04:55pm | Aug 31, 2020 |
चेन्नई: जागतिक बुद्धिबळ ऑलिंपियाड स्पर्धेत भारताने इतिहास रचला आहे. तब्बल 96 वर्षांमध्ये पहिल्यांदाच भारताने सुवर्णपदक पटकावले आहे. इंटरनेट जोडणीतील दोष, सर्व्हरच्या कार्यात आलेला अडथळा, यामुळे वादग्रस्त ठरलेल्या बुद्धिबळ ऑलिंपियाडमधील भारत आणि रशिया यांच्यातील अंतिम लढतीत दोन्ही देशांना संयुक्त विजेते घोषित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने (फिडे) ही घोषणा केली. ऑलिंपियाडमधील भारताचे हे पहिलेच सुवर्णपदक ठरले.
या अंतिम लढतीतील पहिल्या डावात भारत-रशिया यांच्यात 3-3 अशी बरोबरी झाली होती. सगळ्या सहा डावांत ‘स्टेलमेट’ झाले. रशियाने दुसरा डाव मात्र 4.5-1.5 असा जिंकला. यात आंद्रे एसिपेन्कोने निहाल सरीनवर मात केली, तर पोलिना शुवालोव्हाने दिव्याला नमविले; पण भारताने इंटरनेटच्या जोडणीत झालेला बिघाड या पराभवास कारणीभूत असल्याची तक्रार केली. त्याआधी, दुसर्या डावात आनंदने इयन नेपोमनियाकचीविरुद्ध बरोबरी केली, तर कर्णधार विदीत गुजराथीनेही दानिल दुबोव्हला बरोबरीत रोखले होते. कोनेरू हम्पीला अलेक्झांड्रा गोर्याखकिनाने नमविले आणि डी. हरिकाने अलेक्झांड्रा कोस्तेनिउकला बरोबरीत थोपविले.
अंतिम लढतीत भारत रशियाकडून 1.5-4.5 असा पराभूत झाला होता. अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या पटावर दिव्या देशमुख, निहाल सरीन यांच्या लढतींना इंटरनेट जोडणीतील दोषाचा फटका बसला आणि वेळेच्या बंधनात अडकल्यामुळे त्यांना लढत गमवावी लागली. तिसर्या पटावर खेळणार्या कोनेरू हम्पीलाही अशाच परिस्थितीचा सामना करावा लागला. याचा फटका अर्थातच भारताला बसला. त्यावर भारतीय संघाने ’फिडे’कडे दाद मागितली आणि या संदर्भातील परिस्थितीचा आढावा घेणार्या समितीने दोन्ही देशांना संयुक्त विजेतेपद घोषित करण्याचा निर्णय घेतला.
वेंकट सर्वानन याने केलेल्या ट्विटमध्ये नमूद केले होते, की दिव्या देशमुखचे दुर्दैव, की तिला वेळेच्या बंधनात अडकून पराभव पत्करावा लागला; पण ती विजयाच्या अगदी जवळ पोहोचली होती. दिव्याने ही लढत जिंकली असती, तर त्याचा फायदा भारताला मिळाला असता; पण इंटरनेटमधील दोषाचा फटका भारताला बसला.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |