01:39am | Sep 15, 2018 |
कराड : गेल्या साडेचार वर्षात केंद्रातील व राज्यातील सरकारांनी जनतेला साफ फसवले आहे. महागाई, बेरोजगारी, जातीवादी आणि धर्मांध हल्ले, स्त्रियांवर वाढते अत्याचार, दलितांवरील हल्ले यात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनेतच्या नियंत्रणात चालणाऱ्या व विकासाची दिशा देणाऱ्या सरकारची देशासह राज्याला गरज आहे. त्यामुळे जातीयवादी, धर्मांध, हिंसक, हुकूमशाही शक्तींचा २०१९च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पराभव करा, यासाठी सर्व शक्ती पणाला लावण्याची महत्वपूर्ण शपथ श्रमिक मुक्तीदलाच्या महामेळाव्यात घेण्यात आली. दरम्यान, कराड विमानतळाचा संपलेला मुद्दा पुन्हा उकरून काढण्याऱ्या प्रवृत्तीचा निषेध ठरावासह आठ ठराव करण्यात आले.
श्रमिक मुक्ती दलाचा शुक्रवारी येथील पलाश मंगल कार्यालयात महामेळावा पार पडला. या मेळाव्यास राज्याच्या कानाकोपऱ्यातून पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
डॉ. भारत पाटणकर म्हणाले, गेल्या चार वर्षात शेतकरी, शेतमजूर, कामगार कर्मचारी आदींनी मोठा संघर्ष केला. मात्र जनतेला केंद्रातील व राज्यातील सरकारने फसवले आहे. तसेच देशातील महागाई, बेरोजगारी, अर्धबेरोजगारी, जातीयवादी आणि धर्मांध हल्ले, स्त्रियांचे वाढते अत्याचार, दलितांवरेच हल्ले यांच्या प्रचंड वाढ झाली आहे. घोषणा आणि भाषणबाजीशिवाय या सरकारकडून जनतेला काहीही मिळालेले नाही. आंदोलनांची गळचेपी करण्यात आली आहे. विकासाचे फक्त गाजर दाखवण्यात आले आहे. देशाची घटना जाळण्याचे धाडस स्वातंत्र्यानंतर देशात पाहिल्यांदाच झाले आहे.
ते म्हणाले, या पुर्वीचे सरकारे ज्या पध्दतीने वागली त्याच पध्दतीने आजची केंद्र व राज्य सरकारे वागत आहेत. त्यामुळे कोणत्याही पक्षाचे सरकार आले तरी कष्टकरून जगणाऱ्या जनतेला लढल्याशिवाय काहीही मिळत नाही. कारण देशासह राज्यातील सरकार भांडवलदारांचे आणि धर्मांध-जातीयवादी शक्तींचे चालणारे दिसत आहे. तर जनतेच्या बाजुच्या माणसांना एका पाठोपाठ एक जीवे मारण्यात येत आहे. त्यांचे मारेकरी आणि सुत्रधार सरकारला अजूनही निश्चित करता आलेले नाहीत. तर स्त्रियांवर बलात्कार करणाऱ्यांची बाजू सत्तेत असणारे अनेकजण घेताना दिसत आहेत. तर मंत्र्यांनी मुली पळून आणून इच्छे विरूध्द लग्न लावण्याची भाषा खुलेआम केली. त्यामुळे आता जनतेच्या नियंत्रणात चालणाऱ्या सरकारची नितांत गरज असल्याचे डॉ. पाटणकर यांनी सांगितले. दरम्यान, जातीयवादी, धर्मांध, हिंसक, हुकूमशाही शक्तींचा २०१९च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पराभव करण्यासाठी आपण सर्वांनी शक्ती पणाला लावण्याची शपथ घेण्याचा ठराव सर्वांनुमते केला. यावेळी उपस्थित जनसुदायाला तशी शपथ डॉ. पाटणकर यांनी दिली.
मेळाव्यात महात्मा फुले यांच्या स्मृतीदिनी दि. २८ नोव्हेंबर २०१८ रोजी कोल्हापूर येथील दसरा चौकात 'फुले- आंबेडकरी विकास परिषद' यशस्वी करण्यासह या परिषदेला लाखोंच्या संख्येने सहभागी व्हावे, समान न्यायाने पाणी वाटप, एकात्मिक पाणी वाटपाचा आणि सार्वत्रिक बंद पाईप पाणी विरतणचा 'आटपाडी पॅटर्न' राज्यभर राबवावा व शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवाव्यात यासाठी 'राज्यव्यापी वादळी चळवळ' येत्या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्याच्या काळात करणे, कोयना धरणग्रस्तांनी केलेल्या अभूतपूर्व संघर्षामुळे पुर्ववसनासाठी तीन महिन्यात निर्णय घेण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला. मात्र या निर्णयाला सहा महिने लोटले तरी निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे १ ऑक्टोबर २०१८पर्यंत या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली नाही तर २ ऑक्टोंबर गांधी जयंती दिनापासून कोयना प्रकल्पग्रस्त पुन्हा ठिय्या आंदोलन करणार, पवन चक्क्यांमुळे इजा पोहचणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या शासन आदेशाचे पालन सातारा जिल्हा प्रशासन करताना दिसत नाही. याकरिता नव्याने संघर्ष उभारण्याचा निर्णय असे आठ महत्वपूर्ण ठराव आजच्या मेळाव्यात करण्यात आले.
'सनातन'च्या गोव्यात केंद्रांचा तपास करा
डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, प्रा. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश या सर्वांच्या खून 'सनातन' म्हणून वावरणाऱ्या शक्तींकडूनच झाला असल्याचे सर्व प्रकारच्या तपास यंत्रणा सांगत आहेत. असे असतानाही खूनी आणि सुत्रधार निश्चित झालेले नाहीत. या सर्वांचे मुळ खणण्यासाठी सुत्रधारांचा गड असलेल्या गोव्यातील केंद्राची झाडा-झडती झाली पाहिजे. ही भुमिका यापूर्वीच्या महामेळाव्यात श्रमिकने घेतली होती. आता कृतीची गरज आहे. त्यामुळे सरकारने गोव्यातील अड्ड्यांची कसून तपासणी करावी, अशा मागणी आहे. अन्यथा जनसंघर्षाच्या शांततामय निर्धारी मार्गाने जावे लागेल, असा इशारा डॉ. पाटणकर यांनी दिला.
भीमा-कोरेगाव हल्लेखोरांचा शोध घ्या
एल्गार मेळाव्यास संबंध सरकार भीमा-कोरेगाव घटनेशी जोडत आहे. यामुळे गोंधळ निर्माण झाला आहे. मात्र अभिवाद करावयास आलेल्या लोकांवर हल्ले कोणी केले. याचा तातडीने शोध घेण्याची गरज आहे. आणि असे होणार नसेलतर सर्वधर्मीय शांतताप्रिय जनतेला आंदोलन करण्याची वेळ येईल. मात्र, अशी वेळ येणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी, असा इशारा महामेळाव्या देण्यात आला.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |