सातारा : सध्या दुष्काळाचे सावट दूर झाले असून परतीच्या पावसाने खटाव-माण तालुक्याला चांगलेच वरदान दिले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बळीराजाला आधार मिळाला आहे. तसेच शासनाने अनलॉक केल्याने रस्त्यावरील वाहतूक वाढली आहे. अशावेळी वडूज नजिकच्या येरळा नदीपात्रातील जंगली झाडे चक्क पुलाच्या कठड्याच्या बाहेर डोकावू लागली आहेत. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून त्याची त्वरित छाटणी करुन बांधकाम विभागाने या पुलाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी वाहनचालकांकडून व नागरिकांकडून होवू लागली आहे.
याबाबत माहिती अशी की, दुष्काळी खटाव तालुक्यामध्ये रोजगार हमी योजनेतून अनेक ठिकाणी रस्ता तयार करण्यात आला. त्याचबरोबर शेती व पिण्याच्या पाण्यासाठी पाझर तलाव उभारण्यात आले. परंतू येरळा नदी ओलांडून जाण्यासाठी पुलाची आवश्यकता होती. तत्कालीन आमदार केशवराव पाटील यांच्या कल्पक दृष्टिने वडूज नजिक येरळा नदीपात्रात सातारा जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्यावतीने अवघ्या 4 लाख 63 हजार 272 रुपयांमध्ये 452 फूट लांबीच्या पुलाची उभारणी करण्यात आली. तत्कालीन बांधकाम तथा गृहनिर्माण राज्यमंत्री प्रभाकर कुंटे यांच्या हस्ते 20 एप्रिल 1976 रोजी या पुलाचे उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे वडूजला ये-जा करण्यासाठी निमसोड, पुसेसावळी, कराड, रहिमतपूर या भागातून येणार्या वाहनचालक व ग्रामस्थांना सोयीचे झाले होते. गेल्या पाच वर्षापूर्वी पडलेल्या दुष्काळात खटाव तालुक्याने येरळा नदीचे पात्र कोरडे पाहिले होते. त्यानंतर दुष्काळग्रस्तांच्या जिद्दीने व निसर्गाच्या कृपेने तसेच नदीपात्रात इतर धरणातून पाणी सोडल्यामुळे खर्या अर्थाने या पुलाला नैसर्गिक देणगी लाभली. परंतू ज्याठिकाणी ओलावा आहे, त्या परिसरात घाणेरी, येडी बाभळ, घायपात, एरंड अशा जंगली झाडांची निर्मिती व वाढ झाली. पुलाच्या कठड्याच्या जवळपास पोहोचेल एवढ्या अंतरावर सध्या दुतर्फा झाडी वाढल्यामुळे पहाटे व रात्रीच्या वेळी तसेच अतीवृष्टीमध्ये पुलावरुन मार्गक्रमण करताना वाहनचालकांना तसेच पादचार्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
सातारा जिल्हा परिषदेच्या कारभाराबाबत देशपातळीवर पुरस्कार मिळाले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्यावतीने या पुलाची देखभाल दुरुस्ती होवून खर्या अर्थाने बांधकाम विभाग जनतेची कामे इमानेइतबारे करुन वाहनचालकांना दिलासा देतील, अशी अपेक्षा भाजप नेते व माजी आमदार डॉ. दिलीप येळगांवकर तसेच रिपब्लिकन पक्षाचे माण-खटाव तालुकाध्यक्ष राजेंद्र जगताप व वाहनचालक तसेच ग्रामस्थांनी केली आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |