05:57pm | Mar 27, 2018 |
सातारा : राजसत्ता, धर्मसत्ता, अर्थसत्ता व ज्ञानसत्ता यांच्या संगनमताची अभद्र युती देशाला घातक असून ती तोडण्यासाठी व सेक्युलर कायद्याच्या बचावासाठी कार्यकर्त्यांनी लढावे, असे आवाहन सेक्युलर मुव्हमेंटचे प्रवर्तक जेष्ठ साहित्यिक, विचारवंत प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांनी केले.
संबोधी प्रतिष्ठानचे वतीने संस्थापक सदस्य दिवंगत कँप्टन साहेबराव बनसोडे यांच्या नावचा या वर्षाचा ११ वा पुरस्कार फुले-आंबेडकर चळवळीत २०वर्षे योगदान देणारे सत्यशोधक ओबीसी परिषदेचे जिल्हाध्यक्ष व राज्याचे मार्गदर्शक भालचंद्र माळी यांना प्रा.गौतमीपुत्र कांबळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. विचारमंचावर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राचार्य अण्णासाहेब होवाळे, उपाध्यक्ष दिनकर झिंब्रे, कार्यवाह अँड. हौसेराव धुमाळ उपस्थित होते.
प्रा. गौतमीपुत्र म्हणाले, भारत देशाची मूळ समस्या येथील जातीव्यवस्था ही आहे. धर्माचे अधिष्ठानामुळे तिला पावित्र्य प्राप्त झाले असल्याने ती उध्वस्त करणे महाकठीण आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा पुरस्कार करणारा धर्म नाकारला व बौद्धधम्माचा स्वीकार करून सर्व धर्माच्या तुरुंगातून मुक्ती साधली आहे. धम्म स्वीकारणारे त्यांचे अनुयायांनी आपण मानवमुक्तीचे सैनिक आहोत हे लक्षात ठेवून वागावे. बाबासाहेबांच्या 'मुक्ती कोण पथे ?' या भाषणाचे प्रबोधन झाले पाहिजे.
आंबेडकरोत्तर धम्म चळवळीच्या इतिहासात ओबीसी नेते बीडचे हनुमंत उपरे काका यांचे नाव कोरले जाईल. जातीव्यवस्थेच्या साखळीची कडी तोडून ते बाबासाहेबांच्या क्रांतीचे पाईक बनले आहेत. ओबीसी आता बुद्ध धम्मात येत आहेत. हे स्वागतार्ह आहे. त्यांना मुक्तीचा मार्ग हनुमंत उपरे यांनी दाखवला आहे. आता आंबेडकर-बुद्धवादा शिवाय पर्याय नाही. तोच सर्वश्रेष्ठ मार्ग आहे.
सत्काराला उत्तर देताना भालचंद्र माळी म्हणाले, उपरे काकांच्या पार्थिवास साक्ष ठेवून मी बौद्ध धम्म स्वीकारला आहे. ओबीसी समाजाला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय मिळायचा असेल तर बुद्ध धम्मात जाण्याशिवाय पर्याय नाही.
या प्रसंगी माळी यांचा ओबीसी संघटनेच्या जिल्हा व तालुका शाखांच्या वतीने जिल्हाध्यक्ष भरत लोकरे, रामचंद्र बनवडे, हणमंत सुतार, संजय गायकवाड, प्रमोद क्षीरसागर, पांबरे, आगवणे, जाधव, सुर्यवंशी यांनी सत्कार केला.
संबोधीचे कार्यवाह धुमाळ यांनी सूत्रसंचालन केले. विश्वस्त रमेश इंजे यांनी आभार मानले. कार्यक्रमास प्राचार्य संजय कांबळे, गौतम भोसले. विनोद यादव, जयवंत सावंत, चंद्रमणी बनसोडे, यशपाल बनसोडे, यमुना बनसोडे व कुटुंबीय, वामन म्हस्के तसेच जेष्ठ पत्रकार प्रमोद फरांदे, विजय मांडके, अरुण जावळे यांच्या सह विविध क्षेत्रातील मान्यवर , कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |