02:58pm | Aug 22, 2018 |
कोरेगाव : तब्बल तीन वर्षानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन आमदारांच्या उपस्थितीत कोरेगाव येथे झालेल्या आमसभेमध्ये कोरेगाव तालुक्याच्या सर्वच प्रशासकीय विभागाचा धावता आढावा घेताना जनतेने विचारलेल्या समस्यांपेक्षा, महसूल-कृषी सहित इतरही प्रशासकीय अधिकार्यांच्या गुणगौरवाला अधिक महत्त्व दिल्याने कोरेगाव तालुक्यातील जनतेच्या समस्यांची सोडवणूक करणारी जनतेची आमसभा आहे? की प्रशासकीय अधिकार्यांचा गुणगौरव समारंभ आहे? असा संभ्रम कोरेगाव तालुक्यातील उत्तर आणि दक्षिण भागातून आलेल्या जनतेच्या मनात निर्माण झाल्याचे दिसून आले.
जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी, जनतेचे दैनंदिन प्रश्न मार्गी लावण्यासाठी तालुक्याच्या आमदारांच्या अध्यक्षतेखाली कोरेगाव पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्या विविध विभागांसह महसूल, पोलीस प्रशासन, वीज वितरण, एसटी महामंडळ, बांधकाम, जलसंपदा-जलसिंचन, आरोग्य सहित शासनाच्या सर्वच विभागाचा आढावा आमसभेच्या माध्यमातून वर्षातून एकदा तालुक्यातील सर्व ग्रामस्थांसमोर घेतला जातो. कोेरेगाव तालुक्यात गेल्या तीन वर्षात एकदाही ग्रामसभा घेतली गेली नाही. संभाव्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधी, आमदारांना जाग आली आणि आ. शशिकांत शिंदे, आ. बाळासाहेब पाटील, आ. दीपक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तब्बल तीन वर्षानंतर कोरेगाव येथील कुमठे फाट्यानजिक असणार्या एका मंगल कार्यालयात आमसभा झाली.या आमसभेला सातारा जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, कोरेगावच्या प्रांताधिकारी श्रीमती किर्ती नलवडे, तहसिलदार श्रीमती स्मिता पवार, कोरेगाव पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ जगदाळे, उपसभापती संजय साळुंखे, गटविकास अधिकारी शरद मगर यांच्या सहित तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद सदस्य, सर्व पंचायत समिती सदस्य, विविध विभागांचे प्रशासकीय अधिकारी, विविध गावचे ग्रामस्थ आणि कार्यकर्ते या आमसभेस उपस्थित होते.
कोरेगाव तालुक्यात विविध गावामध्ये सुरु असलेली जलयुक्त शिवार योजनेतील अनेक कामे कृषी विभागाच्या दिरंगाईमुळे वर्षानुवर्षे रखडलेली असताना, तालुक्यातील पाणलोट क्षेत्रातील अनेक कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी शासन दरबारी दिलेल्या असताना, शासनाच्या कृषी, आरोग्य, महसूल सहित अनेक विविध शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यात कृषी, आरोग्य, महसूल, स्थानिक स्वराज्य संस्था या विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी कमी पडलेले असताना या आमसभेत आ. शशिकांत शिंदे, आ. बाळासाहेब पाटील, आ. दीपक चव्हाण यांच्या उपस्थितीत विशेषत: राजकीय पक्षाचे कार्यकर्ते प्रशासकीय अधिकार्यांच्या अभिनंदनाचे ठराव या आमसभेत घेताना दिसत होते. थकबाकीदार ग्रामपंचायतीची, गावांची नळपाणी पुरवठा योजनांची वीज कनेक्शन्स वीज वितरण कंपनींना तोडू नयेत. संबंधित वीज कनेक्शन्स थकित वीज बिलापोटी तोडली असतील ती पुन्हा जोडून द्यावीत. अर्धवट राहिलेली जलयुक्त शिवार योजनेतील कामे तातडीने पूर्ण करुन द्यावीत. पीक विमा योजनांची अंमलबजावणी कृषी अधिकार्यांनी तातडीने करावीत. रमाई घरकुल योजना- पंतप्रधान आवास योजनांसह इतर घरकुल योजनांची अंमलबजावणी प्रशासकीय अधिकार्यांनी युद्धपातळीवर करावी. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनांची माहिती अधिकार्यांनी सर्वच गावातील ग्रामस्थांपर्यंत पोहोचवावी. त्याबाबत जागृती करावी. शाळांची वीज कनेक्शन्स वीज वितरण कंपनीने तोडू नयेते, कृषी विभागाच्या सर्वच योजनांची अंमलबजावणी प्रभावी आणि गतिमान पद्धतीने करावीत. पाणी फौंडेशनच्या करण्यात येणार्या पाणलोटच्या, जलसिंचनाच्या सर्व कामांची माहिती अधिकार्यांनी संबंधित गावच्या सर्व ग्रामस्थांना वेळोवेळी द्यावी आणि त्या कामामध्ये ग्रामस्थांचा सहभाग वाढवावा. शेतातील आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याच्यामध्ये येणारे विजेचे खांब वीज वितरण कंपनीने तातडीने काढून टाकावेत. सर्वच गावातील शेतामधील पाणंद रस्ते खुले करुन द्यावेत, अशा अनेक सूचना आ. शशिकांत शिंदे, आ. बाळासाहेब पाटील, आ. दीपक चव्हाण यांनी या आमसभेत केल्या. विविध गावच्या ग्रामस्थांनी यावेळी त्या-त्या गावाच्या समस्या मांडल्या.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |