04:15pm | Jan 08, 2022 |
दिल्ली : बदलत्या हवामानामुळे राज्यात सध्या सर्दी-खोकला आणि तापाची साथ पसरली आहे. अशात आपण कोरोनाची चाचणी केली तर रिपोर्ट पॉझिटिव्हच येईल. त्यामुळे जर सौम्य लक्षणे असतील तर घरीच क्वारंटाईन होऊन आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला केंद्राकडून देण्यात आला आहे.
गेल्या आठवड्यापासून राज्यातील रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने केंद्र सरकारने गांभीर्य ओळखून आरोग्य सुविधा सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवताना त्यांच्यावर डॉक्टरांनी लक्ष ठेवावे. ऑक्सिजनयुक्त खाटा, अतिदक्षता विभाग कार्यान्वित ठेवण्याचे निर्देशही त्यांनी राज्याच्या आरोग्य खात्याला दिले आहेत.
डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत झपाट्याने रुग्ण वाढल्याने केंद्राने चिंता व्यक्त केली. राज्यात २१ डिसेंबर ते तीन जानेवारीपर्यंत ६१ हजार ८८८ रुग्णांची नोंद झाली आहे. ३६ पैकी ३४ जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे. पुणे, मुंबई, ठाणे, बृहन्मुंबई या जिल्ह्यांत सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. २७ डिसेंबर ते दोन जानेवारी दरम्यान मुंबई, ठाणे, मुंबई उपनगर, पुणे, रायगड, नागपूर, पालघर, उस्मानाबाद, सिंधुदुर्ग, जळगाव, रत्नागिरी, सांगली आणि सातारा जिल्ह्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढल्याचे केंद्राने म्हटले आहे.
रुग्णसंख्या वाढत असल्याने केंद्र सरकारने राज्याला ऑक्सिजनयुक्त, अतिदक्षता विभागातील खाटांची क्षमता वाढवण्याचे, तसेच आरोग्य सुविधा सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. आरोग्य यंत्रणेवर ताण येण्याऐवजी आतापासूनच आरोग्य सुविधा सज्ज ठेवाव्यात, असेही निर्देश दिले आहेत. बहुतांश रुग्णांची लक्षणे सौम्य असून, त्यांना गृह विलगीकरणात ठेवा आणि त्यांच्यावर दररोज लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रायगड, हिंगोली, नगर, नाशिक, जालना, सोलापूर, यवतमाळ, वाशिम आणि बुलडाणा या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या घटली आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |