05:00pm | Apr 29, 2022 |
पुणे : महाराष्ट्रासह मध्य, वायव्य आणि उत्तर भारताच्या अनेक भागांत गुरुवारी तीव्र उष्णतेच्या लाटेने कहर केल्याचे दिसून आले. देशातील 36 पैकी 18 हवामानशास्त्रीय उपविभागांमधील तब्बल 76 केंद्रांवर गुरुवारी 43 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान नोंदले गेल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागातर्फे (आयएमडी) सांगण्यात आले.
देशात गुरुवारी सर्वाधिक तापमान उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे 45.9 अंश सेल्सिअस; तर राज्यात चंद्रपूर येथे 45.8 अंश सेल्सिअस नोंदण्यात आले. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान आणि राजस्थानच्या पश्चिम भागांत अनेक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट सक्रिय असून, त्या भागांत कमाल तापमान 45 अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदले जात आहे.
गुजरात, राजस्थानच्या वाळवंटी भागांतून उष्ण आणि कोरडे वारे उत्तर भारतासह मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या दिशेने वाहत आहेत. याचा परिणाम म्हणून देशाच्या मोठ्या भूप्रदेशात सध्या कमाल तापमान चाळीस अंशांच्या वर नोंदले जात आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोरड्या हवेमुळे मध्य आणि वायव्य भारतात उष्णतेच्या लाटेची ही स्थिती आणखी किमान पाच दिवस राहण्याची शक्यता असून, राज्यात मध्य महाराष्ट्रातील कमाल तापमानात पुढील दोन दिवसांत काहीशी घट होण्याची शक्यता आहे. विदर्भात मात्र पुढील पाच दिवस उष्णतेच्या लाटेची स्थिती कायम राहण्याची शक्यता असल्याचे आयएमडीने म्हटले आहे.
उष्णतेच्या लाटेचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावरही होण्याची शक्यता असून, शारीरिक श्रमाच्या कामांसाठी दुपारची वेळ टाळावी, सूर्यप्रकाशात फिरणे टाळावे, नियमितपणे पाणी प्यावे, असे आवाहन हवामान विभागातर्फे करण्यात आले आहे.
राज्यातील शहरे शहर कमाल तापमान (अंश सेल्सिअस)
पुणे 41.8, नगर 44.5, जळगाव 45.6, नाशिक 41.1, सातारा 41.2, सोलापूर 43.4, औरंगाबाद 42.4, परभणी 43.8, नांदेड 42.8, अकोला 45.4
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |