03:50pm | Jun 09, 2018 |
सातारा : राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या राज्यस्तरावरुन संगणकीय प्रणाली द्वारे नुकत्याच झालेल्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबत उच्च न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले असून शिक्षकांच्या बदल्या करण्याचे अधिकार एका सहाय्यक शिक्षकाला देवून या शिक्षकामार्फत रात्री-अपरात्री व्हॉटसऍपवर बदलीचे आदेश शिक्षकांना पोहोचत आहेत. तसेच यामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली असून अनियमेतते विरोधात कोल्हापूर जिल्ह्यातील 279 व सातारा जिल्ह्याातील 357 शिक्षकांनी दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी आज होवून झालेल्या अनियमिततेबाबत शासनाने आपले म्हणने 7 दिवसात सादर करावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधिश एस. सी. धर्माधिकारी व भारती डांगरे यांनी आज दिले. पुढील सुनावणी 12 जून रोजी होणार आहे.
शासनाकडे श्रेणी 1, श्रेणी 2 चे अनेक सक्षम अधिकार्यांची यंत्रणा असताना प्रदिप भोसले सारख्या सामान्य शिक्षकाला बदल्यांचे अधिकार व आतापर्यंत रात्री अपरात्री 1216 वॉट्स सुचना पोस्ट पाठवण्याचे शासनाने दिलेल्या अधिकाराबाबत उच्च न्यायालयाने जोरदार आक्षेप घेत, सर्व बदल्या शासन निर्णय 27/02/2017 नुसार झालेल्या नाहीत, असा ऍड. सतीश तळेकर यांनी मांडलेला युक्तीवाद ग्राह्य मानून न्यायाधिशांनी वरील आदेश दिले. तसेच घटना दुरुस्ती 73-74 नुसार सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना सक्षम करण्याच्या उद्देशाने अनेक स्वतंत्र असे अधिकार दिलेले आहेत. त्यातील आपल्या जि.प.कडील शिक्षकांच्या बदल्या करण्याचा अधिकार शासनाने हिरावून घेतला असून आपल्या स्तरावरुन बदल्या करुन शासनाने घटनेतील विकेंद्रीकरण कलमाचे उल्लंघन केले आहे. जिल्हा परिषदेचे बदल्यांचे अधिकार काढून घेवून मुख्य कार्यकारी अधिकारी यांना फक्त बदली आदेश शिक्षकांपर्यत पोहचविण्याचे काम लावले जात असून हा त्या पदाचा अवमान होत असल्याचेही तळेकर यांनी मे.न्यायाधिशांना सांगितले.
राज्यातील शिक्षकांच्या बदल्यांमध्ये मोठया प्रमाणात झालेल्या अनियमितते संदर्भात अनेक जिल्ह्यातील शिक्षक उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन दाद मागत असून जळगांव जिल्ह्यात झालेल्या बदली अनियमितते विरोधात दाखल झालेल्या याचिकेवर औरंगाबाद खंडपिठात सुनावणी होवून शासनाने आपले म्हणने 12 जून पर्यंत सादर करण्याचे आदेशही न्यायाधिशांनी यापूर्वीच दिले आहेत. दि. 27/02/2018 च्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार बदल्या झालेल्या नाहीत, असे अन्याय झालेल्या शिक्षकांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हंटले आहे. सन 2017-18 च्या संचमान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन प्रथम होणे गरजेचे होते, तसे झाले नाही. त्यामुळे मंजूर पदांपेक्षा जास्त शिक्षकांची पदस्थापना बर्याच शाळांवर झाली आहे. दि.27/02/2017 च्या शासन निर्णयानुसार बदली टप्प्यानुसार प्रथम समानीकरण होवून समानीकरणअंती रिक्त पदांचा अहवाल प्रसिध्द होणे क्रमप्राप्त होते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने संवर्ग 1, 2, 3 ची बदली प्रक्रिया पूर्ण करुन रिक्त पदांचा अहवाल जाहीर होणे गरजेचे होते. त्यांनतर संवर्ग 4 ची बदली प्रक्रिया सुरु करणे आवश्यक होते. पण तसे न झाल्याने अंदाजे रिक्त पदे गृहीत धरुन नाईलाजाने पोर्टलला मोघमपणे शाळा भरल्याने बरेच पर्याय वाया जावून विस्थापित यादीत नाव आले आहे.
संवर्ग 2 मधून पतीपत्नी एकत्रीकरण लाभ देताना 30 किमी पेक्षा जास्त अंरावर आहे अ ते ई या सर्व प्रकारच्या जोडीदाराला लाभ दिलेला आहे. मात्र संवर्ग 4 मध्ये 30 किमी पेक्षा कमी अंतरावर सोयीत असलेल्या (ब ते ई) या प्रकारात कोणालाच संरक्षण मिळालेले नाही. जे आत होते त्यांना 30 किमी पेक्षा लांब जावे लागणे ही बाब अन्यायकारक बदली प्रक्रिया सुरु होण्यापूर्वी संवर्ग 1 - 2 साठी आवश्यक कागदपत्रे, संवर्ग 3 - 4 साठी या जिल्ह्याातील नोकरी सुरु दिनांक व पदवीच्या प्रमाणपत्रावरील विषय (विषय शिक्षकांसाठी) याची पडताळणी होणे आवश्यक होते तसे न झाल्याने अनेक बदल्या अन्यायकारक झाल्या आहेत. उच्च न्यायालयाचा वरील निर्णय शिक्षकांना दिलासा देणारा असून राज्यातील सर्व शिक्षकांचे लक्ष 14 जूनच्या सुनावणीकडे लागले आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने ऍड. सतीश तळेकर काम पाहत आहेत.
नाशिक, पुण्यातूनही शिक्षकांच्या येणार याचिका
शिक्षक बदल्यांच्या पार्श्वभूमीवर नाशिक, पुणे, सांगली, सोलापूर या चार जिल्ह्यातील शिक्षकांच्या याचिकाही लवकरच मुंबई उच्च न्यायालयात दाखल होणार असल्याची माहिती ऍड. सतीश तळेकर यांनी दिली.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |