सातारा : अस्मानी व सुलतानी संकटाचा शेतकरी वर्ग सामना करीत असतानाच खटाव तालुक्यातील खातगुण-विसापूर हद्दीतील खंडाने घेतलेल्या शेतजमिनीतील एका शेतकऱ्याचे दोन एकर सोयाबीन पीक अज्ञात व्यक्तीने जाळले. मात्र, पंचनामा करण्यासाठी कोणीही प्रतिसाद न दिल्याने सातारा जिल्हा शिवसेनेने महसूल विभागाचा जाहीर निषेध केला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, खटाव तालुक्यातील खातगुण-विसापूर हद्दीतील मागासवर्गीय शेतकरी अधिक यादव यांचे शेत खंडाने घेऊन पत्रकार व शेतकरी पंकज कदम हे गेली चार वर्षे शेती करीत आहेत. जुलै महिन्यात त्यांनी सोयाबीन पेरले होते. पेरणी, नांगरट, भांगलन, काढणी अशी मशागत करण्यासाठी सुमारे चाळीस ते पंचेचाळीस हजार खर्च केला होता. शेतीमधील दोन एकरातील सोयाबीन पीक काढून मळणीसाठी ठेवले होते. शनिवारच्या रात्री अज्ञात व्यक्तीने संपूर्ण सोयाबीन पेटवून दिला. यामध्ये एक लाख ते सव्वा लाख रुपयाचे नुकसान झाले. ही घटना समजताच शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख प्रताप जाधव, विभाग प्रमुख मुघटराव कदम यांनी महारकी नावाच्या शिवारातील शेतामध्ये जाऊन पाहणी केली. किमान दोन एकर क्षेत्रातील सोयाबीन काढून ठेवलेले पीक अज्ञात व्यक्तीकडून जाळण्यात आले आहे. यावेळी त्या विभागातील मंडलाधिकारी, तलाठी यांना तातडीने फोन केले असता दोघांचेही फोन बंद लागले होते, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जाधव यांनी दिली.
शेतकरी अतिवृष्टी विविध समस्यातून चालला असताना समाजात लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून पत्रकारितेला संबोधले जाते. अशा ग्रामीण पत्रकारांवर दबाव आणण्यासाठी समाजातील काही विकृत लोकांकडून असे प्रकार होत आहेत. याला आळा घालावा, अशी मागणी सातारा जिल्हा शिवसेनाप्रमुख प्रताप जाधव यांनी केली आहे.
संबंधित महसूल विभागाने तात्काळ पत्रकार व शेतकरी पंकज कदम यांच्या मेहनतीने तयार केलेल्या सोयाबीन शेतीमधील या जळीताचा पंचनामा करून शेतकऱ्यांना त्वरित मदत द्यावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. पत्रकार व शेतकरी कदम यांना सोयाबीन पिकाची नुकसान भरपाई मिळावी यासाठी शिवसेना सातारा जिल्हा अध्यक्ष प्रताप जाधव प्रयत्न करीत आहेत. ज्याठिकाणी सोयाबीन पीक ठेवले होते, त्याच ठिकाणी जळीत प्रकरणाने पिकाची राख झाल्याचे पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी साचले होते. महसूल विभागाचे काही जण दिवाळी साजरी करण्यात गुंतले असले तरी त्यांनी साधा फोन उचलण्याचे सौजन्य दाखविले नाही. त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |