12:36pm | Oct 13, 2022 |
पर्थ : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियातील आपल्या मिशन टी-२० वर्ल्डकपची शानदार सुरुवात केली आहे. पहिल्या अनऑफिशियल सराव सामन्यात त्यांनी वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचा १३ धावांनी पराभव केला. आता या संघाविरुद्ध दुसरा अनऑफिशियल सराव सामना खेळवला जात आहे. हा सामनाही पर्थमध्येच होत आहे. या सामन्यात टीम इंडिया प्रथम गोलंदाजी करणार आहे. या सलग दुसऱ्या सराव सामन्यात विराट कोहलीला स्थान मिळालेले नाही. तर पहिल्या सामन्यातून बाहेर पडलेल्या केएल राहुलला या सामन्यात कर्णधारपद मिळाले आहे. रोहित शर्मा देखील संघात खेळत आहे.
यानंतर भारतीय संघाला दोन ऑफिशिअल सराव सामनेही खेळायचे आहेत. हे सामने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्ध अनुक्रमे १७ आणि १९ ऑक्टोबरला होणार आहेत. त्यानंतर टीम इंडिया २३ ऑक्टोबरला विश्वचषकातील पहिला सामना खेळणार आहे. दिवाळीच्या एक दिवस आधी हा सामना पाकिस्तानविरुद्ध मेलबर्न येथे होणार आहे.
सराव सामन्यात भारताचा अंतिम अकरा संघ
रोहित शर्मा, केएल राहुल (कर्णधार), दीपक हुडा, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंग.
कोहली-राहुल-अश्विन पहिला सामना खेळले नाहीत
भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीला पहिल्या अनऑफिशियल सराव सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग-11 मध्ये खेळायला दिले गेले नाही. कोहलीशिवाय सलामीवीर केएल राहुल आणि स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विनही संघात नव्हते. मात्र या दुसऱ्या अनऑफिशियल सराव सामन्यात राहुल आणि अश्विनचे पुनरागमन झाले आहे.
टीम इंडियाने पर्थमध्येच वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला अनऑफिशियल सराव सामना खेळला. त्या सामन्यात ऋषभ पंतने कर्णधार रोहित शर्मासोबत सलामीवीर हि भूमिका बजावली. या सामन्यात सूर्यकुमार यादवने ३५ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांसह ५२ धावा केल्या. यामुळे भारतीय संघाने ६ बाद १५८ धावा केल्या. १५९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्टर्न ऑस्ट्रेलियाला ८ गडी गमावून केवळ १४५ धावा करता आल्या आणि भारताने १३ धावांनी सामना जिंकला. या सामन्यात टीम इंडियाकडून अर्शदीप सिंगने ३ बळी घेतले, तर भुवनेश्वर कुमारने २, हर्षल पटेलला १ आणि युजवेंद्र चहलला १ बळी मिळाला.
युवकाचे अपहरण करून त्याचा खून केलेले संशयित 36 तासात रत्नागिरी येथून जेरबंद |
गर तू मेरा नही हो सका, तो किसी और का होने नहीं दूंगी... |
वाढे फाटा येथील मारेकरी ताब्यात; सूत्रधार कोण? |
दोन लाखांचे दागिने घेऊन कारागीर पळाला |
एकाची 35 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
टेस्टिंग सर्टिफिकेटच्या आमिषाने सुमारे 97 हजारांना गंडा |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अपघातातील जखमीचा मृत्यू |
बैलगाडीतून पडून महिलेचा मृत्यू |
दहावीतील मुलांनी धाक दाखवण्यासाठी चक्क क्लासमध्ये नेला कोयता |
राज्यात आदर्शवत ठरतील असे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र व आदर्श शाळा तयार करा : पालकमंत्री शंभूराज देसाई |
हॉटेलमध्ये विसरलेले १४ तोळे दागिने मिळाले परत |
रेशनिंग दुकानदार केरोसिन परवानाधारक संघटनेचे जिल्हा प्रशासनाला निवेदन |
कराडचा उड्डाणपूल पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून हिरवा कंदील... |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
टेस्टिंग सर्टिफिकेटच्या आमिषाने सुमारे 97 हजारांना गंडा |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अपघातातील जखमीचा मृत्यू |
बैलगाडीतून पडून महिलेचा मृत्यू |
दहावीतील मुलांनी धाक दाखवण्यासाठी चक्क क्लासमध्ये नेला कोयता |
राज्यात आदर्शवत ठरतील असे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र व आदर्श शाळा तयार करा : पालकमंत्री शंभूराज देसाई |
हॉटेलमध्ये विसरलेले १४ तोळे दागिने मिळाले परत |
रेशनिंग दुकानदार केरोसिन परवानाधारक संघटनेचे जिल्हा प्रशासनाला निवेदन |
कराडचा उड्डाणपूल पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून हिरवा कंदील... |
खानापूरच्या युवकाचा परखंदीत निर्घृण खून; वाई तालुक्यात खळबळ |
तांब्याच्या तारेची चोरी |
नोकरीच्या आमिषाने तब्बल चार लाख 99 हजाराची फसवणूक |
युवतीच्या विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा दाखल |
मध्यमवर्गीय, शेतकरी, गोरगरीबांना न्याय देणारा अर्थसंकल्प |