05:17pm | Nov 25, 2020 |
(प्रकाश राजेघाटगे)
पुसेगाव: निसर्गाचा ढासळत चाललेला समतोल व लहरीपणामुळे खरीप, रब्बी हंगामातील पिकांची जोपासना करताना बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. कोणतेही पीक शेतात लावल्यापासून ते हातात येईपर्यंत शेतकर्यांना खात्री राहिली नाही. त्यामुळे सातत्याने मोठे आर्थिक नुकसान सहन करण्याची क्षमता शेतकर्यांकडे उरलीच नाही. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने शेती करण्यापेक्षा कमी कष्ट, जादा नफा मिळवून देणार्या आधुनिक शेती करण्याकडे शेतकरी वर्ग वळताना दिसत आहे.
खटावसारख्या दुष्काळी भागात शेती जी शेतकर्यांसाठी फायदेशिर ठरेल, जादा फायदा होईल अशी सुगंधी व औषधी वनस्पती जिरेनियमची शेती करण्याकडे शेतकरी वळला आहे. साधारणतः नोव्हेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान या वनस्पतीची लागवड केली जाते. वास्तविक पाहता 25 ते 30 डिग्री तापमानात या वनस्पतीची वाढ जोमाने होत असल्याने फेब्रुवारीत लागवड केल्यास चांगला फायदा होतो. या वनस्पतीची एकदा लागवड केल्यास किमान तीन वर्ष उत्पादन मिळते. एका एकरमध्ये 10,000 हजार रोप लागतात आणि हे पिक एका वर्षात तीन वेळा कापणीला येते. एकरी सुरूवातीला खर्च 70 ते 80 हजार येतो. इतर पिकाच्या तुलनेत फवारणी व खते यामध्ये 75% खर्च कमी आहे. एक एकर उसाला जेवढे पाणी लागेल तेवढ्या पाण्यावर चार एकर जिरेनियम ची शेती होऊ शकते.
या वनस्पतीच्या शेतात आंतरपिक म्हणून शेवगा हे पिक उत्तम असते. या शेवग्याच्या उत्पादनावर लागवडीचा खर्च निघून जातो. या पिकापासून ऑईल निर्मिती केली जाते व कापणीनंतर उरलेल्या पालापाचोळ्या पासून खत निर्मिती केली जाते. एका एकरात तीस ते चाळीस किलो ऑईल वर्षाला मिळते. एक लिटर ऑईलची किंमत जाग्यावर 12500 हजार रु मिळते. म्हणजे एक एकरमध्ये एका वर्षात चार ते पाच लाख रुपये किमतीचे तेल शेतकर्यांना मिळते. त्याचा हायडेनसिपरफ्यूम व कॉस्मेटिकसाठी याचा वापर केला जातो. फरफ्युममध्ये जी नॅचरिलीटी लागते ती या मधूनच मिळते. म्हणून जिरेनियम शिवाय पर्याय नाही.
या वनस्पतीच्या तेलाची भारतात दर वर्षाला 200 ते 300 टनाची गरज आहे. पण सध्यस्थिती पहाता भारतात वर्षाला 10 टन पण ऑईल (तेल) निर्मिती होत नाही. त्यामुळे या आणि अशा सुगंधी औषधी वनस्पतीची लागवड जास्तीतजास्त क्षेत्रात होणे अधिक फायदेशीर ठरणारे आहे. अशा या औषधी वनस्पतीची भारतात लाखो एकर शेती केली तरी कमीच आहे. गवत वर्गीय पीक असल्याने त्याला औषध व इतर खर्च फारच कमी प्रमाणात होतो.
सध्या शेतात घेतली जाणारी कांदा, बटाटा, आले, ऊस अशी नगदी पिके ही बिनभरोशाची आहेत. प्रचंड खर्च करून फायदा होईल का नाही. हे शेवट पर्यंत शेतकर्यांना समजत नाही. त्यामुळे कमी कष्ट व जादा नफा मिळवून देणारी व हमखास शेतकर्यांच्या दारात लक्ष्मी आणणारी सुगंधी व औषधी जिरेनियम ची शेती शेतकर्यांना आर्थिक दृष्टीने निश्चितच सक्षम करेल.
- विश्वनाथ पवार,
निवृत्त सुभेदार, जिरेनियम शेती उत्पादक, पवारवाडी(वर्धनगड)ता खटाव
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |