12:05pm | Mar 23, 2022 |
नवी दिल्ली : देशातील महामार्गावरील प्रवास आगामी काळात स्वस्त होणार आहे. सरकार ठराविक मर्यादेत एकदाच टोल घेणार आहे. यासोबतच टोल प्लाझाजवळ राहणाऱ्या आणि महामार्गावरून सतत प्रवास करणाऱ्या स्थानिकांनाही पास मिळणार आहे. यामुळे स्थानिकांना दिलासा मिळणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत सरकारच्या या योजनेची माहिती दिली. त्यानुसार आता महामार्गावरील टोल प्लाझाची संख्या मर्यादित असेल, तर स्थानिकांना आता टोल भरावा लागणार नाही. सरकारची ही योजना येत्या ३ महिन्यात लागू होणार आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घोषणा केली की सरकार येत्या ३ महिन्यांत देशातील टोलनाक्यांची संख्या कमी करणार असून ६० किमीच्या परिघात फक्त एकच टोलनाका कार्यरत असेल. आज लोकसभेत हे विधान करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, ६० किमीच्या परिसरात येणारे इतर टोलनाके येत्या ३ महिन्यांत बंद केले जातील. त्याचवेळी, केंद्रीय मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, टोल प्लाझाजवळ राहणाऱ्या लोकांना टोल भरावा लागणार नाही, त्यांना पास जारी केला जाईल.
अधिकाधिक लोक टोल भरून महामार्गावरून प्रवास करण्यास प्रवृत्त होतील. खरे तर महामार्गावरील वाहतूक वाढवून टोलचे उत्पन्न वाढवण्यावर सरकारचा भर आहे. त्याचबरोबर टोलनाक्याजवळ राहणाऱ्या नागरिकांना टोलमध्ये सवलत द्यावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जाते आहे. कारण स्थानिकांना हायवेवरून सतत प्रवास करावा लागतो. टोल प्लाझाजवळ राहणाऱ्यांनाही सरकारच्या या नव्या योजनेचा भरपूर फायदा मिळण्याची अपेक्षा आहे.
गेल्या महिन्यात क्रिसिलच्या अहवालानुसार, चालू वर्षाच्या उत्तरार्धात रहदारीमध्ये लक्षणीय घट झाल्यामुळे २०२१-२२ या संपूर्ण आर्थिक वर्षात राष्ट्रीय महामार्गावरील टोल रोड ट्रॅफिकमध्ये ७-९ टक्क्यांची किरकोळ वाढ होईल. मात्र, पुढील आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये वाहतुकीतील टोल रोड चालकांच्या महसुलात चांगली वाढ होणार आहे. दुसरीकडे, नितीन गडकरी यांनी आधीच अंदाज व्यक्त केला आहे की, एनएचएआयच्या टोल उत्पन्नात आगामी काळात मोठी वाढ होण्याची अपेक्षा आहे. पुढील तीन वर्षांत हे उत्पन्न वार्षिक 40,000 कोटी रुपयांवरून 1.40 लाख कोटी रुपये होईल. त्याचवेळी, सरकार अशा तंत्रज्ञानावर काम करते आहे ज्यामुळे येणाऱ्या काळात कोणत्याही टोल प्लाझाची गरज भासणार नाही आणि जोपर्यंत वाहन महामार्गावर चालेल तेवढाच टोल आकारला जाईल.
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेतील चर्चेत भाग घेताना देशातील विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांवर भाष्य केले. यात काश्मीरमध्ये सुरु असलेल्या अत्यंत महत्त्वाकांक्षी जोझिला पास प्रकल्पाचा विशेष उल्लेख होता. अंदाजे 12,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पाच्या उभारणीसाठी देशातील आणि परदेशातील अनेक नामांकित कंत्राटदारांकडून निविदा मागवण्यात आल्याचे गडकरी यांनी सांगितले.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |