पुसेगाव: दुष्काळी खटाव व माण तालुक्यातील शेती पुर्णपणे नैसर्गिक पावसावर अवलंबून आहे. या निसर्गाच्या लहरीपणाचा भागाला फटका अनेकदा बसलेला आहे. अनेकदा पाणी टंचाईचा सामना करावा लागला आहे. साधारणपणे गेली चार वर्षे सलगपणे या भागाने तीव्र दुष्काळाला तोंड दिले आहे. हे चक्र भेदण्यासाठी खासकरून दुष्काळी भागात लोकसहभागातून जलसंधारण मोहिम फार महत्वपूर्ण ठरली आहे. अलिकडच्या काळात पाणी समस्येवर कायमस्वरुपी मात करणार्या यशोगाथा खटाव तालुक्यातील अनेक गावांत निर्माण झाल्या आहेत. यामध्ये अनेक वर्षांपासून जाखणगाव, गादेवाडी, आमलेवाडी, साळुंखेवस्ती, रामोशीवस्ती (मेघलदरे वाडी) या गावांनी जलसंधारण व मृदसंधारण कामांची परिणामकारक अंमलबजावणी करून मोठ्या प्रमाणात पाणीसाठा विकेंद्रीत स्वरुपात निर्माण केला आहे व वनसंपत्तीही मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे.
या परिसरात जांब (ता.खटाव) पासून ते खटावपर्यंत शासन, लोकसहभाग, विविध सामाजिक संस्था व लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून या भागात अनेक वर्षापासून जलसंधारणाची चळवळ राबली गेली. यामध्ये खासकरून येथील ओढ्यांवर सिमेंट व मातीचे लहानमोठे मिळून 41 बंधारे बांधण्यात आले आहेत. त्याबरोबरच ओढ्यांचे खोलीकरण व रुंदीकरण मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहे. शिवाय या खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामातून 1 लाख 80 हजार घनमीटर गाळ पडीक रानात भरून ही रानेही सुपिक केली. काही गाळ ओढ्याच्या काठावर टाकण्यात आला. हा गाळ पुन्हा पावसाच्या पाण्याने ओढ्यात वाहून जाऊ नये म्हणून गावकर्यांनी अत्यंत कल्पकतेने दोन्ही बाजूला सुमारे चार वर्षापूर्वी कळकाची रोपे लावली होती. आजच्या घडीला या रोपांचे मोठ्या बेटात रुपांतर झाले आहे. या बांबूंचा तटबंदी म्हणूण चांगला उपयोग होत आहे. शिवाय या बांबूपासून चांगले उत्पन्नही मिळू शकणार आहे.
अशा प्रकारे गावातले पाणी गावातच आडवण्यात आले शिवाय लाख मोलाची माती देखील थोपवण्यात आली. या सर्व कामांचा परिपाक म्हणजे आज या भागामध्ये कमी पर्ज्यनमाण होऊन देखील येथील बंधारे निव्वळ शंक पाण्याने भरून वाहत असलेलं चित्र दिसून येत आहे. या गावांमध्ये जलसंधारण व मृदसंधारणाची कामे शास्त्रोक्त पध्दतीने झाल्याने येथील बंधारे पुर्ण क्षमतेने भरले व त्यामुळे पाण्याची टंचाई कायमस्वरुपी दुर होणार आहे. मात्र गावातील विविध जलस्त्रोतांची खोलीकरण व रुंदीकरण केल्यानंतर काठावर विविध वनस्पतींची लागवड केली तर ही भांडी दीर्घकाळापर्यंत पाण्याचा चांगला साठपा करू शकतील. खटाव ते जांब पर्यंत बांधण्यात आलेल्या सर्व बंधार्यामध्ये अंदाजे 180 टी.सी.एम (18 कोटी लीटर) एवढ्या क्षमतेचे पाणी साठू शकते असे कृषी अधिकारी किरण काळे यांनी माहिती दिली.
जलसंधारणाच्या कामाला मृदसंधारणाची जोड दिली पाहिजे. पाणी आडवा व जिरवा या जुन्या पध्दतीऐवजी काळाच्या ओघात माती आडवा,पाणी जिरवा व वृक्षवल्ली सोयरी झाली तर महाराष्ट्रात जैवविविधता पुन्हा बहरेल.’
- डॉ. अविनाश पोळ, सामाजिक कार्यकर्ते
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |