12:11pm | Apr 18, 2021 |
बुलडाणा : राज्यात कोरोनाचा फैलाव अत्यंत वेगानं होत असून रोजच्या रोज शेकडो माणसं या आजाराला बळी पडत आहेत. त्यातच कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी लागणारे रेमडेसिविर इंजेक्शन व ऑक्सिजनचा तुटवडा भासू लागला आहे. मात्र, त्यावरून केंद्र व राज्य सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील भाजप नेते राज्य सरकारची सतत अडवणूक करत असल्याची सत्ताधारी महाआघाडीतील लोकप्रतिनिधी व नेत्यांची भावना झाली आहे. त्यामुळं संतप्त झालेले शिवसेनेचे बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना त्यांची जीभ घसरली आहे.
कोरोनाच्या संकटातही भाजपचे नेते राजकारण करत असल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे. ‘महाराष्ट्रातील भाजपच्या लोकांचं भयंकर राजकारण संपूर्ण महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी पाहतोय. फडणवीस, दरेकर आणि चंपा नावाचे चंद्रकांत पाटील हे राजकारण करत आहेत. कोरोना हा पक्षाचा कार्यकर्ता पाहून होत नाही. शिवसेना, राष्ट्रवादी पाहून होत नाही. प्रत्येक जातीधर्माच्या माणसाला हा विषाणू विळखा घालून बसलेला आहे. भाजपच्या 105 आमदारांना आणि 20 खासदारांना महाराष्ट्रानं मतदान केलंय हे त्यांनी विसरू नये. महाराष्ट्राला रेमडेसिविरचं इंजेक्शन, लस देऊ नका अशा धमक्या भाजपवाले कंपन्यांना देताहेत. ऑक्सिजनची वारंवार मागणी करूनही पुरवठा होत नाही. पक्षाच्या कार्यालयातून गुजरातला इंजेक्शन दिली जाताहेत. पण महाराष्ट्राला देण्यासाठी यांच्याकडं इंजेक्शन नाहीत. अशा प्रकारचं राजकारण भाजपकडून केलं जातंय. या देशात काय, जगातही असलं राजकारण कोणी केलेलं नाही,’ असं गायकवाड म्हणाले.
‘बांग्लादेश, पाकिस्तानला देण्यासाठी यांच्याकडं लसी आहेत. महाराष्ट्र राज्य हे त्यांना पाकिस्तान व बांग्लादेशपेक्षा कमी महत्त्वाचे वाटते का? पंतप्रधान मोदी व फडणवीसांना काहीतरी वाटलं पाहिजे. नरेंद्र मोदी, फडणवीस मुख्यमंत्री असते, हे चंद्रकांत पाटील मंत्री असते तर अशा परिस्थितीत त्यांनी काय केलं असतं?,’ असा सवाल गायकवाड यांनी केला आहे.
भाजपच्या नेत्यांबद्दल असलेली चीड त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवली आहे. ‘मला कोरोनाचे जंतू सापडले असते तर मी ते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते. इतका तिरस्कार या लोकांबद्दल माझ्या मनामध्ये निर्माण झाला आहे. ज्याच्या घरातला माणूस मरतो, ज्याच्या घरातील कर्ता पुरुष जातो, त्याला समजतं की कोरोना काय आहे. त्यामुळं भाजपच्या लोकांनी राजकारण थांबवावं,’ असं आवाहन त्यांनी केलं आहे. महाराष्ट्र जगला पाहिजे. माणूस जगला पाहिजे. माणसंच मेली तर तुम्हाला शिक्के कोण मारणार? कोण मतदान करणार तुम्हाला?,’ असंही गायकवाड यांनी सुनावलं आहे.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |