03:47pm | Nov 13, 2019 |
सातारा : राज्यात अजून ही सत्ता स्थापन होत नाही.आज शेतकऱ्यांची दुरावस्था होत असताना शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी शेतकऱ्यांनी नक्की कुणाला दाद मागायची असा प्रश्न निर्माण झालेला आहे.यासाठी प्रहार जनशक्ती संघटनेच्या वतीने थेट राजभवनावरच धडक मोर्चा घेऊन जात असल्याची भूमिका ही प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने घेण्यात आलेली आहे.सातारा,सोलापूर जिल्ह्यातील अनेक शेतकरी बांधव या धडक मोर्चा साठी सज्ज झालेले असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या न्याय हक्कांसाठी या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रवक्ते तसेच सातारा,सोलापूर भागाचे संपर्क प्रमुख शंभूराजे खलाटे यांनी केलेले आहे.
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना त्वरीत मदत करावी तसेच पिकविम्याची रक्कम ताबडतोब मिळावी.तसेच शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये मिळावेत.यासाठी आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली प्रहार जनशक्ती पक्ष महाराष्ट्र तर्फे राजभवनावर धडक मोर्चा हा १४ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता घेण्यात आलेला आहे.देशाचा आर्थिक कणा असलेल्या शेतकरी बांधवांसाठी भव्य मोर्चा मलबार हिल, मुंबई राजभवनावर काढण्यात येईल असे प्रतिपादन पक्षाचे अध्यक्ष मा.आमदार.बच्चुभाऊ कडू यांनी केले.राज्यात सरकार स्थापन होण्याचा कोणताही मार्ग अजूनही दिसत नसल्याने राज्यपाल यांनी सद्यस्थितीत शेतकऱ्यांच्या अडचणींकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने राज्यातील शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झालेली आहे.
शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पावसात वाहून गेलेला आहे.महाराष्ट्रात त्वरित ओला दुष्काळ जाहीर करून शेतकरी बांधवांना शासना तर्फे त्वरित मदत मिळावी व पीकविम्याची रक्कम ताबडतोब मिळावी अशा विविध मागण्यांसाठी मोर्चा हा राजभवनावर धडकणार आहे.सातारा,सोलापूर सह महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधव व शेतमजूर यांनी या मोर्च्यात सहभागी होऊन आपला बुलंद आवाज शासनापर्यंत पोहचवण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने सहभाग घेण्याचे आवाहन आमदार बच्चुभाऊ कडू यांच्या सह प्रवक्ते शंभूराज खलाटे यांनी केलेले आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |