02:36am | Dec 06, 2019 |
सातारा : ऊसाला प्रतिटन चार हजार रुपये द्या, दोन कारखान्यांतील अंतराची अट रद्द करावा, यासह विविध मागण्यासांसाठी सांगली येथील शेतकरी हुतात्मा स्मृती परिषद आयोजित केली आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. राज्यातील महाविकास आघाडीने किमान समान कार्यक्रमात संपूर्ण व सरसकट कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले असून, त्यांनी यू टर्न घेतल्यास त्यांना घरी जावे लागेल, असा इशारा शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी दिला.
सांगली येथील बाजार समितीलगतच्या कल्पतरू मंगल कार्यालयात ता. 12 रोजी दुपारी एक ते सायंकाळी सहा यावेळेत शेतकरी परिषद आयोजित केली आहे. त्याबाबत माहिती देताना पत्रकार परिषदेत ते म्हणाले, ""सरकार बदलले तरी धोरण बदलत नाहीत. राज्यात आघाडी सरकार असून, या पक्षांनी जाहीरमान्यांत सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती. त्यांनी ती पूर्ण करावी. सरकारचे धोरण शेतकऱ्यांचे मरण होत आहे. आयात जास्त होत असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनांना भाव मिळत नाही, परिणामी त्यांना आत्महत्या करावी लागते.''
आपत्ती निवारण कायद्यात दुष्काळ, महापुराचा समावेश करून जिरायत शेतीला एकरी 50 हजार रुपये, बागायत शेतीला एक लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी. गोवंद हत्या बंदी, वन्य जीव संरक्षण, पाळीव प्राण्यांशी निर्दयी वागणूक, आवश्यक वस्तू कायदा, भू संपादन, कमाल जमीन धारणा आदी शेतकरी विरोधी कायदे रद्द करावीत. सरसकट सर्व शेतकऱ्यांना सर्व कर्जातून वीज बिलातून मुक्त करा. शेतकऱ्यांना बाजाराचे, तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. शेतीमालावरील निर्यात बंदी उठवा, शेतकऱ्यांना कार्बन क्रेडीटचे अनुदान मिळाले पाहिजे आदीसह विविध मागण्यांबाबत परिषदेत चर्चा होणार असून, त्यास राज्यभरातील शेतकरी संघटनेचे नेते, शरद जोशी यांच्या विचाराने कार्यरत असणारे कार्यकर्ते येणार आहेत, असे श्री. पाटील यांनी सांगितले.
शेट्टींना शेतीतील कळत नाही
राजू शेट्टींना कृषीमंत्री पद मिळण्याबाबत विचारले असता ते म्हणाले, ""त्यांनी देशाचे कृषीमंत्री व्हावे. त्यांना शेतीतील काही कळत नाहीत. त्यांना कळत असते, तर शरद जोशी यांना त्यांनी सांडले नसते. शेतीतील न कळणारेच कृषीमंत्री होत असतात. केवळ सरकारची धोरणे पुढे नेण्याचे काम करतात.''
गोहत्या बंदीने मटण दर वाढले
गोवंश हत्या बंदी कायद्यामुळे कत्तलखाने बंद झाली. भाकड जनावरे शेतकऱ्यांच्या माती पडली. शिकार बंदीमुळे शिवारात डुकरे, ससे, हरणे वाढली आहेत. चीनमध्ये झुरळापासून हत्तीपर्यंत सर्व सुपाट होत आहे. तेथे प्राणीमित्र जन्माला आले तर त्यांची गत काय होईल? हिकडे प्राणीमित्रच जास्त झालेत. सरकारच्या या कायद्यांमुळेच मटणाचे दर वाढले आहेत, असा आरोपही पाटील यांनी केला.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |