12:58pm | Sep 19, 2020 |
बीजिंग: लडाखमधील थंडीच्या दिवसात भारतीय जवानांचे हाल होतील या आशेवर दबा धरून बसण्याची चीनने केलेली आयडिया त्यांच्याच अंगलट आल्याचे वृत्त समोर आले आहे. आडमुट्या धोरणांनी जगाला त्रस्त करणारा चीन सध्या स्वत:च्याच जाळ्यात अडकल्याने लडाखमधील वातावरण गरम होण्याऐवजी थंड पडल्याचे दिसून येत आहे.
लडाखमधील उंचावरील भागात थंडीच्या दिवसात तापमान शून्य ते उणे 24 पर्यंत घसरते. त्याशिवाय श्वास घेण्यासही त्रास जाणवतो. थंडीची अजून सुरुवात झाली नसताना चिनी सैन्याला हवामानाचा त्रास होऊ लागला आहे. उंचावरील काही पोस्टमधून चिनी सैनिकांना स्ट्रेचरवरून रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे वृत्त आहे.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, उंच ठिकाणी असलेल्या चिनी सैनिकांना हवामानाचा त्रास जाणवू लागला आहे. पॅन्गाँग सरोवर परिसरात भारत-चीन दरम्यान तणाव कायम आहे. काही आठवड्यांपूर्वी या भागात घुसखोरी करून ताबा रेषा बदलण्याचा प्रयत्न चीनने केला होता. चीनच्या या आगळीकीला भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर देत हा डाव हाणून पाडला. त्यानंतर भारतीय जवानांनी या भागातील काही महत्त्वाच्या उंच ठिकाणांचा ताबा घेतला. चीननेही काही उंचावरील भागांवर आपले सैन्य तैनात करत भारतावर दबाव बनवण्याचा प्रयत्न केला.
पॅन्गाँग परिसरात फिंगर चारजवळील तापमान उणे 4 अंश सेल्सियस इतके कमी होऊ शकते. ऑक्टोबर महिन्यात सरोवर पूर्णपणे गोठते. लडाखजवळील देपसांग आणि दौलत बेग ओल्डी या भागातील तापमान उणे 14 अंश सेल्सियस इतके कमी झाले असून अजूनही पारा घसरण्याची शक्यता आहे. चिनी कॉम्बॅक्ट आरोग्यकर्मचारी उंचावरील ठिकाणांहून पीपल्स लिबरेशन आर्मीच्या जवानांना हटवत आहे. त्यांना स्ट्रेटरवरून घेऊन जाण्यात येत आहे. त्यांच्याऐवजी नवीन सैन्य तैनात करण्यात आले आहे. हवा आणि बर्फामुळे त्यांना त्रास जाणवत आहे. आता वाढत्या थंडीमुळे परिस्थिती आणखी कठीणच होणार आहे.
लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीन सैनिकांना फिंगर चारमधील फिल्ड हॉस्पिटलमध्ये दाखल करत आहे. त्यामुळेच आता चीनकडून रुग्णालयाच्या संख्येत वाढ करण्यात येत आहे. भारत आणि चीनचे सैन्य हवामानावर लक्ष ठेवून आहेत. भारतीय सैन्याजवळ पॅन्गाँगपेक्षाही अधिक उंचावर तैनात राहण्याचा अनुभव आहे.
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |