01:46pm | Jul 07, 2020 |
सातारा: 26 जानेवारी रोजी संविधानिक ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे. असे असतानाही 26 जानेवारी 2018 रोजी तथाकथित ग्रामसेवक संघटनेने काढलेल्या फतव्यानुसार 420 ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा घेण्यात आली नाही. याबाबत कारवाई करण्यास दिरंगाई होत असून याविरोधात लवकरात लवकर कारवाई न झाल्यास 15 ऑगस्ट रोजी आत्मदहन करणार असल्याचा इशारा आरपीआय जिल्हाध्यक्ष संजय गाडे यांनी दिला आहे.
याबाबत दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, 26 जानेवारी 2018 रोजी संविधानिक ग्रामसभा न घेण्याचा फतवा तथाकथित ग्रामसेवक संघटनेने काढला होता. त्याच संविधानातील तरतुदीची तसेच कारवाई प्रचलित कायद्यानुसार होणार्या परिणामास जबाबदार रहाल अशा आशयाची पूर्वसूचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पत्राद्वारे सर्व पंचायत समिती, गटविकास अधिकारी, विस्ताराधिकारी, सेवक व सरपंच यांना दिली होती. तरीही या आदेशाला न जुमानता जिल्ह्यातील 273 ग्रामसेवक आणि 420 सरपंच यांनी ग्रामसभा घेतली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी 273 ग्रामसेवक आमच्यावर प्रशासकीय कारवाई मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रस्तावित केलेले आहे. मात्र 420 सरपंच यांच्याविरुद्ध महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 खालील कलम 7 नुसार कारवाई करण्यासाठी शिफारस अहवाल सादर केलेला आहे. ज्या दिवशी भारतीय राज्यघटना अस्तित्वात आली त्याच दिवशी एक प्रकारे घटनाच असणार्या ग्रामपंचायत अधिनियमाची अवहेलना जर सरपंचाकडून होत असेल तर नक्कीच त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. ग्रामसेवकांनी संप असल्याचे कारण सांगून ग्रामसभा घेण्याचे टाळले असले तरी सरपंचांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली अंगणवाडीसेविका, प्राथमिक शिक्षक प्राथमिक शिक्षक, शासकीय कर्मचारी यांची सचिव म्हणून नियुक्ती करून ही ग्राम सेवा घेणे गरजेचे होते. परंतु तसे घडले नाही. यामुळे सातारा जिल्ह्यातील 420 सरपंचांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 खालील कलम 7 नुसार कारवाई करण्यात यावी अशी शिफारस अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केला आहे.
दरम्यान याच नियमानुसार कोरेगाव तालुक्यातील वाघोली गावचे सरपंच बशीर खान कादिर खान पठाण यांना अपात्र केले आहे. त्याचप्रमाणे इतर 420 सरपंचांवर कारवाई करण्यात यावी अन्यथा संघटनेचे शेकडो कार्यकर्ते 15 ऑगस्ट 2020 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे याचा निषेध करून सामुदायिक आत्मदहन करण्यात येईल असा इशाराही या प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आला आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |