10:56pm | Mar 04, 2023 |
विडणी : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत सर्वांना समान अधिकार दिला. मात्र गेल्या 25 वर्षापासून फलटण तालुक्यात लोकशाहीचे खच्चीकरण करून राजेशाही आणली आहे. तसेच, सर्वसामान्यांचा विचार न करता प्रत्येक ठिकाणी आपल्याच घरातील लोकांनाच पद, उमेदवारी देऊन तालुक्यावर हुकूमशाही लादली जात असल्याचा टोला माढा लोकसभा खासदार रणजीतदादा नाईक-निंबाळकर यांनी मिस्टर रामराजे यांना लगावला.
विडणी, ता.फलटण येथे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या 23 विविध विकास कामांचा भूमीपूजन समारंभ तसेच आभार सभा आयोजित करण्यात आली. यावेळी रणजितदादा नाईक -निंबाळकर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सरपंच सागर अभंग, माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, अनुप शहा, ऍड.नरसिंह निकम, जयकुमार शिंदे, धनंजय सांळूखे पाटील, बजरंग गावडे, ऍड.अविनाश अभंग, सचिन ननावरे, माऊली नाळे, विजय अभंग यांची प्रमुख उपस्थिती होती.
फलटणचा श्रीराम सहकारी साखर कारखाना हा चालवायला देऊन फलटणची इज्जत इचलकरंजीला घाण ठेवली असून झालेल्या करारातून रामराजे व त्यांच्या भावांनी अफाट पैसा खाल्ला आहे. या चोरांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थींच्या निवडणूकीत घरी बसवा, असेही परखड मत रणजितदादा यांनी व्यक्त करून ते पुढे म्हणाले, निरा-देवघरचे आपल्या वाट्याचे पाणी लाल दिव्याच्या बदल्यात मिस्टर रामराजेंनी बारामतीकरांना दिले. मात्र तेच पाणी आपण खासदार झाल्यावर फलटणकडे वळवले. निरा-देवघरच्या कॅनालचे काम करण्याची इच्छा असती तर एका दिवसात केले असते. परंतू ते त्यांना करायचेच नव्हते. अजितदादांनी बारामतीचा विकास केला. मात्र तसा विकास गेल्या 25 वर्षात फलटणचा का केला नाही? कमिन्ससारख्या मोठया कंपनीतील तरुण कर्मचार्यांचा निम्मा पगार बंगल्यावर जातोच कसा काय, असा सवालही त्यांनी यावेळी केला. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने फलटण तालुक्यात करोडो रुपयांची कामे मंजूरी केली असून, नाईकबोमवाडी येथील एमआयडीसी प्रकल्प तसेच इतरही मोठमोठे प्रकल्प आपण फलटण तालुक्यात आणणार असल्याचे सांगून विडणी गावच्या सर्वांगीण विकासासाठीही आपण सरपंच सागर अभंग यांना सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही यावेळी खा. रणजितदादा यांनी दिली.
फलटण तालुक्यात विडणी ग्रामपंचायत ही मोठी आहे. मात्र गेल्या 25 वर्षात गावात सत्ताधार्यांना मूलभूत कामेही करता आली नसल्याने लोकांनी आपल्यावर विश्वास टाकून मला थेट सरपंचपदी निवडून दिले आहे. लोकांनी मला दिलेल्या मतांची किंमत काय आहे हे मी विकासकामातून दाखवून देणार असल्याचे मत लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांनी यावेळी व्यक्त केले. माझ्यावर लहान वयातच गावाची धुरा सांभाळण्याची जबाबदारी टाकली असून ती मी प्रमाणिकपणे पार पाडणार असून विडणीचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास असल्याचे सांगत यापुढे रणजितदादा नाईक निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांच्या सहकार्यानेच गावचा विकास करणार असल्याचेही सागर अभंग यांनी सांगितले.
कार्यक्रमास विडणी व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रणजितदादा व आमदार जयकुमार गोरे नसते तर मिस्टर रामराजे यांनी मला गायब केले असते : सागर अभंग
पनवेल मध्ये सागर अभंग यांचा एक जमिनीचा व्यवहार होता. तेथे सागर अभंग व आमदार जयकुमार गोरे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामध्ये सागर अभंग व जयकुमार गोरे यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्या. पनवेल पोलीस ठाण्यातून ती तक्रार फलटण शहर पोलीस ठाण्यात आली. त्यावेळी मी मिस्टर रामराजे व त्यांच्या एका चेला बाणेरचे आमदार श्रीकृष्ण गोसावी यांचा मुलगा यांच्या नावाने तक्रार अर्ज केला. मात्र त्यावेळी आमची तक्रार फलटण शहर पोलिस ठाण्यात व सातारा जिल्हा तत्कालीन पोलीस अधीक्षक यांनी दाखल केली नाही. असे असताना कराड येथे मी व आमदार जयकुमार गोरे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली.
यावेळी रामराजे सागर अभंग यांना म्हणाले तू का तिकडे गेला? तू एक एजंट आहे, मालक बनू नकोस. तू 2 कोट घे, 5 कोट घे, 10 कोट घे आणि बाजूला हो, असे मिस्टर रामराजे म्हणाले. त्यापुढे तू जयकुमार गोरे सोबत असतोस. आमदार जयकुमार गोरे यांना मारण्यासाठी किती घेणार, अशी ऑफरही मिस्टर रामराजे यांनी मला दिली होती.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |