01:15pm | Jun 03, 2020 |
सातारा : कोरोना विषाणूच्या संकटामुळे देशभर लॉक डाऊन जाहीर करण्यात आले आहे. या लॉक डाऊनमुळे सर्व छोटे व्यावसायिक, असंघटीत क्षेत्रातील कामगार, बांधकाम मजूर यांच्यापुढे मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यामुळे व्यापारी, कामगार, शेतकरी, गरीब, सूक्ष्म उद्योजक, दुकानदार यांना 200 युनिटपर्यंतचे वीज बिल माफ करण्याची मागणी आम आदमी पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र खजिनदार सरदार उर्फ सागर भोगावकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात असे म्हटले आहे की, लॉक डाऊनमुळे मागील अडीच महिन्यांपासून राज्यातील उद्योग, व्यापार व बाजारपेठा पूर्णपणे बंद होत्या. त्यामुळे हातावर पोट असलेला मजूर वर्ग हा घरी बसून आहे. उत्पन्नाचे काहीही स्त्रोत नसल्याने त्यांच्यापुढे एकवेळच्या जेवणाची अडचण आहे. अशा स्थितीत त्यांना वीज बिल भरावयास लावणे हे अन्याय करणारे ठरणार आहे. तब्बल 85 टक्के मजूर, कामगार हे असंघटीत क्षेत्रात आहेत. त्यांना या काळातील पगार मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे या सर्व वर्गासाठी पहिले 200 युनिट वीज बिल माफ केल्यास त्यांना थोडातरी दिलासा मिळू शकतो, असे प्रतिपादन आम आदमी पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र खजिनदार सरदार उर्फ सागर भोगावकर यांनी केले आहे. ते पुढे म्हणाले, सर्व कामगारांचा लॉक डाऊन काळातील पगार मालकांनी, ठेकेदारांनी करावा, असे आवाहन सरकार करते आहे. परंतू या आवाहनाला कितपत प्रतिसाद मिळतोय हे आपण जाणू शकता. आज सर्वसामान्यांपासून व्यापारी, व्यवसायिकांपर्यंत सर्वांचेच आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्यातील ज्या नागरिकांच्या विजेची खपत 200 युनिटपेक्षा कमी आहे, अशा नागरिकांचे चार महिन्यांचे वीज बिल माफ करावे. जेणेकरुन त्यांना दिलासा मिळेल. ही आदमी पार्टीचीच नव्हे तर राज्यातील समस्त जनतेची मागणी आहे.
दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारने गेल्या दोन वर्षापासून 200 युनिटपर्यंतची वीज ग्राहकांना मोफत दिली आहे. त्याच धर्तीवर आपणही याबाबत विचार करुन राज्यातील 200 युनिटपर्यंतचे चार महिन्यांचे वीज बिल माफ करण्याची घोषणा करावी. याबाबत आपण विचार न केल्यास नाईलाजास्तव राज्यातील जनतेला सोबत घेवून आम आदमी पार्टीला रस्त्यावर उतरुन आंदोलन करावे लागेल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |