सातारा : वाई शहरालगत असणार्या औद्योगिक वसाहतीमध्ये भारत पेट्रोलियमचा गॅस रिफिलिंग प्लॅन्ट आहे. या प्लॅन्टमुळे लाखो वाईकरांचा जीव धोक्यात आला असून क्षमतेपेक्षा जास्त एलपीजी गॅसचा साठा केल्यामुळे एकप्रकारे अणुबॉम्बच वाईशेजारी निपजला जातोय. प्रशासनाच्या व राजकीय पुढार्यांच्या बोटचेप्या धोरणांमुळे लाखो वाईकरांचा जीव टांगणीला लागला आहे. कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना होवू शकते, याची शक्यता नाकारता येत नाही.
वाई येथील औद्योगिक वसाहतीमध्ये असणार्या केंद्र सरकारच्या मालकीचा भारत पेट्रोलियम कंपनीचा गॅस रिफिलिंग प्लॅन्ट गेल्या अनेक वर्षापासून सुरु आहे. सुमारे ४०० टन गॅस साठवण क्षमता असलेल्या या प्लॅन्टमध्ये २०० टनाचा अतिरिक्त गॅस स्टॉक दररोज असतो. कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली तसेच कोकणात याठिकाणी एलपीजी गॅसचा पुरवठा केला जातो. याठिकाणी वाई परिसर तसेच देशातील इतर ठिकाणाहून आलेले हजारो कामगार दररोज काम करीत असतात. त्यामुळे या कामगारांचाही जीव धोक्यात आलेला आहे. वाई नगरपालिकेचा कचरा डेपोही या प्लॅन्टच्या बाजूलाच आहे. कचर्याचे विघटन करण्यासाठी काहीजण कचरा जाळत असतात. त्यामुळे हा कचरा डेपो बारा महिने चोवीस तास धुमसत असतो. त्यामुळे या कचरा डेपोतून उडालेली एक ठिणगीही या प्लॅन्टचे आणि परिसराचे होत्याचे नव्हते करु शकते. या प्लॅन्टमध्ये अग्निशामक दलाची कोणतीही मजबूत यंत्रणा अस्तित्वात नाही. वाई नगरपालिकेचे बंबही याठिकाणी पोहोचण्यास काही कालावधी लागत असतो. तोपर्यंत अतीज्वलनशील असलेला एलपीजी गॅसचा साठा सुमारे 20 किलोमीटरच्या परिघामध्ये विध्वंस करु शकतो. यामध्ये हजारोंच्या संख्येने जिवितहानी होवू शकते. वाई शहर, शेंदूरजणे, परकंदी, शाहबाग या गावांसह 20 किलोमीटरच्या परिघामधील गावांना या प्लॅन्टपासून मोठा धोका निर्माण झाला आहे.
वाई येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रदीप जायगुडे यांनी याबाबत वेळोवेळी आवाज उठवला होता. मात्र जिल्हा प्रशासन व भारत पेट्रोलियम व्यवस्थापन यांना जायगुडे यांनी सुचविलेल्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष केल्यामुळे वाईमध्ये एक अणुबॉम्ब निपजतोय. मांढरदेव, ता. वाई येथे सुमारे 15 वर्षापूर्वी चेंगराचेंगरीतून मोठी दुर्घटना घडली होती. त्यावेळी शेकडो लोकांना आपले नाहक प्राण गमवावे लागले होते. तपास यंत्रणांनी प्रथमदर्शनी एलपीजी गॅसच्या स्फोटातून झालेल्या गोंधळामुळे चेंगराचेंगरी होवून दुर्घटना झाल्याचा निष्कर्श मांडलेला होता. त्यामुळे एलपीजी गॅस किती धोकादायक आहे, याचा अंदाज येवू शकतो. केवळ 5 गॅसच्या टाक्यांनी त्यावेळी शेकडो लोकांचा जीव घेतला होता. या घटनेमुळे देशासह जग हादरले होते. सातार्याच्या इतिहासातील ही काळीकुट्ट घटना अजूनही अंगावर शहारे आणते. वाई येथील औद्योगिक वसाहतीमध्ये असणार्या भारत पेट्रोलियमचा गॅस रिफिलिंग प्लॅन्टमध्ये तर अशा हजारो टाक्या रोज रिफिलिंग होत असतात. त्यातच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणतीही उपाययोजना न करता या प्लॅन्ट व्यवस्थापनाने अधिक क्षमता वाढवलेली आहे. ही क्षमता वाढविण्यासाठी भारत पेट्रोलियम व्यवस्थापनाने प्रदुषण नियंत्रण महामंडळ, वाई नगरपालिका, अग्निशमन यंत्रणा यांची कोणत्याही प्रकारचे ना हरकत प्रमाणपत्र घेतलेले नाही.
येथे कार्यरत असणारे टेरीटरी मॅनेजर सत्येन नायर आणि जॉन राजू यांच्या मनमानी कारभारामुळे वाई शहरासह 20 किलोमीटरच्या परिघामध्ये असणार्या लोकांचा जीव धोक्यात आलेला आहे. नियमानुसार नागरी वस्त्यांजवळ हा प्लँन्ट असू नये, असा नियम आहे. मात्र या प्लॅन्ट शेजारी मोठ्या प्रमाणावर नागरी वस्त्या तसेच मोठ मोठे कारखाने आहेत. वास्तविक ज्यावेळी नागरी वस्त्या तयार होत होत्या, त्यावेळी भारत पेट्रोलियम कंपनीने त्यावर हरकती घेवून नागरी वस्त्या निर्माण होवू नयेत यासाठी प्रयत्न करायला हवे होते. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनीही नागरी वस्त्या वाढत असताना त्याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाला देणे बंधनकारक होते. मात्र पाणी डोक्याच्यावर गेल्यामुळे त्याठिकाणाहून प्लॅन्टचेच स्थलांतर करण्यात यावे, याबाबत जिल्हा प्रशासनाने या प्रकरणामध्ये लक्ष घालून हा प्लॅन्ट त्वरित बंद करावा, अथवा त्याबाबत उपाययोजना करण्यासंबंधी आदेश द्यावेत, अशी मागणी वाई शहर व तालुक्यातील नागरिकांनी केलेली आहे.
राजकीय अनास्था..
वाई औद्योगिक वसाहतीमधील भारत पेट्रोलियमचा गॅस रिफिलिंग प्लॅन्ट गेली अनेक वर्षे कार्यरत आहे. या दरम्यान वाई विधानसभेचे तीन आमदार व एक खासदार जिल्ह्याला दिले. मात्र यापैकी एकाही पुढार्याने या प्लॅन्टच्या भोंगळ कारभाराबाबत कधीही आवाज उठवलेला नाही. अथवा शासन दरबारी या प्लॅन्टबाबत उपाययोजनाही सुचविलेल्या नाहीत. या प्लॅन्टमुळे भूमीपुत्रांना रोजगार मिळतो, ही गोष्ट जरी खरी असली तरी त्यांच्या जिविताच्या रक्षणाचे काय, हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. भविष्यामध्ये एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? याबाबत जिल्हा प्रशासनासह येथील राजकीय पुढार्यांनी खुलासा करावा.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |