सातारा : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्यावतीने अयोध्या येथील होणार असलेल्या राम मंदिराचे कार्य आता गतीमान झाले आहे. मंदिर निर्माणासाठी सर्व समाजातून निधी संकलन अभियान सुरु होणार आहे. हे श्रीराम मंदिर जगाची संस्कृतिक राजधानी बनेल, असा विश्वास विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
पुढे बोलताना मिलिंद परांडे म्हणाले, सुमारे पाच शतके चाललेला रामभक्तांचा संघर्ष यशस्वी होऊन दि.9 नोव्हेंबर 2019 रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने सत्याचा पूर्णपणे स्वीकार करत मंदिराचे कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी न्यायालयाच्या निर्णयानुसार भारताच्या केंद्र शासनाने श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाची स्थापना केली. न्यासाच्या विनंतीवरून पंतप्रधानांनी दि. 5 ऑगस्ट 2020 रोजी श्री रामजन्मभूमीच्या जागी भूमिपूजन व शिलापूजन करून कार्याचा श्रीगणेशा केला. संपूर्ण देश व जगातील सर्व रामभक्तांचे नेत्र त्या दिव्य दृश्याकडे लागले होते. प्रस्तावित निर्माणाधीन मंदिर तीन मजल्यांचे असेल. प्रत्येक मजल्याची उंची 20 फूटांची असेल. मंदिराची एकूण उंची 161 फूट असेल, लांबी 360 फूट आणि रूंदी 235 फूट असेल. त्यावर पाच शिखर असतील. हे मंदिर 2.7 एकर जागेवर होईल. त्याचे संपूर्ण बांधकाम केवळ दगडांनी असेल. सिमेंट व लोखंडाचा वापर यात होणार नाही. मंदिर परकोटाच्या बाहेर यज्ञशाळा, सत्संग भवन, संग्रहालय, संशोधन केंद्र, प्रदर्शन, अतिथी भवन इत्यादी सर्व अत्याधुनिक सोई-सुविधा होतील. एकूण तीन ते साडे तीन वर्षांच्या अवधीत हे कार्य पूर्ण होईल. मंदिराच्या बांधकामाच्या अनुषंगानेच श्री अयोध्याजीचे विकास कार्यसुद्धा सुरू झाले आहे. बांधकामानंतर आधी संपूर्ण भारत देश, नंतर जवळपासचे आशियाई देश व त्यानंतर संपूर्ण जगातील रामभक्तांचा संपर्क, समन्वय, सहयोग आणि समरसतेच्या केंद्राच्या रुपात ती पुढे येऊन जगाच्या सांस्कृतिक राजधानीचे स्वरूप तिला येईल, असा प्रयत्न आहे. या कार्यासाठी रामभक्तांचा सहभाग निश्चित करण्यासाठी रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या विनंतीवरून मकर संक्रांतीपासून माघ पोर्णिमेपर्यत म्हणजे दि .15 जानेवारी ते 27 फेब्रुवारी 2021 पर्यंत निधी समर्पण आभियानाचा संपूर्ण देशभर होत आहे. या माध्यमातून देशातील चार लाख गाव तसेच 11 कोटी कुटुंबांपर्यंत पोचण्याचे नियोजन केले आहे. आर्थिक पारदर्शिता रहावी म्हणून रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्यावतीने पावती पुस्तके व 1 हजार, 100 रुपये, 10 रुपयांच्या कूपन्सची रचना करून त्यामाध्यमातून अधिकाधिकत लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्र राज्यात हे अभियान दि.15 जानेवारी ते 31 या कालावधीत होणार आहे. अभियानच्या माध्यमातून 45 हजार गावातील व शहरी भागातील वस्तीतून 2.5 कोटी कुटुंब पोहचण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. याकरिता 2.5 लाख रामभक्त कार्यकर्ते सक्रीय झाले आहेत.
यावेळी रामदास स्वामी संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब स्वामी, वि.हिं.प.क्षेत्रीय संघटन मंत्री श्रीरंग राजे, उपाध्यक्ष बाबूजी नाटेकर, प्रदेश संघटन मंत्री विवेक कुलकर्णी, जिल्हा संघचालक डॉ.सुभाष दर्भ उपस्थित होते.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |