12:47pm | Jul 09, 2020 |
बुध: शेती उद्योगामध्ये विविध पिकामधून मिळणार्या उत्पादनामध्ये चढउतार असलेने शेती किफायतशीर करायची असेल तर त्याला फळबाग लागवडीची जोड देणे, ही काळाची गरज बनत चालली आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र शासन कृषि विभागाने आयोजित केलेल्या बांधावरील फळबाग लागवड करताना जिल्हापरिषद उपाध्यक्ष प्रदिप विधाते यांनी त्यांचे क्षेत्रावरील कृषि संजीवनी सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने केले.
महाराष्ट्र शासन कृषि विभागाच्या वतीने कृषि संजीवनी सप्ताह दि. 1 जुलै ते दि.7 जुलै दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. याअंतर्गत बांधावरील फळबाग लागवड, गांडुळ व नाडेप, खतनिर्मिती युनिट या योजना सुरु आहेत. याविविध योजनांचा लाभ शेतकर्यांनी घ्यावा असे आवाहन तालुका कृषि अधिकारी अरुण जाधव यांनी यावेळी केले.
याप्रसंगी बोलताना प्रदिप विधाते म्हणाले की, ऊस, आले यासारखी भांडवली पिकातून नियमित व खात्रीशीर उत्पन्न मिळते असे नाही तर त्यांच्या जोडीला बांधावरील फळबाग लागवड केल्यास पुरक असे खात्रीशीर उत्पन्न मिळून शेतकर्यांना निश्चितच आर्थिक हातभार लागेल, तसेच विधाते यांनी कृषि विभागाचे कामांच्या व योजनांच्या प्रगती बद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळी कृषि विभागाचे कृषि पर्यवेक्षक मुकूंद म्हेत्रे यांनी जमिनीचे आरोग्य चांगले राखायचे असेल तर गांडूळ, कंपोष्ट खते यांचा वापर वाढविला तर जमिनीतील हयुमसचे योग्य प्रमाणात राहून जमिन उत्पादनक होण्यास वेळ लागणार नाही. कंपोष्ट व गांडूळ खते तयार करण्याची शास्त्रीय पध्दती विषयी त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले. पंचायत समितीच्या विविध योजनांची माहिती आप्पासाहेब गौड यांनी दिली. याप्रसंगी खटावचे माजी उपसरपंच बबन घाडगे, दिनकर पाटील, दिलीप जाधव, किशोर डंगारे, सावता विधाते, नाना मोहिते उपस्थित होते, कार्यक्रमाचे आयोजन कृषि विभागाचे रुपाली पंडीत व श्रीकांत गोसावी यांनी केले.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |