03:36am | Jul 25, 2018 |
कोरेगाव : जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या कोरेगाव येथील दिव्य दत्त दिगंबर पतसंस्थेमध्ये सुमारे 2 लाख 53 हजार रुपयांच्या ठेवींची रक्कम मुदत संपूनही मिळत नसल्याच्या कारणावरुन कोरेगाव येथील स्वातंत्र्य सैनिक वसंतराव रंगनाथ दिक्षीत यांनी स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट रोजी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, जिल्हा विशेष लेखा परिक्षक वर्ग 1, सह सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री, सहकार सचिव, सहकार आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक, विभागीय सहकार निबंधक यांना दिला आहे. स्वातंत्र्यसैनिक वसंतराव दिक्षीत यांच्या बरोबर दत्त दिगंबर पतसंस्थेचे ठेवीदार विश्वास बर्गे, नुरअली पटवेकर, राजाराम कदम, छाया कदम, शहीदा पटवेकर, यशवंतराव घाडगे, राजेंद्र वीर यांच्यासह शेकडो ठेवीदार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार आहेत. यामुळे कोरेगाव तालुक्यासह सातारा जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, संपूर्ण सातारा जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असलेली दिव्य दत्त दिगंबर नागरी सहकारीस संस्था कोरेगाव, पुसेगाव, लोणंद, सातारा सह इतर तालुक्यांत कार्यरत आहे. माजी चेअरमन राजेंद्र गांधी, व्यवस्थापक विलास शिंदे आणि माजी संचालक मंडळ यांच्या गलथान कारभारामुळे सध्याची दिव्य दत्त दिगंबर आणि पूर्वाश्रमीची दत्त दिगंबर नागरी सहकारी संस्था आर्थिक अडचणीत आली. सातारा येथील संदीप मोझर यांनी निवडणुकीच्या माध्यमातून नाव बदलून दिव्य दत्त दिगंबर पतसंस्था या नावाने काही काळ चालविण्यास घेतली. मात्र दोन वर्षाच्या कालावधीनंतर काही माजी संचालकांच्या माध्यमातून श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी सहकार विभागाकडे केलेल्या तक्रारीवरुन संदीप मोझर यांच्या नेतृत्वाखालील दिव्य दत्त दिगंबर पतसंस्थेचे संचालक मंडळ राज्याच्या सहकार विभागाने बरखास्त केले आणि त्या जागी प्रशासक आणि प्रशासकीय मंडळ नियुक्त करण्याची परिस्थिती निर्माण झाली.
सध्या जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या या पतसंस्थेमध्ये प्रशासक आणि प्रशासकीय मंडळ लवकरच कार्यरत होणार आहे. दत्त दिगंबर पतसंस्थेचे माजी चेअरमन राजेंद्र गांधी, व्यवस्थापक विलास शिंदे आणि राजेंद्र गांधी यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन माजी संचालकांच्या मनमानी आणि गैरकारभारामुळे सातारा जिल्ह्यातील सुमारे 11 हजार ठेवीदारांच्या सुमारे 16 कोटींच्या ठेवी मिळेनाशा झाल्या आहेत. शेकडो ठेवीदार गेली दोन वर्षे दिव्य दत्त दिगंबर पतसंस्थेच्या सातारा येथील मुख्यालयात, कोरेगाव येथील कार्यालयात त्यांच्या अडकलेल्या लाखो रुपयांच्या ठेवींसाठी हेलपाटे मारत आहेत. या पतसंस्थेचे माजी चेअरमन राजेंद्र गांधी व्यवस्थापक विलास शिंदे यांसह त्यांच्या नेतृत्वाखालील सर्व माजी संचालक उच्च न्यायालयाच्या तात्पुरत्या (अंतरिम) जामीनावर कोरेगाव येथील स्थानिक पोलीस प्रशासनाच्या आशिर्वादाने कोरेगाव शहरात मोकाट फिरत आहेत. मुंबई उच्च न्यायालयात दिव्य दत्त दिगंबर पतसंस्थेच्या चेअरमन, माजी चेअरमन, माजी संचालक, व्यवस्थापक यांच्या विरोधात ठेवीदारांच्यावतीने टाकलेल्या कोर्ट केसेस सुरु आहेत.
मात्र राजेंद्र गांधी आणि त्यांच्या नेतृत्वाखालील माजी संचालकांच्या मनमानी गैरकारभारामुळे जिल्ह्यातील ठेवीदारांच्या ठेवी मिळेनाशा झाल्या आहेत. या 11 हजार ठेवीदारांच्यावतीने कोरेगाव येथील वयोवृद्ध ठेवीदार आणि स्वातंत्र्यसैनिक वसंतराव रंगनाथ दिक्षीत (वय 82) यांच्या 2 लाख 53 हजार रुपयांच्या ठेवी मिळाव्यात यासाठी स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोरेगाव शहर परिसरातील इतर अनेक ठेवीदारांसमवेत आमरण उपोषणास बसणार आहेत. या आशयाचे निवेदन दिक्षीत यांनी नुकतेच सातारा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील, जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर, जिल्हा विशेष लेखा परिक्षक अजय देशमुख यांच्याकडे दिले आहे. निवेदनामध्ये त्यांनी त्यांच्या आर्थिक अडचणी, आरोग्याच्या समस्या, ठेवी परत मिळविण्यासाठी प्रशासकीय व स्थानिक पातळीवर दिला जाणारा त्रास यांचा उल्लेख केला आहे. आयुष्यभराची कमाई, उदरनिर्वाहाचे साधन, हक्काची ठेव परत मिळविण्यासाठी वयोवृद्ध स्वातंत्र्यसैनिकाला संघर्ष करावा लागत आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |