04:30pm | May 29, 2021 |
फलटण : एकेकाळी वरदायिनी म्हणून ज्या तलावाकडे पाहिले जायचे तो वाखरीचा तलाव आज वाखरीचा कर्दनकाळ तर ठरणार नाही ना? असा प्रश्न निर्माण झाला असून कोणत्याही क्षणी तलाव फुटून गाव पाण्याखाली जाऊन जीवित हानी होऊ शकते. त्यामुळे वाखरी तलावाची दुरुस्ती करण्यात येऊन ग्रामस्थांचे जीव वाचवावेत, अशी आर्त साद वाखरीच्या सरपंच शुभांगी शिंदे यांनी प्रशासनाला घातली आहे.
कायम दुष्काळी असा ठपका पडलेल्या वाखरी गावात 1980 साली जवळपास अर्धा टीएमसी ला थोडे कमी असलेल्या तलावाची निर्मिती करण्यात आली, हा तलाव सध्या जीर्ण झाला आहे. या तलावावरील सांडव्यामध्ये भगदाड पडले असून या भिंतीच्या प्रत्येक ठिकाणी भेगा पडून मोठमोठी झाडे उगवली आहेत. या झाडांमुळे हा तलाव कधीही फुटू शकतो व यामध्ये खूप मोठी दुर्घटना घडून वाखरी गाव तर संपूर्ण वाहून जाईलच, पण याबरोबरच जवळ असलेल्या तरटे वस्ती व वाठार निंबाळकर (जुने गाव) जलमय होऊ शकते. या दुर्घटनेमध्ये किती मृत्यू, किती जनावरांची व इतर आर्थिक हानी होऊ शकते, हे कल्पनेच्या पलीकडे असून ही दुर्घटना घडण्यापूर्वी या तलावाची दुरुस्ती करावी, अशी मागणी वाखरी ग्रामपंचायतीच्या सरपंच शुभांगी शिंदे यांनी प्रशासनाकडे केली आहे.
दरम्यान ग्रामपंचायत वाखरी व येथील तुकाराम शिंदे यांनी सर्व स्थानिक अधिकारी, जिल्हाधिकारी यांना या तलावामुळे मोठी दुर्घटना घडू शकते, याची माहिती दिली आहे. मात्र, वरिष्ठ अधिकार्यांनी तुमचा तलाव अद्याप कोणाकडेही वर्ग केलेला नाही, मात्र तो लवकरच एनआरबीसी कडे वर्ग करून त्याचे काम केले जाईल, असे सांगितले आहे. परंतू पुढे जाऊन याबाबत चौकशी केली असता ते वर्ग झाले नाही, उलट वरिष्ठ अधिकारी टोलवाटोलवीची उत्तरे देत असल्याचा आरोप वाखरी ग्रामस्थांनी केला आहे. हा तलाव कोणत्या विभागाखाली येतो, हे कोणालाच माहिती नसल्याने प्रशासनाची टाळाटाळ सुरू आहे.
वाखरी गाव हे तब्बल तीन हजार लोकसंख्या असलेले गाव असून या गावची सर्व आर्थिक परिस्थिती या तलावावर व यामधील पाण्यावर अवलंबून आहे. गावच्या हद्दीतील शेत, पिण्याचे पाणी, आसपासच्या ओढे नालेतुन ओसंडून वाहत असतात. यामुळे शेतीला पाणी मिळत आहे. पावसाळ्यात गावात कोणालाही झोप लागत नाही. कधीही हा तलाव फुटू शकतो व मोठी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे ग्रामस्थांचे कधीही भरून न येणारे नुकसान होऊ शकते. या तलावामुळे वाखरी गावचा विकास झाला आहे. या तलावात तब्बल दीड वर्ष पाणी टिकते. या मुळे गावाला धोम- बलकवडी कडे पैसे भरून कालव्याचे पाणी घेण्याची आवश्यकता नाही. वाखरी तलाव हे आमच्या गावाचे वैभव आहे. मात्र हा तलाव फुटल्यास मोठी जीवितहानी होऊ शकते, असे शुभांगी शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान हा वाखरीचा तलाव बांधून झाल्या घटनेला आज 30 वर्षे पूर्ण झाली, तरी याला मालक (विभाग) कोणता असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर कोणाच्या विभागात हा तलाव येतोय हे सांगणे ग्रामस्थ व अधिकार्यांनाच माहिती नसल्याने नेमका पाठपुरावा कोणाकडे करायचा? या विचित्र मनस्थितीत दुर्घटना घडू नये यासाठी हा तलाव दुरुस्ती करण्याचे निवेदन ग्रामपंचायतीने सर्व मंत्री आणि सर्व अधिकार्यांना पाठविले आहे.
पावसाळ्याच्या तोंडावर आमचे गाव वाचवा!
आमच्या गावाला कोरोना पेक्षा मोठ्या पावसाची भीती वाटत असून मोठा पाऊस येऊन तलाव जर भरला आणि फुटला, तर गाव पाण्याखाली जाऊन जीवितहानी होणार आहे. पावसाळा तोंडावर आला असून तलाव दुरुस्त करून आमचे गाव वाचवा, अशी आर्त विनवणी सरपंच शुभांगी शिंदे यांनी केली आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |