03:33pm | Oct 02, 2020 |
फलटण: फलटण तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर यांच्या सूचनेनुसार महान व्यक्ती महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष विष्णुपंत लोखंडे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, जिल्हा सचिव मुक्ती शहा, राज्य शेतकरी मोर्चाच्या सदस्य गीता गिडडे मॅडम, कोळकी चे युवक नेते रणजीत जाधव, प्रशिक्षण समन्वयक सुधीर जगदाळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांनी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पुजन केले व यावेळी मार्गदर्शन केले. महात्मा गांधी यांनी मांडलेले विचार आजच्या काळामध्ये किती व कसे सुसंगत आहेत याबाबतची माहिती त्यांनी दिली. गांधी नावाची हाडामासाची व्यक्ती अस्तित्वात होती यावर नवीन पिढीचा विश्वासच बसणार नाही. कारण असा आदर्श पुरुष पुन्हा होणार नाही. वैज्ञानिक दृष्ट्या गांधींचे विचार महत्त्व खूप मोठं होतं. अमेरिकेसारखे बलाढ्य राष्ट्रा सुद्धा महात्मा गांधींना आदर्श मानतात. यातून त्यांच्या विचाराची व्याप्ती स्पष्ट होते. ग्रामस्वराज्य असो की ग्रामीण उद्योग, व्यक्तिगत आचरण, राहणीमान, पर्यावरण, आरोग्य, सर्वधर्मसमभाव, अशा अनेक विषयावर त्यांनी मांडलेली मतं आजच्या काळात सुसंगत असल्याचे दिसून येते. अनेक विद्यापीठात गांधी विचारांचा अभ्यास नव्याने सुरू झाला आहे. त्यांचे महत्त्व नव्या पिढीला रुजेल आणि समजेल अशा पद्धतीने मांडले जात आहेत.
गांधीजीनी ग्राम स्वच्छतेचे महत्व त्या काळातच ओळखले होते त्याची सुरुवात स्वतःपासून केली होती आज हे सूत्र स्वीकारून देश विदेशात स्वच्छता मोहीम राबवली जात आहे वेगवेगळ्या व्यक्तींनी गांधीजींच्या विचारांचा वारसा पुढे जपण्याचा प्रयत्न करत आहेत. सत्य अहिंसेची अनुभूती खेड्यातील जीवनातून मिळू शकते असे गांधीजी म्हणत म्हणून खेड्याकडे चला अशी हाक त्यांनी लोकांना दिली होती अशा महान व्यक्तींना आज अभिवादन करण्यात येत आहे तसेच लालबहादूर शास्त्री यांची सुध्दा जयंती साजरी केली त्यांनी स्वता सुद्धा देशासाठी खूप मोठे योगदान दिले आहे. महात्मा गांधीजींच्या विचारांचा वारसा घेऊन तिने आपलं संपूर्ण जीवन देशासाठी अर्पित केले. गांधीजींनी असहयोग आंदोलन मध्ये सामील होण्याचे हाक दिली त्यावेळी लालबहादूर शास्त्री यांनी ब्रिटिश सरकारच्या विरोधामध्ये भूमिका घेतली. दांडी यात्रा, मिठाचा सत्याग्रह आंदोलन, अशा अनेक आंदोलनांमध्ये लालबहादूर शास्त्री यांनी सहभाग नोंदवला. तसेच जय जवान जय किसान हा नारा देऊन शेतकर्यांसाठी खूप मोठं काम लालबहादूर शास्त्री यांनी केले अशा महान व्यक्तींचा आदर्श आजच्या नव्या पिढीसमोर ठेवून आपण वाटचाल केली पाहिजे अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |