02:46pm | Aug 30, 2022 |
श्रीनगर : काँग्रेसेचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्याच्या धक्क्यातून सावरत असतानाच मंगळवारी पक्षाला आणखी एक हादरा बसला आहे. जम्मू-काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री तारा चंद यांच्यासह पक्षातील तब्बल ६४ नेत्यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यामध्ये ५० हून अधिक वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे. गुलाम नबी आझाद यांच्या समर्थनार्थ राजीनामा दिल्याचं त्यांनी सांगितलं. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना नेत्यांनी संयुक्त राजीनामा पत्र सादर केले, अशी माहिती पीटीआय वृत्तसंस्थेने दिली आहे.
जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि गांधी घराण्याचे निकटवर्तीय गुलाम नबी आझाद यांनी गेल्या आठवड्यात काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. गांधी घराण्याशी असलेले जवळपास पाच दशकांचे ऋणानुबंद आझाद यांनी तोडले. यावेळी त्यांनी राहुल गांधींच्या नेतृत्वावर सडकून टीका केली होती. आझाद लवकरच जम्मू-काश्मीरमधून राष्ट्रीय पातळीवरील पक्ष सुरु करणार आहेत.माजी मंत्री-आमदारांचा काँग्रेसला रामराम
जम्मू-काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री तारा चंद, माजी मंत्री अब्दुल मजीद वाणी, मनोहर लाल शर्मा, घारू राम आणि माजी आमदार बलवान सिंग यांच्यासह अनेकांनी पत्रकार परिषदेत पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह राजीनामा जाहीर केला. आझाद यांच्या समर्थनार्थ आम्ही काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना संयुक्त राजीनामा पत्र सादर केले आहे, असे बलवान सिंग यांनी सांगितले.
गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस पक्षातील मतभेद उघडपणे समोर आले आहेत. पक्षात संघटनात्मक बदल व्हावेत यासाठी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधींना पत्र लिहिणाऱ्या २३ नेत्यांमध्ये त्यांचाही समावेश होता. आझाद यांना राज्यसभेत पुन्हा संधी नाकारल्यानंतर ते नाराज असल्याचं बोललं जात होतं. काँग्रेस पक्ष तुमच्या नेतृत्वात चांगलं काम करत होता. मात्र, दुर्दैवाने जेव्हा पक्षात राहुल गांधी यांची एन्ट्री झाली आणि २०१३ मध्ये तुम्ही त्यांना उपाध्यक्ष म्हणून नियुक्त केले तेव्हा पक्षातील संवादच संपला, असं आझाद यांनी सोनियांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं.
आझाद यांच्या राजीनाम्याआधी पक्षातील आणखी काही वरिष्ठ नेत्यांनी राजीनामा दिला आहे. कपिल सिब्बल यांनी राज्यसभेच्या तोंडावर काँग्रेसचा राजीनामा देत समाजवादी पार्टीत प्रवेश केला होता. त्यांना सपाकडून राज्यसभेवरही पाठवण्यात आलं.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |