12:45pm | Jun 25, 2021 |
बीजिंग: उलट्या बोंबा मारण्यासाठी प्रसिध्द असणार्या चीनने सवयीप्रमाणे आता नवा आरोप केला आहे. लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणाव भारतामुळे झाला आणि त्यासाठी भारताने केलेले अतिक्रण जबाबदार असल्याचा दावा चिनने केला आहे. आक्रमक विस्तारवादी भूमिका घेणार्या चीनने भारताविरोधात केलेला दावा हास्यास्पद आहे.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी केलेल्या वक्तव्यानंतर भारतावर आरोप केले आहेत. लिजियान यांनी म्हटले की, भारत-चीन सीमेवरील पश्चिम क्षेत्रात चिनी सैन्य तैनात करणे ही सामान्य संरक्षण व्यवस्था आहे. चीनच्या क्षेत्रात होणारे अतिक्रमण रोखण्यासाठी केलेली ही व्यवस्था असल्याचे सांगत भारतानेच मागील काही काळापासून सीमेवर अधिक जवान तैनात करून आमच्या क्षेत्रावर अतिक्रमण केले असल्याचा आरोप लिजियान यांनी केला.
तणावसाठी भारताकडून होत असलेले अतिक्रमणच जबाबदार असल्याचे चीनने म्हटले. सीमा प्रश्न सोडवण्यासाठी शांततेचा मार्ग अवलंबला पाहिजे. सीमा प्रश्नाला द्विपक्षीय संबंधाशी जोडता कामा नये असेही लिजियान यांनी म्हटले. चर्चेतून सीमा प्रश्न सोडवला जाऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, कतार इकॉनॉमिक फोरमला संबोधित करताना भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले की, सीमेवरील वादग्रस्त भागात चीन सैन्याची कुमक कमी करण्याचे आश्वासन पूर्ण करणार की नाही याबाबत अनिश्चितता आहे. त्यामुळे ही बाब दोन्ही देशातील संबंधासाठी एक आव्हान आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |