06:58pm | Jul 12, 2018 |
सातारा : सध्या लोडशेडिंग हा शब्द ऐकला तरी माणसाच्या काळजात धस्स होते. विजेशिवाय माणसाच्या दैनंदिन जिवनातील पानसुद्धा हालत नाही. देशात आणि राज्यात वीज वितरणचा खेळखंडोबा झालेला आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात विजेची मोठी समस्या आहे. केंद्र शासन अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर करण्यात यावा म्हणून कोट्यवधी रुपये खर्च करून जाहिरातबाजी करीत आहे. तरीही विजेची तूट भरुन निघत नाही. यावर फलटणमधील एका अवलियाने उतारा काढत चक्क कॅनॉलमधील (कालवा) वाहत्या पाण्यात विद्युत निर्मिती करण्याचे तंत्र शोधून त्याचे पेटंटही मिळविण्याची किमया केली आहे.
सातारा जिल्हा हा धरणांचा जिल्हा म्हणून राज्यभरात ओळखला जातो. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणार्या कोयना धरणात निर्मिलेली वीज ही राज्यासह बाह्य राज्यातही वितरीत केली जाते. परंतू असे असतानाही धरण उशाला आणि कोरड घशाला, अशी परिस्थिती सातारा जिल्ह्याची आहे. सातारा जिल्ह्यात शहरी भागांसह ग्रामीण भागांमध्येही विजेचे मोठे संकट आहे. लोडशेडिंग हा शब्द जरी उच्चारला तरी शेतकर्यांसह चाकरमान्यांच्या काळजात धस्स होते. केंद्र व राज्य शासन विजेची तूट भरुन काढण्यासाठी प्रयत्नशील आहे. अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांचा जास्तीतजास्त लोकांनी वापर करावा, यासाठी केंद्र व राज्य सरकार आग्रही आहे. यासाठी केंद्र शासन राज्य सरकारला कोट्यवधी रुपयांचा निधी देत आहे. मात्र या निधीबाबत ग्रामीण भागाची पाटी अद्याप कोरीच आहे. असे असताना फलटण येथील अच्युत भांबुरे या सत्तरी पार केलेल्या अवलियाने कॅनॉलच्या वाहत्या पाण्यात विजनिर्मितीचे पेटंट 20 वर्षांकरीता मिळवलेले आहे. सातारा जिल्ह्यात नीरा उजवा कालवा हा जिल्ह्याच्या दुष्काळी भागातून जातो. त्यानंतर सातारा जिल्ह्यातील कण्हेर, धोम-बलकवडी, उरमोडी, वांग-मराठवाडी, पाटणमधून वाहणारी कोयना, सातारा आणि कराडमधून वाहणारी कृष्णा या नद्यांवर आणि कॅनॉलवर भांबुरे यांचे विद्युतनिर्मिती यंत्र बसविल्यास मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती होणार असल्याचा दावा अच्युत भांबुरे यांनी केला आहे.
सातार्यातील कालवे जवळजवळ बारमाही वाहत असतात. पर्यायाने या कालव्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वीजनिर्मिती करता येणार आहे. भांबुरेंनी यापूर्वी इलेक्ट्रॉनिक ऍटो कृषी पंपाचे संशोधन केले होते. त्यामुळे अनेक शेतकर्यांना शेतामध्ये न जाता घरातूनच मोबाईलद्वारे इलेक्ट्रीक मोटार चालू करता येत होती. मात्र त्यांचे हे तंत्रज्ञान एका कंपनीने कॉपी करुन बाजारात आणले. केवळ त्याचे पेटंट नसल्यामुळे भांबुरे यांच्या संशोधनाची नक्कल ऍटो स्टार्टर या कंपनीने केली असल्याचे भांबुरे यांनी सांगितले. हा अनुभव येवूनसुद्धा भांबुरे खचले नाहीत. त्यांनी आपला संशोधनाचा पिंड सोडला नाही.
कॅनॉलच्या वाहत्या पाण्यावर विद्युत निर्मिती या संशोधनावर पेटंट मिळविण्यासाठी त्यांनी दहा वर्षापूर्वी केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यांच्या संशोधनाची दखल घेवून केंद्र सरकारच्या इंट्युलिक्चल प्रोपर्टी ऑफ इंडिया (पेटंट ऑफिस) यांनी दखल घेवून भांबुरे यांना त्यांच्या संशोधनाचे पेटंट वीस वर्षांकरीता देण्यात आले आहे. फलटणसारख्या निमशहरी भागात राहूनसुद्धा व सत्तरी पार केलेल्या भांबुरे यांनी आयुष्याच्या उत्तरार्धात तरुणांना लाजवेल, असे कार्य करुन एक नवीन आदर्श तरुण पिढीसमोर उभा केलेला आहे. जिल्ह्यात कोयना, वीर, धोम, कण्हेर या जलविद्युत प्रकल्पांबरोबरच मोठ्या प्रमाणावर पवनचक्क्या उभ्या केल्या आहेत. त्याचबरोबर भांबुरेंचे केलेले संशोधनही प्रायोगिक तत्वावर राबविल्यास याचाही मोठा फायदा विजनिर्मितीसाठी होणार आहे. ग्रामीण भागातील शेतकर्यांना यानिमित्ताने हक्काची वीज मिळणार आहे. त्यामुळे लोडशेडिंग हा शब्द ग्रामीण भागातील डिक्शनरीमधून कायमचा हद्दपार होणार आहे. भांबुरेंच्या या संशोधनासाठी डॉ. सागर माने, सौ. भांबुरे, प्रकाश सस्ते, राजेंद्र भागवत यांनी भांबुरे यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या या पेटंटची जिल्हा प्रशासनाने दखल घेवून ते जिल्ह्यातील कॅनॉलमध्ये प्रायोगिक तत्वावर राबविण्यात यावे, अशी मागणी युवराज शिंदे, विशाल निंबाळकर, नितीन निकाळजे यांनी केली आहे.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |