'दिवाळी सण मोठा, नाही आनंदा तोटा' असे म्हटले जाते. पण हे काहीअंशी खरे आणि काहीअंशी खोटे आहे. ऋण काढून सण साजरा करू नये असा सल्ला दिला जात असला तरी दिवाळी ऋण न काढता कशी साजरी करायची हा सर्वसामान्य जनतेपुढे प्रश्न आहे. नोटाबंदी व जीएसटीमुळे व्यापाराचा कणा मोडला आहे. त्यातून अद्यापही बाजारपेठ सावरलेली नाही. त्यात यावेळी दिवाळीत बाजारपेठेचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात बदललेला दिसत आहे. मॉल संस्कृतीने किराणा बाजाराला मोठा दणका दिला असून ऑनलाईन मार्केटने कापड तसेच इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंच्या बाजाराची वाताहत केल्याचे दिसून येत आहे. ज्या शेतकरी किंवा ग्रामीण जनतेवर किरकोळ बाजाराची भिस्त असते, त्या शेतकरी वर्गाच्या हातात फारसा पैसा नाही. या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम म्हणजे एकूणच दिवाळीत मॉल संस्कृतीची चांदी झाली आहे, तर किरकोळ व्यापारी वर्गाची दिवाळी काळजीची झाली आहे.
दिवाळी ही सर्वांसाठी आनंदाचा, प्रकाशाचा, तेजाचा उत्सव असला तरी शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, उद्योजक, नोकरदार, सेलिब्रिटी अशा सर्वांसाठी दिवाळीचे पैलू भिन्नभिन्न असतात. यंदाच्या दिवाळी सिझनच्या अनुषंगाने काही निरीक्षणे आवर्जुन नोंदवता येतील. शेतकरी, हातावर पोट असणारा माणूस हा किरकोळ बाजाराचा अन्नदाता वर्ग आहे. नोकरदार, उच्चभ्रू वर्ग मॉलकडे वळतो. म्हणजेच चालत येणारा वा मोटरसायकलवाला किराणा असो, कापड खरेदी करायचे असो, इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करायची असो तो किरकोळ व्यापार्याकडे जातो. मात्र, कारवाला ग्राहक मॉलकडे जाताना दिसत आहे. त्याचमुळे आताच्या दिवाळी सिझनमध्ये सातारा जिल्ह्यातील डी मार्टसारख्या ठिकाणी पार्किंगला जागा अपुरी पडली. माल घेण्यासाठी लागणार्या ट्रॉल्यांसाठी ग्राहकांना नंबर लावावे लागत आहेत. बास्केटही पुरी पडली नाहीत. खरेदी झाल्यानंतर बिलासाठी असंख्य काऊंटरची व्यवस्था करण्यात येऊनदेखील ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लावाव्या लागत आहेत. दररोज उलाढालीने कोटीकोटीची उड्डाने घेतली आहेत.
सातारा जिल्ह्यात सातारा व कराड येथे राष्ट्रीय महामार्गालगत 'डी मार्ट' हे भव्य मॉल आहेत. लवकरच वाईलाही 'डी मार्ट' होत आहे. हे मॉल शहरापासून कितीतरी किलोमीटर दूर असुनदेखील गर्दीने ओसंडून वाहत आहेत. सातारचा मॉल तर शहरापासून खूपच दूर असल्यामुळे तो कितपत चालेल याविषयी सुरूवातीला लोक साशंक होते. पण त्याबाबतीतल्या सर्व शंका व्यर्थ ठरल्या आहेत. मॉलमध्ये छापील किमती असलेल्या वस्तुंवर काही प्रमाणात डिस्काऊंट आहेत. काही वस्तू 'बाय वन, गेट वन' अशाही मिळत आहेत. ग्राहकांसाठी हे मोठे आकर्षण ठरत आहे. पारंपरिक बाजारपेठेत व्यापारी अशा पध्दतीने एमआरपी असलेल्या वस्तुंवर रूपयाही डिस्काऊंट देत नाहीत. त्यामुळे मॉलचा फंडा यशस्वी ठरताना दिसत आहे. डी मार्टला मिळत असलेले मोठे यश पाहून काही बड्या व्यापार्यांनी जिल्ह्यात तसे प्रयोग केले आहेत. मात्र त्याचवेळी धान्य, डाळी, शेंगदाणे, साखर यासारख्या छापील किंमती नसणार्या वस्तू स्वस्त पडत नाहीत हेही लक्षात घेतले पाहिजे.
मॉलच्या परीघाबाहेर असलेल्या गाव - शहरामधील व्यापार्यांना दिवाळी सिझनमध्ये फटका बसला आहे. दिवाळीला दुकानात प्रचंड माल भरावा लागतो. प्रत्यक्ष सिझनवेळी सेवा द्यायला माणसे कमी पडतात. घरातील सर्व माणसे त्यावेळी दुकानात राबतात. यावेळी मात्र ग्राहकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. शेतकर्याच्या हातात पैसा आला तर बाजार तेजीत चालतो. पण यंदा एकतर सोयाबीनचे उत्पादन घटले आणि आलेल्या सोयाबीनला अपेक्षित दरही मिळाला नाही. त्यामुळे शेतकर्याच्या हाती म्हणावा तसा पैसा नाही. त्याचा प्रतिकूल परिणाम बाजारपेठेवर झाला आहे. याचा २५ टक्के आणि मॉलचा २५ टक्के असा फटका बाजारपेठेला बसल्याचे व्यापारी सांगत आहेत. दिवाळीत कापड बाजारपेठेत प्रचंड उलाढाल होत असते. पण बाजारपेठेचे रंग बदलत आहेत. लोकांचा कल ऑनलाईन शॉपिंगकडे जाताना दिसत आहे.
घरबसल्या खरेदी करण्याच्या या मानसिकतेमुळे कापड बाजाराला मोठा फटका बसल्याचे कापड व्यापारी सांगतात. तोच प्रकार इलेक्ट्रॉनिक वस्तुंच्या खरेदीच्या बाबतीत आहे. मोबाईलसह इतर अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूही ऑनलाईन मागवण्याकडे तरूण वर्गाचा ओढा आहे. त्याचा परिणामही बाजारपेठेवर झाला आहे. या व्यापार्यांकडील व्यवहार मंदावले आहेत. फराळ बनवून घेण्याला पसंती दिवाळी फराळाच्या बाबतीतही काही बदल घडताना दिसत आहेत. पूर्वी दिवाळीत घरोघरी रात्ररात्र जागून दिवाळीच्या फराळाचे पदार्थ केले जायचे. लाडू, करंज्या, चकल्या, अनारसे, शंकरपाळ्या आदी पदार्थांचा दरवळ सर्वत्र अनुभवायला येत असे. घरातील सर्वजण त्यात योगदान द्यायचेच, पण शेजारी पाजारीही करू लागण्यासाठी यायचे. याच्या बदल्यात त्यांच्याकडेही करायला जावे लागे. बदलत्या जमान्यात रात्र रात्र जागणे कमी झाले आहे आणि एकमेकांकडे करायला जाणेही दिसत नाही. त्याऐवजी घरी आचारी बोलावून फराळाचे पदार्थ बनवून घेतले जात आहेत. त्याला लागेल ते साहित्य द्यायचे म्हणजे झाले. आचारी लोकांना व्यवसायाचा हा नवा सिझन तयार झाला आहे. फराळ करून देण्याचे भाव किलोला १०० ते २०० रूपयांपर्यंत आकारले जात आहेत. पण व्याप नको म्हणून काहीजण पैसे मोजणे पसंत करत आहेत.
दुसरीकडे आता फराळाच्या पदार्थांनी बाजारपेठाही सजलेल्या दिसत आहेत. फराळाचे सर्व जिन्नस आता बाजारात मिळत आहेत. करण्याची कटकट नाही. त्यासाठी माल आणा, तयारी करा अशी यातायात नाही. घरी फारसे सदस्य नसलेल्या कुटुंबात तसेच व्यापारी वर्गात फराळ विकत आणण्यास प्राधान्य दिले जात आहे. त्यातलेच पदार्थ घरी वापरायचे आणि त्यातलेच पदार्थ डबे भरून देण्यासाठी वापरायचे असा प्रकार आहे.
- गजानन चेणगे
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |