलांडल्यानंतर जवळपास खंडाळ्यापर्यंत तीव्र उतार आहे. त्यामुळे साहजिकच वाहनांना वेग राहतो. या उतारावर अत्यंत धोकादायक इंग्रजी ‘एस’ आकाराचे वळण आहे. ते वाहनधारकांसाठी कर्दनकाळ ठरले आहे. उताराने प्रचंड वेगात आलेली वाहने या वळणावर चालकांना आवरत नाहीत व ताबा सुटून प्राणघातक अपघात होतात. वर्षातील बाराही महिने याच वळणावर अपघातांची मालिका सुरू असते. आजवर या ब्लॅक स्पॉटला अत्यंत भीषण असे ११६ अपघात झाले आहेत. त्यामध्ये शंभरावर जण प्राणास मुकले असून २७३ जण गंभीर जखमी झाले आहेत.
परवा १० एप्रिलच्या पहाटे एस कॉर्नरवर झालेला अपघात हा आजवरचा सर्वाधिक मोठा अपघात ठरला. कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातून शिरवळला मजुरांना घेऊन चाललेला आयशर टेंपो या ठिकाणी भयानकरीत्या उलटून त्यात १८ जण ठार, तर १७ जण गंभीर जखमी झाले. अशा प्रत्येक भीषण अपघातानंतर हा एस कॉर्नर चर्चेत येतो. लोकांचा उद्वेग व्यक्त होतो. या वळणावर उपाययोजनांवर गरमागरम चर्चा होते. जसजशी घटना जुनी होत जाते, तशी ती पुन्हा विस्मरणात जाते. राज्यकत्र्यांची इच्छाशक्ती नसल्याने एस कॉर्नरवरील मृत्युसत्र थांबत नाही. हे वळण कर्दनकाळ बनून आपले अक्राळ विक्राळ रूप दाखवत आहे. सातत्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना या वळणाच्या भयानकतेविषयी कल्पना असल्याने ते येथून जाताना काळजी घेऊन, पण दहशतीच्या छायेतून जातात. तथापि, ज्यांना या वळणाविषयी फारसे माहीत नाही, ते निष्पाप जीव येथे नाहक आपले प्राण गमावून बसतात.
वळणाची बांधणी सदोष :
एस वळणावर सातत्याने होत असलेल्या अपघातांमुळे या वळणाची बांधणी सदोष झाल्याचे पुन्हापुन्हा सिध्द झाले आहे. या पापाला जबाबदार कोण ? या ठिकाणच्या मृत्यूसत्राला जबाबदार कोण ? या प्रश्नांची उत्तरे अद्यापपर्यंत मिळालेली नाहीत. सातारा पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला आजवर असंख्य पत्रे लिहून अनेकांच्या मृत्युला कारणीभुत ठरणारे हे धोकादायक वळण काढून रस्ता सरळ करण्याची विनंती केली. ग्रामस्थ, विविध पक्ष - संघटना यांनीही यासाठी सतत आग्रही भमिका घेतली. आंदोलने, उपोषणे केली. मात्र महामार्ग प्राधिकरण व संबंधित ठेकेदार यांनी कधीच हा विषय गांभिर्याने घेतला नाही. अत्यंत जुजबी उपाययोजना वगळता या ठिकाणी काहीही ठोस झाले नाही. आता परवाच्या भीषण दुर्घटनेनंतरही मूळ दुखणे तसेच ठेवून किरकोळ उपाययोजनांची मलमपट्टी सुरू आहे. हे अतिशय संतापजनक आहे.
जिल्हा प्रशासनाने याबाबत अनेकदा संबंधित विभागांची बैठक बोलावून एस कॉर्नरचे गांभीर्य ऐरणीवर आणण्याचा प्रयत्न केला. प्राधिकरणाने २०१५ मध्ये हे वळण काढून रस्ता सरळ करण्याचा निर्णय घेतला आहे. प्राधिकरणाच्या पुणे कार्यालयाने तसा प्रस्ताव तयार करून दिल्लीला वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला आहे. मात्र सरकारी कामाला गती नाही. ही कामे लाल फितीत अडवून वर्षानुवर्षे धूळ खात पडतात. तोच न्याय या कामाच्या वाट्याला आलेला दिसतो आहे.
उत्तर पश्चिम अटलांटिक महासागरातील बर्मुडा ट्रँगलच्या परिसरात गेलेली प्रचंड मोठी जहाजे, विमाने गायब होतात अशा रहस्यकथा आपण आजवर अनेकदा वाचत, ऐकत आलो. अशा ठिकाणाबद्दल लोकांच्या मनात अनामिक भीतीचे भुत घर करून बसते. रहस्य वाटाव्यात अशा घटना घडतात, तेव्हा हे भय डोके वर काढते. तेथील घटनांवर आपले नियंत्रण नाही. पण येथील आपत्ती तर मानवनिर्मितच आहे. यात कसलेही रहस्य दडलेले नाही. त्या प्रश्नाला उत्तर सापडत नसले तरी या प्रश्नाला उत्तर आहे.
- गजानन चेणगे, सातारा.
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |