04:41pm | Aug 17, 2020 |
नवी दिल्ली: भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरलेल्या महेंद्रसिंग धोनीने आज सर्वांना धक्का देत अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली आपली निवृत्ती जाहीर केली. धोनी कर्णधार असताना भारताने बर्याच स्पर्धा जिंकल्या. त्यामुळे धोनीला भारतरत्न देण्याची मागणी आता जोर धरू लागली असल्याचे म्हटले जात आहे.भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने शनिवारी आपली निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर आता धोनीला भारतरत्न या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
धोनीच्या नेतृत्वखाली भारताने 2007 साली ट्वेन्टी-20 विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर 2011 साली धोनी कर्णधार असताना भारताने एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स करंडकाला गवसणी घातली होती, त्याचबरोबर धोनीच्या काळात भारतीय संघ कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचला होता. धोनी हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार होता, असे म्हटले जाते. त्यामुळे धोनीला आता भारतरत्न का देण्यात येऊ नये, असा सवालही आता विचारला जात आहे.
धोनीला भारतरत्न देण्यात यावा, अशी मागणी काही खासदारांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारकडे केली आहे. मध्य प्रदेशमधील खासदार आणि पूर्व मंत्री पी. सी शर्मा यांनी धोनीला भारतरत्न देण्यात यावे, अशी मागणी केली होती. धोनीने भारताला बरेच काही मिळवून दिले आहे. त्यामुळे त्याला भारतरत्न हा मानाचा पुरस्कार मिळायला हवा, तो या पुरस्काराचा हकदार आहे, असेही शर्मा यांनी यावेळी म्हटले आहे.
धोनीने निवृत्ती घेतल्यानंतर शर्मा यांनी एक ट्विट केले. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, संपूर्ण जगामध्ये भारतीय क्रिकेटला विजेता ठरवणारा महेंद्रसिंग धोनी हा देशाचे एक रत्नच आहे. त्यामुळे त्याला भारतरत्न या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे. धोनीने क्रिकेटमध्ये भारताचे नाव उंचावले आहे. भारतरत्न हा सर्वोच्च नागरिक सन्मान आहे. हा सन्मान देशाची सेवा करणार्या व्यक्तींना दिला जातो. त्यामुळे धोनी या पुरस्काराच्या लायक नक्कीच आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |